शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हरीओम कॉलनीवासी रस्त्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST

शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील हरी ऊँ कॉलनीतील हा प्रकार दिसून आला आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांचे दुर्लक्ष : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना वेळच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मामा चौकातून पुढे रिंग रोडवर असलेल्या हरी ऊँ कॉलनीतील रहिवासी बिसेन ते शेख यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. याबाबत या रांगेतील नागरिकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना मार्च महिन्यात निवेदन दिले. मात्र त्यांना वेळ नसल्याने तसेच नगरसेवकांचे या भागाकडे दुर्लक्ष असल्याने अद्याप येथे रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही.शहराला लागलेले रस्त्यांचे ग्रहण सर्वांनाच ठाऊक आहे. अशात कित्येक ठिकाणी पक्क्या रस्त्यांवर किंवा जेथे लगेच रस्ता बांधकामाची गरज नाही अशा ठिकाणी रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. मात्र जेथे चालायला धड रस्ता नाही अशा भागांचा नगर परिषदेला विसर पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील हरी ऊँ कॉलनीतील हा प्रकार दिसून आला आहे. येथे रस्त्यांचे बांधकाम झाले आहे मात्र बिसेन ते शेख यांच्या घराच्या रांगेला डावलण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये येणाºया या कॉलनीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष असल्याचे यातून स्पष्ट दिसून येत आहे. नगरसेवकांकडून काहीच होत नसल्याने येथील नागरिकांनी मोठ्या आशेने नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांना रस्ता बांधकामाची मागणी असलेले निवेदन दिले. मात्र येथेही त्यांच्या अपेक्षाभंग झाला असून मार्च महिन्यात निवेदन देऊनही अद्याप येथील रस्ता बांधकाम झालेले नाही. यामुळे नगरसेवक फक्त मत घेण्यासाठीच येथे येतात असे येथील नागरिकांचे म्हणणे असून पदाधिकारी व अधिकारीही त्यांच्यापासून वेगळे नसल्याच्या प्रतिक्रीया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर रस्ता बांधकाम करण्यात यावे अशी मागणी यादोराव मदनकर, भीमराव घोडेस्वार, नंदलाल उईके, फातिमा पिल्ले, परमानंद हरिणखेडे, भाऊराव मदनकर, रामलाल यादव, राहुल पटले, मुरली सिंगनजुडे, सुलेमान शेख, नईम मिस्त्री आदिंनी केली आहे.नगरसेवकांकडून टोलवाटोलवीप्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येत असलेल्या या कॉलनीचे नगरसेवक विवेक मिश्रा व अनिता मेश्राम आहेत. रस्ता बांधकामाला घेऊन येथील नागरिक नगरसेवकांना विचारणा करीत असता नगरसेवक त्याना टोलवाटोलवीचे उत्तर देत आहेत. याची सही त्याची सही उरली असल्याचे सांगत येथील नागरिकांना टोलवित आहेत. यामुळे येथील नागरिकांत नगरसेवकांप्रती चांगलाच रोष व्याप्त आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा