शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

दर १० मिनिटाला ट्राफिक जाम

By admin | Updated: October 13, 2014 23:23 IST

दिवाळीदरम्यान शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शहरातील रस्ते आधीच अरुंद असल्याने दर १० मिनिटाला ट्राफीक जाम चित्र पहायला मिळत आहे.

गोंदिया : दिवाळीदरम्यान शहरातील बाजारपेठेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. शहरातील रस्ते आधीच अरुंद असल्याने दर १० मिनिटाला ट्राफीक जाम चित्र पहायला मिळत आहे. मात्र वाहतुकीची ही कोंडी सोडवण्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेला यश आलेले नाही. शहरातील मार्केट परिसरात होणारा हा ट्राफीक जाम होऊ नये यासाठी सुरू केलेले सर्वच प्रयत्न फसले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गोंदिया शहर बाजारपेठेकरिता प्रसिध्द असून मिनी मुंबई म्हणून गोंदियाची ओळख आहे. जिल्हाभरातीलच नाही तर जिल्ह्याबाहेरील नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्याकरिता शहरात येत असतात. शहरातील बाजारपेठ प्रामुख्याने गोरेलाल चौक, दुर्गा चौक, गांधी चौक, गंज बाजार, चांदणी चौक या परिसरात वसलेली आहे. त्यामुळे दिवाळीदरम्यान दरवर्षी या परिसरात प्रचंड गर्दी असते. शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने रस्त्यापर्यंत वाढविली आहे. बऱ्याच व्यावसायिकांनी वाहन तळाकरिता आपल्या दुकानांसमोर जागाच सोडलेली नाही. वर्दळीच्या दिवसांत बाजारपेठ परिसरात चारचाकी वाहनांच्या प्रवेशावर बंदी नसल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते. परिणामी बाजारपेठेत ट्राफीक जाम होणे तय आहे. वाहतूक नियंत्रण विभागाकडून दिवाळीदरम्यान शहरातील बाजारपेठ परिसरात बॅरिकेटस् लावून तसेच काही ठिकाणी वाहतूक नियंत्रण शिपायांची नियुक्ती करून वाहतूकीला सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो. तर यासोबतच ‘वन साईड पार्किंग’चा प्रयोग देखील बाजार भागात सुरू आहे. वाहतूक नियंत्रण विभागाकडून वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून अशा विविध उपाययोजना केल्या जातात. एवढेच नाही तर नियत्र्ांण विभागाचे वाहन देखील शहरात दिवसातून दोन तीन वेळा फिरत असते. मात्र या विभागाचे कर्मचारी वाहनातूनच केवळ फुटपाथ व्यावसायिकांना समज देऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींवरच कारवाई करुन मोकळे होतात. वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे योग्य नियोजन न केल्याने याचा फटका वाहनचालक व ग्राहकांना सहन करावा लागतो. विशेष म्हणजे ज्या कालावधीत शहरात वाहनांची वर्दळ अधिक असते नेमके त्याच वेळेस या वाहतूक नियंत्रण विभागाने नियुक्त केलेले शिपाई आपल्या जागेवर नसतात. काही जण गाडीचालकांकडून चलान फाडण्यात व्यस्त असतात. त्यामुळे वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. गोरेलाल चौक, दुर्गा चौक, गांधी चौक, गंज बाजार, चांदणी चौक या भागातून दुपारच्या वेळेस वाहनचालकांना व बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना मोठे अग्निदिव्यच पार करुन यावे लागते. ज्या व्यावसायिकांनी रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले आहे ते देखील आपले अतिक्रमण काढून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करीत नाहीत. त्यामुळे विस्कळीत वाहतुकीवरुन अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. काही पालक आपल्या अल्पवयीन पाल्यांच्या हाती वाहने देतात. त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती नसल्याने अनागोंदी वाहतूक व्यवस्थेत आणखीच भर पडत आहे. शहरातील विस्कळीत वाहतुकीला जेवढा वाहतूक नियंत्रण विभाग जबाबदार आहे तेवढेच या शहरातील नागरिक, व्यापारी व नगर प्रशासन देखील जबाबदार ठरत आहेत. एकंदरीत वाहतूक नियंत्रण विभागाचे शहरातील वाहतूकीवरील नियंत्रण सुटले असून त्यामुळेच बाजार परिसरात दर १० मिनिटाला ट्राफीक जाम होतो.(शहर प्रतिनिधी)