शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हरीओम कॉलनीवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील हरी ऊँ कॉलनीतील हा प्रकार दिसून आला आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांचे दुर्लक्ष : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना वेळच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मामा चौकातून पुढे रिंग रोडवर असलेल्या हरी ऊँ कॉलनीतील रहिवासी बिसेन ते शेख यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. याबाबत या रांगेतील नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना मार्च महिन्यात निवेदन दिले. मात्र त्यांना वेळ नसल्याने तसेच नगरसेवकांचे या भागाकडे दुर्लक्ष असल्याने अद्याप येथे रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही.शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील हरी ऊँ कॉलनीतील हा प्रकार दिसून आला आहे. येथे रस्त्यांचे बांधकाम झाले आहे मात्र बिसेन ते शेख यांच्या घराच्या रांगेला डावलण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये येणाºया या कॉलनीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे यातून स्पष्ट दिसून येत आहे. नगरसेवकांकडून काहीच होत नसल्याने येथील नागरिकांनी मोठ्या आशेने नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांना रस्ता बांधकामाची मागणी असलेले निवेदन दिले. मात्र येथेही त्यांच्या अपेक्षाभंग झाला असून मार्च महिन्यात निवेदन देऊनही अद्याप येथील रस्ता बांधकाम झालेले नाही. यामुळे नगरसेवक फक्त मत घेण्यासाठीच येथे येतात असे येथील नागरिकांचे म्हणणे असून पदाधिकारी व अधिकारीही त्यांच्यापासून वेगळे नसल्याच्या प्रतिक्रीया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर रस्ता बांधकाम करण्यात यावे अशी मागणी यादोराव मदनकर, भीमराव घोडेस्वार, नंदलाल उईके, फातिमा पिल्ले, परमानंद हरिणखेडे, भाऊराव मदनकर, रामलाल यादव, राहुल पटले, मुरली सिंगनजुडे, सुलेमान शेख, नईम मिस्त्री आदिंनी केली आहे.नगरसेवकांकडून टोलवाटोलवीप्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येत असलेल्या या कॉलनीचे नगरसेवक विवेक मिश्रा व अनिता मेश्राम आहेत. रस्ता बांधकामाला घेऊन येथील नागरिक नगरसेवकांना विचारणा करीत असता नगरसेवक त्याना टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत. याची सही त्याची सही उरली असल्याचे सांगत येथील नागरिकांना टोलवित आहेत. यामुळे येथील नागरिकांत नगरसेवकांप्रती चांगलाच रोष व्याप्त आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा