शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

आदिवासीचे श्रद्धास्थान कचारगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:20 IST

देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपºयातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात.

ठळक मुद्देयात्रेत गोंडी संस्कृतीचे दर्शन : माघ पौर्णिमेला देशभरातील आदिवासींचे आगमन

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात. दरम्यान लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आदिवासींची मोठी यात्रा भरते. या यात्रेला कचारगड यात्रा म्हणून ओळखले जाते. कचारगडप्रती सर्व आदिवासी समाजाची श्रद्धा व आस्था पाहून या स्थळाला आदिवासींचे ‘मक्का मदिना’ समजू लागले आहेत. तर आदिवासी समाजातील लोक याला आपली ‘दीक्षाभूमी’ मानतात.कचारगड हे पवित्र धार्मिक व नैसर्गिक स्थळ जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर आहे. तर गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर आहे. हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले नैसर्गिक पर्यटन स्थळसुद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणाला भेट देणाºया आदिवासी भाविकांसोबतच गैरआदिवासी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. यात्रेदरम्यान येथे चारपाच लाख भाविक व पर्यटक दरवर्षी येतात. शिवाय वर्षभर येथे भाविक व पर्यटक येतात. कचारगडला जाण्यासाठी रेल्वे मार्ग आणि बस मार्ग दोन्ही सोयीस्कर असून दरेकसा रेल्वे स्टेशनवरुन ५ किमी पायी चालत कचारगड गुफेपर्यंत पोहचावे लागते. तर बस मार्गाने गेल्यास गोंदिया-डोंगरगड मार्गावर धनेगाव येथे उतरुन ४ किमी पायी चालावे लागते. कचारगडला पोहचत असताना हिरवीगार वनराई, घनदाट जंगलाने व्यापलेली मोठमोठी पर्वत रांगा बघायला मिळते. याच पर्वत रांगेच्या एका मोठ्या पहाडात मोठी विशालकाय गुफा असून ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा मानली जाते. त्याचबरोबर लगतच्या पहाडात लहानमोठ्या गुफा असून या गुफांमध्ये आदिवासींचे आद्य दैवत शंभूसेक आणि मॉ काली कंकालीचे वास्तव्य आहे.आदिवासी गोंड धर्मगुरु, जाणकार या स्थळाबद्दल व कचारगड नाव पडल्याबद्दल आपापले मत मांडत असतानाच सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, कचारगडला तीन हजार वर्षांपूर्वी गोंडी आदिवासीचा उगम झाला. त्यांची मोठी मर्मस्पर्शी कथा आहे. असे बोलल्या जाते की, माता गौराचे ३३ मानलेले पूत्र होते. ते पूत्र मोठे उपद्रवी होते. त्यामुळे रागाने शंभूसेक यांनी त्यांना कचारगडच्या गुफेत डांबून ठेवले व दारावर मोठा दगड लावून ठेवला. या प्रकारामुळे मॉ कलीकंकाली द्रवित झाली. त्यावेळी किंदरी वादक संगीतज्ज्ञ हिरासुका पाटारी यांनी आपल्या संगीताच्या शक्तीने त्या युवकांमध्ये उर्जा निर्माण केली. तेव्हा त्या ३३ युवकांनी एका ताकदीने दगडाला धक्का दिला व बाहेर पडले. मात्र यात संगीतज्ज्ञ दिशसुका पाटारी यांचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला. ते सर्व ३३ पूत्र त्या ठिकाणातून पसार झाले व पुढे जाऊन देश-प्रदेशात त्यांचे वंशज वाढले.कालांतराने गोंडीयन संस्कृतीचे रचनाकार पारी कुपार लिंगो यांनी त्या सगळ्या वंशजांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. यात ३३ कोट संगोपन, १२ पेन यांचे ७५० गोत्र या सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याला गोंडी भाषेत ‘कच्चा’ असे म्हटले जाते. म्हणून या स्थळाला कचारगड नाव देण्यात आले.एकीकडे धार्मिक मान्यता व श्रद्धा असली तरी कचारगड गुफेला भेट दिल्यावर वैज्ञानिक दृष्टीकोणातून निरीक्षण केल्यास या पर्वतरांगेत मोठ्या पहाडात कच्चे दगड असल्याने त्यांचे स्खलन होऊन पहाडात गुफा तयार झाली असावी. तसेच या गुफेत निरीक्षण केल्यास तेथे लोह व इतर खनिजांचे कच्चे अवशेष पहायला मिळतात. म्हणून या ठिकाणाचे नाव कचारगड झाले, असे बोलले जाते.हजारो वर्षांपासून प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिलेला कचारगड शेवटी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक व इतिहासकार यांच्या नजरेस आला. त्यांनी या स्थळाचा शोध घेवून अभ्यास केला व हेच आदिवासींचे उगमस्थान आहे, या निकर्षावर पोहोचले.आजपासून ३४ वर्षांपूर्वी गोंडी धर्माचार्य स्व. मोतीरावण कंगाली, संशोधक के.बा. मरस्कोल्हे, गोंड राजे वासुदेव शहा टेकाम, दादा मरकाम, सुन्हेरसिंह ताराम यासारखे लोक कचारगडला आले. त्यांनी या स्थळाची ओळख आदिवासी समाजाला करुन दिली. त्यानंतर सतत या स्थळाची ओळख वाढत गेली.सन १९८४ ला माघ पौर्णिमेला धनेगावच्या प्रांगणात गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज फडकावून कचारगड यात्रेला १३ लोकांनी सुरुवात केली. आज कचारगड यात्रेला मोठे व्यापक स्वरुप आले असून दरवर्षी माघ पौर्णिमेला चार ते पाच लाख भाविक प्राकृतिक महापूजेला उपस्थिती लावतात.