शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
4
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
5
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
6
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
7
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
8
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
9
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
10
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
11
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
12
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
13
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
14
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
15
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
16
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
17
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
18
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
19
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
20
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीचे श्रद्धास्थान कचारगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:20 IST

देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपºयातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात.

ठळक मुद्देयात्रेत गोंडी संस्कृतीचे दर्शन : माघ पौर्णिमेला देशभरातील आदिवासींचे आगमन

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : देशविदेशात वसलेल्या आदिवासी समाजाचे मूळ उगम स्थळ म्हणजे कचारगड (धनेगाव) आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमे दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी बंधू-भगिणी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत येथे नवस फेडायला येतात. दरम्यान लाखोंच्या संख्येत येणाऱ्या आदिवासींची मोठी यात्रा भरते. या यात्रेला कचारगड यात्रा म्हणून ओळखले जाते. कचारगडप्रती सर्व आदिवासी समाजाची श्रद्धा व आस्था पाहून या स्थळाला आदिवासींचे ‘मक्का मदिना’ समजू लागले आहेत. तर आदिवासी समाजातील लोक याला आपली ‘दीक्षाभूमी’ मानतात.कचारगड हे पवित्र धार्मिक व नैसर्गिक स्थळ जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर आहे. तर गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर आहे. हे एक पवित्र धार्मिक स्थळ असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले नैसर्गिक पर्यटन स्थळसुद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणाला भेट देणाºया आदिवासी भाविकांसोबतच गैरआदिवासी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात येतात. यात्रेदरम्यान येथे चारपाच लाख भाविक व पर्यटक दरवर्षी येतात. शिवाय वर्षभर येथे भाविक व पर्यटक येतात. कचारगडला जाण्यासाठी रेल्वे मार्ग आणि बस मार्ग दोन्ही सोयीस्कर असून दरेकसा रेल्वे स्टेशनवरुन ५ किमी पायी चालत कचारगड गुफेपर्यंत पोहचावे लागते. तर बस मार्गाने गेल्यास गोंदिया-डोंगरगड मार्गावर धनेगाव येथे उतरुन ४ किमी पायी चालावे लागते. कचारगडला पोहचत असताना हिरवीगार वनराई, घनदाट जंगलाने व्यापलेली मोठमोठी पर्वत रांगा बघायला मिळते. याच पर्वत रांगेच्या एका मोठ्या पहाडात मोठी विशालकाय गुफा असून ही आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा मानली जाते. त्याचबरोबर लगतच्या पहाडात लहानमोठ्या गुफा असून या गुफांमध्ये आदिवासींचे आद्य दैवत शंभूसेक आणि मॉ काली कंकालीचे वास्तव्य आहे.आदिवासी गोंड धर्मगुरु, जाणकार या स्थळाबद्दल व कचारगड नाव पडल्याबद्दल आपापले मत मांडत असतानाच सर्वसामान्यपणे असे मानले जाते की, कचारगडला तीन हजार वर्षांपूर्वी गोंडी आदिवासीचा उगम झाला. त्यांची मोठी मर्मस्पर्शी कथा आहे. असे बोलल्या जाते की, माता गौराचे ३३ मानलेले पूत्र होते. ते पूत्र मोठे उपद्रवी होते. त्यामुळे रागाने शंभूसेक यांनी त्यांना कचारगडच्या गुफेत डांबून ठेवले व दारावर मोठा दगड लावून ठेवला. या प्रकारामुळे मॉ कलीकंकाली द्रवित झाली. त्यावेळी किंदरी वादक संगीतज्ज्ञ हिरासुका पाटारी यांनी आपल्या संगीताच्या शक्तीने त्या युवकांमध्ये उर्जा निर्माण केली. तेव्हा त्या ३३ युवकांनी एका ताकदीने दगडाला धक्का दिला व बाहेर पडले. मात्र यात संगीतज्ज्ञ दिशसुका पाटारी यांचा त्या दगडाखाली दबून मृत्यू झाला. ते सर्व ३३ पूत्र त्या ठिकाणातून पसार झाले व पुढे जाऊन देश-प्रदेशात त्यांचे वंशज वाढले.कालांतराने गोंडीयन संस्कृतीचे रचनाकार पारी कुपार लिंगो यांनी त्या सगळ्या वंशजांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. यात ३३ कोट संगोपन, १२ पेन यांचे ७५० गोत्र या सगळ्यांना एका सूत्रात बांधण्याला गोंडी भाषेत ‘कच्चा’ असे म्हटले जाते. म्हणून या स्थळाला कचारगड नाव देण्यात आले.एकीकडे धार्मिक मान्यता व श्रद्धा असली तरी कचारगड गुफेला भेट दिल्यावर वैज्ञानिक दृष्टीकोणातून निरीक्षण केल्यास या पर्वतरांगेत मोठ्या पहाडात कच्चे दगड असल्याने त्यांचे स्खलन होऊन पहाडात गुफा तयार झाली असावी. तसेच या गुफेत निरीक्षण केल्यास तेथे लोह व इतर खनिजांचे कच्चे अवशेष पहायला मिळतात. म्हणून या ठिकाणाचे नाव कचारगड झाले, असे बोलले जाते.हजारो वर्षांपासून प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिलेला कचारगड शेवटी आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक व इतिहासकार यांच्या नजरेस आला. त्यांनी या स्थळाचा शोध घेवून अभ्यास केला व हेच आदिवासींचे उगमस्थान आहे, या निकर्षावर पोहोचले.आजपासून ३४ वर्षांपूर्वी गोंडी धर्माचार्य स्व. मोतीरावण कंगाली, संशोधक के.बा. मरस्कोल्हे, गोंड राजे वासुदेव शहा टेकाम, दादा मरकाम, सुन्हेरसिंह ताराम यासारखे लोक कचारगडला आले. त्यांनी या स्थळाची ओळख आदिवासी समाजाला करुन दिली. त्यानंतर सतत या स्थळाची ओळख वाढत गेली.सन १९८४ ला माघ पौर्णिमेला धनेगावच्या प्रांगणात गोंडी धर्माचे सप्तरंगी ध्वज फडकावून कचारगड यात्रेला १३ लोकांनी सुरुवात केली. आज कचारगड यात्रेला मोठे व्यापक स्वरुप आले असून दरवर्षी माघ पौर्णिमेला चार ते पाच लाख भाविक प्राकृतिक महापूजेला उपस्थिती लावतात.