शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

१२ हजार शेतकऱ्यांचे दोन वर्षांपासून वेट अ‍ॅन्ड वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 9:33 PM

राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील १२ हजार २८७ शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमाफी : ७५ हजार ८६६ शेतकऱ्यांना लाभ, याद्यांची प्रक्रिया सुरूच

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेला दोन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. परिणामी मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील १२ हजार २८७ शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे त्यांना गेल्या आणि यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्जाची उचल करण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या शेतकऱ्यांना गरज भागविण्यासाठी पुन्हा एकदा सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शासनाने २७ जून २०१७ मध्ये शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली. यातंर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफ करण्यात येणार होते. तसेच पात्र ठरलेल्या शेवटच्या शेतकऱ्याला या योजनेचा फायदा मिळेपर्यंत ही योजना सुरूच राहिल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.त्यानुसार अद्यापही ग्रीन, येलो, रेड याद्या तयार करण्याचे काम प्रत्येकच जिल्ह्यात सुरू आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस जिल्ह्यातील ८७ हजार २७३ शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी दोन वर्षांत ७५ हजार ८६६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २१८ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या ८७ हजार २७३ शेतकऱ्यांपैकी १२ हजार २८७ शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची मागील दोन वर्षांपासून बँकामध्ये पायपीट सुरूच आहे.पीक कर्ज माफीचा आत्तापर्यंत सर्वाधिक लाभ गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६४ हजार ८११ शेतकऱ्यांना १७१ कोटी ५६ लाख रुपये, विदर्भ ग्रामीण बँकेच्या ३ हजार ८९४ शेतकऱ्यांना ११ कोटी ८६ लाख रुपये आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या ७ हजार ५८५ सभासद शेतकऱ्यांना ३५ कोटी ७९ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे.दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु असताना अद्यापही पूर्ण पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना दररोज बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.यासंदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या असून त्या मंजुरीसाठी पाठविल्या असल्याचे सांगितले.पीक कर्जापासून वंचितकर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या १२ हजार २८७ शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी या शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून नवीन पीक कर्जाची उचल करण्यास अडचण जात आहे. जोपर्यंत त्यांचे कर्ज खाते निरंक होत नाही तोपर्यंत बँका त्यांना नवीन पीक कर्ज देणार नाही. तर पात्र शेतकऱ्यांनी थकीत कर्जाची रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफी मिळण्यापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ईकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे.शेतकरी सावकारांच्या दारातमागील दोन वर्षांपासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरूच असून यासाठी पात्र ठरलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही रक्कम जमा झाली नाही. त्यांची फार कोंडी झाली आहे.जुने कर्ज निरंक झाले नसल्याने नवीन पीक कर्जाची उचल करता येत नाही. त्यामुळे त्यांना मागील दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामासाठी नातेवाईक आणि सावकारांकडून कर्जाची उचल करुन गरज भागावावी लागत आहे.परिणामी पुन्हा शेतकरी सावकाराच्या दारात उभा असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज