शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

यंदा लागणार ‘माहेरची झाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:42 IST

वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना समजून यंदा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देवृक्षारोपण ‘आनंद व स्मृतित : सात तालुक्यात शंभर टक्के खड्डे खोदकाम

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना समजून यंदा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. वृक्षारोपनाला सामाजिक टच देऊन जन्माला आलेली बालके, तरूणांचे झालेले विवाह, गावातील तरूणांना लागलेली नोकरी, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांच्या उत्साहाला द्वीगुणीत करण्यासाठी त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. गावातील कन्या विवाह होऊन बाहेर गेल्या त्यांचा संसार फळासारखा बहरावा यासाठी त्या कन्यांसाठी ‘माहेरची झाडी’ असे संबोधण्यात येणार असून पालकांच्या हस्ते रोपटे लावले जाणार आहेत. नववधूंना माहेरच्यांनी रोपटे देऊन त्यांना आशिर्वाद दिले जाणार आहे.महाराष्ट्रातील वनक्षेत्र २० टक्यावरून ३३ टक्क्यावर नेण्यासाठी हरित महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. १ जुलै रोजी करण्यात येणाऱ्या या वृक्षारोपणाला वृध्दीगंत करण्यासाठी शासनाने यंदाचे वृक्षारोपण कुणा-कुणाच्या हातून करावे यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. ग्रामसेवकांनी गावातील लोकांची या पाच मुद्याच्या आधारावर माहिती गोळा करून १ जुलै ला त्यांच्या हातून वृक्षारोपण करावे. सभापती, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच व इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.१ जुलैला वृक्षदिंडी काढून वृक्षदिंडीत गावकरी मोठ्या संख्येत सहभागी करून घेण्याचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) राजेश बागडे यांनी २० जून रोजी जिल्ह्यातील सर्व खंडविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.५ लाख ७२ हजार खड्डे तयार१ जुलै रोजी जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायती वृक्षारोपण करणार आहे. त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम करण्यात आले. गोंदिया तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खड्डे खोदण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. आमगाव तालुक्यात ६२ हजार ७००, अर्जुनी-मोरगाव ७७ हजार, देवरी ६० हजार ५००, गोरेगाव ६० हजार ५००, सालेकसा ४६ हजार २००, सडक-अर्जुनी तालुक्याने ६९ हजार ३००, तिरोडा तालुक्यात १ लाख ४ हजार ५०० खड्डे खोदले. या सात तालुक्यांनी १०० टक्के खड्डे खोदले. तर गोंदिया तालुक्याला १ लाख १९ हजार ९०० खड्डे खोदण्याचे उद्दीष्ट असताना केवळ ९२ हजार खड्डे तयार केले आले आहे.या पाच मुद्यांवर होणार वृक्षारोपणशुभेच्छा वृक्ष : वर्षभरात गावात जन्माला आलेल्या बालकांना शुभेच्छा म्हणून त्या घरातील लोकांनी रोपटे लावावे व त्याचे जतन करावे.शुभमंगल वृक्ष: वर्षभरात गावात ज्या तरूणांचे विवाह झाले त्या तरूणांनी वृक्षारोपण करून त्या रोपट्यांचे संवर्धन करावे.आनंद वृक्ष : दरवर्षी गावातील दहावी, बारावीतून विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यांनी वृक्षारोपण करावे, तसेच वर्षभरात नोकरीवर लागलेले तरूण-तरूणी यांनी वृक्षारोपण करावे.माहेरची झाडी : गावात वर्षभरात विवाह झालेल्या कन्येच्या माहेरच्या लोकांनी फळझाडांची रोपे देऊन मुलींना ती रोपटे लावण्यास व त्यांचे संगोपण करण्यास बाध्य करणे, रोपटे देऊन शुभार्शिवाद देण्याचा संकल्प आहे.स्मृति वृक्ष: वर्षभरात निधन झालेल्या गावातील व्यक्तीच्या कुटुंबाना रोपटे देऊन त्यांना श्रध्दांजली म्हणून रोपटे लावावे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीचे जतन करण्यासाठी वृक्षारोपण करावे.