शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

बुधवारपर्यंत वैनगंगा नदीला पाणी येणार; एक दिवसआड होणार पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:23 IST

पुजारीटोलाचे पाणी सोडले : वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाच दलघमी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून तेच पाणी नदीपर्यंत पोहचविले जाणार आहे. अशात येत्या १३ किवा १४ तारखेपर्यंत वैनगंगा नदीत पाणी पोहचणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आणखी काही दिवस पाण्याची सोय होणार आहे.

गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कटंगी व कुडवा या दोन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीत आजघडीला मोजकाच पाणीसाठा आहे. जेमतेम १० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा असल्याने स्थिती कठीण आहे. पाटबंधारे विभागाकडून २५ एप्रिल रोजी पाच दलघमी पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाणी चोरी व बंधाऱ्यांमध्ये पाणी अडून पडल्यामुळे नदीत पुरेशा प्रमाणात पाणी पोहचले नाही. अशात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आणखी पाच दलघमी पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून सध्या शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी बनाथर येथील कालवा बंद केल्यानंतर नदीत पोहचणार आहे. यामुळे १३ किवा १४ तारखेपर्यंत नदीत पाणी येणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

नदीत सध्या जेमतेम १० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा असून जून महिन्यापर्यंत पाण्याची समस्या भेडसावणार आहे. अशात जास्तीत जास्त पाण्याची गरज भासणार असून पाण्याचा योग्य वापर करावा लागणार आहे. अन्यथा दोन महिने पाण्याचा पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जड जाणार आहे. 

पाटबंधारे विभागाने लावली कर्मचाऱ्यांची ड्यूटी२५ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाने पाच दलघमी पाणी सोडले होते. मात्र कित्येक ठिकाणी कालवा फोडून पाणी चोरण्यात आले. तर बंधाऱ्यात अडकडूनही पाणी नदीत योग्य त्या प्रमाणात पोहचू शकले नाही. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणी सोडून ते पोहचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहणार असे पत्र पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना दिल होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत पाटबंधारे विभागाला तसे निर्देश दिले. त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने आता कालव्यांवर अभियंते व कालवा निरीक्षकांची ड्यूटी लावली आहे. आता कालवे फोडणे, पाणी चोरने आदी प्रकार बघणार आहे.

एक दिवसआड होणार पाणीपुरवठासध्या वैनगंगा नदीत ८-१० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा आहे. तर आता मे महिना जेमतेम सुरू झाला असून जून महिनाभरही पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. तरीही पाणी टंचाई स्थिती बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाचे पाणी येतपर्यंत अशीच स्थिती राहणार असून यामुळेच एक दिवस पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पाण्याचा योग्य वापर करावैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाचे पाणी नदीत पोहचेपर्यंत तरी अशाच प्रकारे एक दिवसआड पाणीपुरवठा केला जणार आहे. यावरून पाण्यासाठी किती भटकंती करावी लागते व पाणी किती गरजेचे आहे, हे दिसून येते. यामुळेच नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक