शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बुधवारपर्यंत वैनगंगा नदीला पाणी येणार; एक दिवसआड होणार पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:23 IST

पुजारीटोलाचे पाणी सोडले : वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाच दलघमी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून तेच पाणी नदीपर्यंत पोहचविले जाणार आहे. अशात येत्या १३ किवा १४ तारखेपर्यंत वैनगंगा नदीत पाणी पोहचणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आणखी काही दिवस पाण्याची सोय होणार आहे.

गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कटंगी व कुडवा या दोन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीत आजघडीला मोजकाच पाणीसाठा आहे. जेमतेम १० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा असल्याने स्थिती कठीण आहे. पाटबंधारे विभागाकडून २५ एप्रिल रोजी पाच दलघमी पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाणी चोरी व बंधाऱ्यांमध्ये पाणी अडून पडल्यामुळे नदीत पुरेशा प्रमाणात पाणी पोहचले नाही. अशात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आणखी पाच दलघमी पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून सध्या शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी बनाथर येथील कालवा बंद केल्यानंतर नदीत पोहचणार आहे. यामुळे १३ किवा १४ तारखेपर्यंत नदीत पाणी येणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

नदीत सध्या जेमतेम १० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा असून जून महिन्यापर्यंत पाण्याची समस्या भेडसावणार आहे. अशात जास्तीत जास्त पाण्याची गरज भासणार असून पाण्याचा योग्य वापर करावा लागणार आहे. अन्यथा दोन महिने पाण्याचा पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जड जाणार आहे. 

पाटबंधारे विभागाने लावली कर्मचाऱ्यांची ड्यूटी२५ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाने पाच दलघमी पाणी सोडले होते. मात्र कित्येक ठिकाणी कालवा फोडून पाणी चोरण्यात आले. तर बंधाऱ्यात अडकडूनही पाणी नदीत योग्य त्या प्रमाणात पोहचू शकले नाही. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणी सोडून ते पोहचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहणार असे पत्र पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना दिल होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत पाटबंधारे विभागाला तसे निर्देश दिले. त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने आता कालव्यांवर अभियंते व कालवा निरीक्षकांची ड्यूटी लावली आहे. आता कालवे फोडणे, पाणी चोरने आदी प्रकार बघणार आहे.

एक दिवसआड होणार पाणीपुरवठासध्या वैनगंगा नदीत ८-१० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा आहे. तर आता मे महिना जेमतेम सुरू झाला असून जून महिनाभरही पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. तरीही पाणी टंचाई स्थिती बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाचे पाणी येतपर्यंत अशीच स्थिती राहणार असून यामुळेच एक दिवस पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पाण्याचा योग्य वापर करावैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाचे पाणी नदीत पोहचेपर्यंत तरी अशाच प्रकारे एक दिवसआड पाणीपुरवठा केला जणार आहे. यावरून पाण्यासाठी किती भटकंती करावी लागते व पाणी किती गरजेचे आहे, हे दिसून येते. यामुळेच नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक