अपंग महिलेला गावकऱ्यांचा व ग्रामपंचायतचा त्रास
By Admin | Updated: June 23, 2014 00:11 IST2014-06-23T00:11:28+5:302014-06-23T00:11:28+5:30
तालुक्यातील नवागड (पिपरिया) येथील सुरेखा मोहनलाल दमाहे यांचा रोजगारासाठी चालवित असलेला पानठेला ग्रामपंचायतने अतिक्रमणाच्या नावाखाली जप्त केला. सदर महिलेचे ४० हजार रुपयाचे

अपंग महिलेला गावकऱ्यांचा व ग्रामपंचायतचा त्रास
सालेकसा : तालुक्यातील नवागड (पिपरिया) येथील सुरेखा मोहनलाल दमाहे यांचा रोजगारासाठी चालवित असलेला पानठेला ग्रामपंचायतने अतिक्रमणाच्या नावाखाली जप्त केला. सदर महिलेचे ४० हजार रुपयाचे नुकसान करुन त्या अपंग महिलेला त्रास देण्यात येत असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, खंडविकास अधिकारी व सालेकसाचे तहसीलदार यांना देण्यात आली आहे.
नवागड येथे मंदिराजवळच्या मोकळ्या जागेच्या एका बाजूला २०१० पासून दमाहे यांचा पानठेला व किराणा दुकान आहे. दुकान चालविण्यासाठी भारतीय स्टेट बँक शाखा आमगाव येथून त्यांनी ४० हजार रुपयांचे कर्जही घेतलेले होते. दमाहे यांचा मुलगासुद्धा अपंग आहे. याच पानठेल्यावर त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह चालतो.
गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे तीन वेळा पानठेल्याची जागा बदलण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना कोणताही त्रास नाही.
२०१३ मध्ये गावातील काही लोकांनी राजकीय वैर काढण्यासाठी पानठेला हटविण्यासाठी ग्रामपंचायतीला तक्रार करणे सुरु केले. त्यानुसार ग्रामपंचायतीने ७ व १६ व २३ जानेवारी २०१४ ते २८ एप्रिल २०१४ ला दुकानाचे कुलूप तोडून नियमबाह्य पद्धतीने पानठेला ग्रामपंचायतीत नेण्यात आला. दुकान व सामान असे एकूण ५० हजाराचे नुकसान करण्यात आले.
नवागड गावात अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. परंतु त्या कोणाचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. फक्त अपंग महिलेचेच अतिक्रमण हटविण्यात आले. काही गावकरी दमाहे यांच्या घरीही गेले हाते. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
पोलिसांनी लोकांना अटक करताना सत्तारूढ पक्षाच्या आमदाराने त्यांना वाचविण्याचे काम केले. काँग्रेस सरकार महिलांच्या सबलीकरणाचे काम करताना काही लोक महिलेच्या दुकानाला अतिक्रमणाच्या नावाखाली बेरोजगार करतात. हा महिलेवर ग्रामपंचायतीने व गावकऱ्यांनी केलेला अन्याय आहे.
तेव्हा हा झालेला अन्याय दूर करण्यात यावा म्हणून सुरेखा दमाहे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, ठाणेदार, खंडविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज दिलेला आहे. अतिक्रमणाची कार्यवाही नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेली असून दमाहे यांना बेरोजगार करण्याचे काम ग्रामपंचायतीने केलेले आहे. (तालुका प्रतिनिधी)