शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बुधवारपर्यंत वैनगंगा नदीला पाणी येणार; एक दिवसआड होणार पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 16:23 IST

पुजारीटोलाचे पाणी सोडले : वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पाच दलघमी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले असून तेच पाणी नदीपर्यंत पोहचविले जाणार आहे. अशात येत्या १३ किवा १४ तारखेपर्यंत वैनगंगा नदीत पाणी पोहचणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आणखी काही दिवस पाण्याची सोय होणार आहे.

गोंदिया शहरासह लगतच्या ग्राम कटंगी व कुडवा या दोन गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीत आजघडीला मोजकाच पाणीसाठा आहे. जेमतेम १० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा असल्याने स्थिती कठीण आहे. पाटबंधारे विभागाकडून २५ एप्रिल रोजी पाच दलघमी पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाणी चोरी व बंधाऱ्यांमध्ये पाणी अडून पडल्यामुळे नदीत पुरेशा प्रमाणात पाणी पोहचले नाही. अशात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आणखी पाच दलघमी पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यानुसार, पाटबंधारे विभागाकडून सध्या शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी बनाथर येथील कालवा बंद केल्यानंतर नदीत पोहचणार आहे. यामुळे १३ किवा १४ तारखेपर्यंत नदीत पाणी येणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. 

नदीत सध्या जेमतेम १० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा असून जून महिन्यापर्यंत पाण्याची समस्या भेडसावणार आहे. अशात जास्तीत जास्त पाण्याची गरज भासणार असून पाण्याचा योग्य वापर करावा लागणार आहे. अन्यथा दोन महिने पाण्याचा पुरवठा करणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जड जाणार आहे. 

पाटबंधारे विभागाने लावली कर्मचाऱ्यांची ड्यूटी२५ एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाने पाच दलघमी पाणी सोडले होते. मात्र कित्येक ठिकाणी कालवा फोडून पाणी चोरण्यात आले. तर बंधाऱ्यात अडकडूनही पाणी नदीत योग्य त्या प्रमाणात पोहचू शकले नाही. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पाणी सोडून ते पोहचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची राहणार असे पत्र पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना दिल होते. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत पाटबंधारे विभागाला तसे निर्देश दिले. त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने आता कालव्यांवर अभियंते व कालवा निरीक्षकांची ड्यूटी लावली आहे. आता कालवे फोडणे, पाणी चोरने आदी प्रकार बघणार आहे.

एक दिवसआड होणार पाणीपुरवठासध्या वैनगंगा नदीत ८-१० दिवस पुरणार एवढाच पाणीसाठा आहे. तर आता मे महिना जेमतेम सुरू झाला असून जून महिनाभरही पाण्याचा पुरवठा करावा लागणार आहे. तरीही पाणी टंचाई स्थिती बघता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाचे पाणी येतपर्यंत अशीच स्थिती राहणार असून यामुळेच एक दिवस पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पाण्याचा योग्य वापर करावैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठा असून एक दिवसआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पावसाचे पाणी नदीत पोहचेपर्यंत तरी अशाच प्रकारे एक दिवसआड पाणीपुरवठा केला जणार आहे. यावरून पाण्यासाठी किती भटकंती करावी लागते व पाणी किती गरजेचे आहे, हे दिसून येते. यामुळेच नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक