शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आदिवासीचे श्रद्धास्थान कचारगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:20 IST

देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपºयातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात.

ठळक मुद्देयात्रेत गोंडी संस्कृतीचे दर्शन : माघ पौर्णिमेला देशभरातील आदिवासींचे आगमन

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात. दरम्यान लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आदिवासींची मोठी यात्रा भरते. या यात्रेला कचारगड यात्रा म्हणून ओळखले जाते. कचारगडप्रती सर्व आदिवासी समाजाची श्रद्धा व आस्था पाहून या स्थळाला आदिवासींचे ‘मक्का मदिना’ समजू लागले आहेत. तर आदिवासी समाजातील लोक याला आपली ‘दीक्षाभूमी’ मानतात.कचारगड हे पवित्र धार्मिक व नैसर्गिक स्थळ जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर आहे. तर गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर आहे. हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले नैसर्गिक पर्यटन स्थळसुद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणाला भेट देणाºया आदिवासी भाविकांसोबतच गैरआदिवासी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. यात्रेदरम्यान येथे चारपाच लाख भाविक व पर्यटक दरवर्षी येतात. शिवाय वर्षभर येथे भाविक व पर्यटक येतात. कचारगडला जाण्यासाठी रेल्वे मार्ग आणि बस मार्ग दोन्ही सोयीस्कर असून दरेकसा रेल्वे स्टेशनवरुन ५ किमी पायी चालत कचारगड गुफेपर्यंत पोहचावे लागते. तर बस मार्गाने गेल्यास गोंदिया-डोंगरगड मार्गावर धनेगाव येथे उतरुन ४ किमी पायी चालावे लागते. कचारगडला पोहचत असताना हिरवीगार वनराई, घनदाट जंगलाने व्यापलेली मोठमोठी पर्वत रांगा बघायला मिळते. याच पर्वत रांगेच्या एका मोठ्या पहाडात मोठी विशालकाय गुफा असून ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा मानली जाते. त्याचबरोबर लगतच्या पहाडात लहानमोठ्या गुफा असून या गुफांमध्ये आदिवासींचे आद्य दैवत शंभूसेक आणि मॉ काली कंकालीचे वास्तव्य आहे.आदिवासी गोंड धर्मगुरु, जाणकार या स्थळाबद्दल व कचारगड नाव पडल्याबद्दल आपापले मत मांडत असतानाच सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, कचारगडला तीन हजार वर्षांपूर्वी गोंडी आदिवासीचा उगम झाला. त्यांची मोठी मर्मस्पर्शी कथा आहे. असे बोलल्या जाते की, माता गौराचे ३३ मानलेले पूत्र होते. ते पूत्र मोठे उपद्रवी होते. त्यामुळे रागाने शंभूसेक यांनी त्यांना कचारगडच्या गुफेत डांबून ठेवले व दारावर मोठा दगड लावून ठेवला. या प्रकारामुळे मॉ कलीकंकाली द्रवित झाली. त्यावेळी किंदरी वादक संगीतज्ज्ञ हिरासुका पाटारी यांनी आपल्या संगीताच्या शक्तीने त्या युवकांमध्ये उर्जा निर्माण केली. तेव्हा त्या ३३ युवकांनी एका ताकदीने दगडाला धक्का दिला व बाहेर पडले. मात्र यात संगीतज्ज्ञ दिशसुका पाटारी यांचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला. ते सर्व ३३ पूत्र त्या ठिकाणातून पसार झाले व पुढे जाऊन देश-प्रदेशात त्यांचे वंशज वाढले.कालांतराने गोंडीयन संस्कृतीचे रचनाकार पारी कुपार लिंगो यांनी त्या सगळ्या वंशजांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. यात ३३ कोट संगोपन, १२ पेन यांचे ७५० गोत्र या सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याला गोंडी भाषेत ‘कच्चा’ असे म्हटले जाते. म्हणून या स्थळाला कचारगड नाव देण्यात आले.एकीकडे धार्मिक मान्यता व श्रद्धा असली तरी कचारगड गुफेला भेट दिल्यावर वैज्ञानिक दृष्टीकोणातून निरीक्षण केल्यास या पर्वतरांगेत मोठ्या पहाडात कच्चे दगड असल्याने त्यांचे स्खलन होऊन पहाडात गुफा तयार झाली असावी. तसेच या गुफेत निरीक्षण केल्यास तेथे लोह व इतर खनिजांचे कच्चे अवशेष पहायला मिळतात. म्हणून या ठिकाणाचे नाव कचारगड झाले, असे बोलले जाते.हजारो वर्षांपासून प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिलेला कचारगड शेवटी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक व इतिहासकार यांच्या नजरेस आला. त्यांनी या स्थळाचा शोध घेवून अभ्यास केला व हेच आदिवासींचे उगमस्थान आहे, या निकर्षावर पोहोचले.आजपासून ३४ वर्षांपूर्वी गोंडी धर्माचार्य स्व. मोतीरावण कंगाली, संशोधक के.बा. मरस्कोल्हे, गोंड राजे वासुदेव शहा टेकाम, दादा मरकाम, सुन्हेरसिंह ताराम यासारखे लोक कचारगडला आले. त्यांनी या स्थळाची ओळख आदिवासी समाजाला करुन दिली. त्यानंतर सतत या स्थळाची ओळख वाढत गेली.सन १९८४ ला माघ पौर्णिमेला धनेगावच्या प्रांगणात गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज फडकावून कचारगड यात्रेला १३ लोकांनी सुरुवात केली. आज कचारगड यात्रेला मोठे व्यापक स्वरुप आले असून दरवर्षी माघ पौर्णिमेला चार ते पाच लाख भाविक प्राकृतिक महापूजेला उपस्थिती लावतात.