शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आदिवासीचे श्रद्धास्थान कचारगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:20 IST

देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपºयातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात.

ठळक मुद्देयात्रेत गोंडी संस्कृतीचे दर्शन : माघ पौर्णिमेला देशभरातील आदिवासींचे आगमन

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात. दरम्यान लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आदिवासींची मोठी यात्रा भरते. या यात्रेला कचारगड यात्रा म्हणून ओळखले जाते. कचारगडप्रती सर्व आदिवासी समाजाची श्रद्धा व आस्था पाहून या स्थळाला आदिवासींचे ‘मक्का मदिना’ समजू लागले आहेत. तर आदिवासी समाजातील लोक याला आपली ‘दीक्षाभूमी’ मानतात.कचारगड हे पवित्र धार्मिक व नैसर्गिक स्थळ जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर आहे. तर गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर आहे. हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले नैसर्गिक पर्यटन स्थळसुद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणाला भेट देणाºया आदिवासी भाविकांसोबतच गैरआदिवासी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. यात्रेदरम्यान येथे चारपाच लाख भाविक व पर्यटक दरवर्षी येतात. शिवाय वर्षभर येथे भाविक व पर्यटक येतात. कचारगडला जाण्यासाठी रेल्वे मार्ग आणि बस मार्ग दोन्ही सोयीस्कर असून दरेकसा रेल्वे स्टेशनवरुन ५ किमी पायी चालत कचारगड गुफेपर्यंत पोहचावे लागते. तर बस मार्गाने गेल्यास गोंदिया-डोंगरगड मार्गावर धनेगाव येथे उतरुन ४ किमी पायी चालावे लागते. कचारगडला पोहचत असताना हिरवीगार वनराई, घनदाट जंगलाने व्यापलेली मोठमोठी पर्वत रांगा बघायला मिळते. याच पर्वत रांगेच्या एका मोठ्या पहाडात मोठी विशालकाय गुफा असून ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा मानली जाते. त्याचबरोबर लगतच्या पहाडात लहानमोठ्या गुफा असून या गुफांमध्ये आदिवासींचे आद्य दैवत शंभूसेक आणि मॉ काली कंकालीचे वास्तव्य आहे.आदिवासी गोंड धर्मगुरु, जाणकार या स्थळाबद्दल व कचारगड नाव पडल्याबद्दल आपापले मत मांडत असतानाच सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, कचारगडला तीन हजार वर्षांपूर्वी गोंडी आदिवासीचा उगम झाला. त्यांची मोठी मर्मस्पर्शी कथा आहे. असे बोलल्या जाते की, माता गौराचे ३३ मानलेले पूत्र होते. ते पूत्र मोठे उपद्रवी होते. त्यामुळे रागाने शंभूसेक यांनी त्यांना कचारगडच्या गुफेत डांबून ठेवले व दारावर मोठा दगड लावून ठेवला. या प्रकारामुळे मॉ कलीकंकाली द्रवित झाली. त्यावेळी किंदरी वादक संगीतज्ज्ञ हिरासुका पाटारी यांनी आपल्या संगीताच्या शक्तीने त्या युवकांमध्ये उर्जा निर्माण केली. तेव्हा त्या ३३ युवकांनी एका ताकदीने दगडाला धक्का दिला व बाहेर पडले. मात्र यात संगीतज्ज्ञ दिशसुका पाटारी यांचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला. ते सर्व ३३ पूत्र त्या ठिकाणातून पसार झाले व पुढे जाऊन देश-प्रदेशात त्यांचे वंशज वाढले.कालांतराने गोंडीयन संस्कृतीचे रचनाकार पारी कुपार लिंगो यांनी त्या सगळ्या वंशजांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. यात ३३ कोट संगोपन, १२ पेन यांचे ७५० गोत्र या सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याला गोंडी भाषेत ‘कच्चा’ असे म्हटले जाते. म्हणून या स्थळाला कचारगड नाव देण्यात आले.एकीकडे धार्मिक मान्यता व श्रद्धा असली तरी कचारगड गुफेला भेट दिल्यावर वैज्ञानिक दृष्टीकोणातून निरीक्षण केल्यास या पर्वतरांगेत मोठ्या पहाडात कच्चे दगड असल्याने त्यांचे स्खलन होऊन पहाडात गुफा तयार झाली असावी. तसेच या गुफेत निरीक्षण केल्यास तेथे लोह व इतर खनिजांचे कच्चे अवशेष पहायला मिळतात. म्हणून या ठिकाणाचे नाव कचारगड झाले, असे बोलले जाते.हजारो वर्षांपासून प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिलेला कचारगड शेवटी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक व इतिहासकार यांच्या नजरेस आला. त्यांनी या स्थळाचा शोध घेवून अभ्यास केला व हेच आदिवासींचे उगमस्थान आहे, या निकर्षावर पोहोचले.आजपासून ३४ वर्षांपूर्वी गोंडी धर्माचार्य स्व. मोतीरावण कंगाली, संशोधक के.बा. मरस्कोल्हे, गोंड राजे वासुदेव शहा टेकाम, दादा मरकाम, सुन्हेरसिंह ताराम यासारखे लोक कचारगडला आले. त्यांनी या स्थळाची ओळख आदिवासी समाजाला करुन दिली. त्यानंतर सतत या स्थळाची ओळख वाढत गेली.सन १९८४ ला माघ पौर्णिमेला धनेगावच्या प्रांगणात गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज फडकावून कचारगड यात्रेला १३ लोकांनी सुरुवात केली. आज कचारगड यात्रेला मोठे व्यापक स्वरुप आले असून दरवर्षी माघ पौर्णिमेला चार ते पाच लाख भाविक प्राकृतिक महापूजेला उपस्थिती लावतात.