शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

पाऊस लांबल्यामुळे धाबेपवनी या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त परिसरातील धानपिके धोक्यात आली आहेत. तर अर्ध्याहून अधिक धान पिकाची रोवणी खोळंबल्या आहेत. आता जर पाऊस आला नाही तर या परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या धानाची रोवणी झालेली आहे ते शेतकरी आपले धानपिक वाचिवण्यासाठी आटापिटा करीत आहेत.

ठळक मुद्देदोन्ही नक्षत्र कोरडेच : शेतमजुरांवर बेरोजगारी पाळी, पिके वाचविण्यासाठी सुरू आहे शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : जिल्ह्यात मागील महिनाभरापासून दमदार पाऊस न झाल्याने पऱ्हे  आणि केलेली रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर आहे. विहिरी, बोअरवेल आणि सिंचन प्रकल्पाच्या पाण्याच्या मदतीने पऱ्हे व रोवणी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.एकंदरीत पावसाअभावी कोरडा दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पाऊस लांबल्यामुळे धाबेपवनी या आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त परिसरातील धानपिके धोक्यात आली आहेत. तर अर्ध्याहून अधिक धान पिकाची रोवणी खोळंबल्या आहेत. आता जर पाऊस आला नाही तर या परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक घेण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या धानाची रोवणी झालेली आहे ते शेतकरी आपले धानपिक वाचिवण्यासाठी आटापिटा करीत आहेत. तर ज्यांची पावसाअभावी रोवणी झाली नाही ते रोहिणी कधी होणार या चिंतेत आहे. पाण्याची पातळी खालावल्यामुळे शेतीला विहिरी किंवा पंपाद्वारे पाणी देणे सुध्दा कठीण झाले आहे. ५ जुलैला लागलेल्या पुष्य नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे धानाची रोवणी अर्धवट आहेत. १९ जुलैला लागलेला पुनर्वसू नक्षत्र कोरडाच गेला. कान्होली, रांजीटोला, कोहलगाव, जब्बारखेडा, पवनी, तिडका, एरंडी, झाशीनागर, भसबोळन, जांभळी, येलोडी, रामपुरी,धाबेटकडी, चुटिया या आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त गावांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे.कोरोना कालावधीत बेरोजगार झालेले हात शेतीच्या कामात गुंतले असताना पावसाने पाठ फिरविल्याने मिळालेला रोजगार हिरावला आहे. एकीकडे शेतकरी पावसाअभावी संकटात सापडला तर दुसरीकडे दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकशाकडे लागल्या आहेत. मजुरांचे कामाअभावी हाल होत आहेत. दमदार पाऊस न झाल्यामुळे तलाव, बोड्या, नाले सर्व कोरडे पडले आहेत. त्यामुळे सिंचनाचा गंभीर प्रश्न या परिसरात निर्माण झाल्याचे कान्होली येथील शेतकरी महेंद्र रहिले यांनी सांगितले.पीक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांचा नजरायंदा पावसाने भरपूर ओढ दिल्याने पिकांवर ताण निर्माण झाला आहे. तर पावसाअभावी मोठ्या प्रमाणात रोवणी खोळंबली असून केलेली रोवणी सुध्दा वाळत चालली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ४५ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे आठ दहा दिवसात दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना पिकांना मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा स्थिती ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या शेतकºयांना मदत मिळणार का याकडे सुध्दा शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.सिंचन प्रकल्प पडले कोरडेमागील पंधरा दिवसांपासून या परिसरात पाऊस झाला नाही. परिसरात सिंचनाची व्यवस्था नाही. तलाव नाही बोड्या नाही. या परिसरात दूरवरच्या बाजूला इटियाडोह धरण तर इकडे खालच्या बाजूला नवेगावबांध जलाशय आहे. या दोन्हीतून शेतीला प्रत्यक्ष सिंचन होत नाही. त्यामुळे हातातील पीक तर जाणार नाही ना? धानाची रोवणी होणार की नाही ही चिंता बळीराजाला सतावत आहे. शेतकरी आटापिटा करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.झाशीनगर उपसा सिंचन योजनेने केली निराशाइटियाडोह धरणाचे पाणी उपसा करून परिसरात शेतीसाठी पाणी देण्याचा महत्त्वाकांक्षी झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्प राजकारणामुळे अद्यापही पूर्ण झालेला नाही. झाशीनगर उपसा सिंचन योजना मार्गी लावली जाईल असे आश्वासन अनेकांनी दिले पण हा प्रकल्प अद्यापही मार्गी लागलेला नाही. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका या परिसरातील शेतकºयांना बसत आहे.

टॅग्स :agricultureशेती