शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

यंदा आंब्याला मुकली गावरान अमराई

By admin | Updated: April 9, 2016 02:05 IST

जवळील परिसरात अनेक लहान-मोठ्या अमराईच्या बागा आहेत. गावातही आम्रवृक्ष असून गावालगतच्या अमराई हिरव्यागार दिसतात.

उत्पादनच नाही : आंब्यांच्या चवीपासून दुरावणार नागरिक, फळांचा राजा मिळणे कठीणबाराभाटी : जवळील परिसरात अनेक लहान-मोठ्या अमराईच्या बागा आहेत. गावातही आम्रवृक्ष असून गावालगतच्या अमराई हिरव्यागार दिसतात. पण त्या अमराईतील वृक्षांना आंबे लागल्याचे दिसतच नाही. त्यामुळे यंदा आंब्याविना अमराई पोरखी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.तांदूळ व तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात डोंगराळ भाग आहे. हा भाग निसर्गाने नटलेला व पानाफुलांनी बहरलेला आहे. डोंगराळ भागात अनेक प्रकारची झाडे असून आयुर्वेदिक औषधी वनस्पतीसुद्धा आहेत. तसेच आम्रवृक्षसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यंदा फळांचा राजा आंबा दुर्मिळ झाल्याचे दिसून येत आहे.यंदा सन २०१६ लागताच हवा, वादळवारा, पाऊस व गारपिटी यामुळे आम्रवृक्षांना येणारा बहर आधीच गळून पडला. हिरवी पालवीसुद्धा योग्यरीत्या फुटली नाही. पाने, फुले नाहीत तर फळ कुठून लागणार. हा प्रकार निसर्गाच्या कोपामुळे घडला. बऱ्याचवेळी वादळी वाऱ्यामुळे आम्रबहर झडून गेला. त्यामुळे यंदा आंब्यांचे उत्पादन होणार नसून नागरिकांना चाखायलासुद्धा आंबे मिळणे कठिण झाले आहे. गावरान आंब्यांचे उत्पादन नसल्याने बाहेरील आंबे महागणार असून अधिक किंमत मोजून ते खरेदी करावे लागण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.गावरान अमराईचे दृश्य पाहिले तर किव येणाऱ्यासारखे चित्र दिसते. अमराई आंब्याविना पोरकी दिसते. तिचे सौंदर्यच हरवल्यागत झाले आहे. कोकिळेचा मधूर आवाज नाही, पक्ष्यांची किलबिल नाही, गर्द सावली दिसत नाही. रस्तासुद्धा मरमटला दिसतो. अमराईत खेळणारी मुलेसुद्धा दिसत नाही. अमराई सर्वांनिच मुकल्याचे वास्तव चित्र आहे. ही निसर्गाची किमया की कोप, असा सवाल अमराईचे मालक करतात. लोणच, पन्हा, आमरस, खुला हे सर्व यंदा मिळणार नाही. तर आंब्यांच्या घुया एकत्र करून, वाळवून, नंतर त्यांना विकून मिळणाऱ्या रोजगारावरही संक्रांत आली आहे. यंदा फळांच्या राजाच्या अभावाने अनेक समस्या उद्भवत आहेत. रोजगार, आमरसाची चव व विविध मिळणारे पदार्थ, हे मिळणार नाहीच. यावर्षी पळसफुले रोमांचकारी व आल्हाददायक वाटत होती तर आंबे मात्र बेपत्ता झाल्यासारखेच आहेत. उन्हाळा ऋतूत जो आनंद गावरान अमराईत मिळायचा, तो हरवला आहे. अमराईतील खेळही हरपले. अमराईच्या सावलीत फिरणारे-बाळगणारे मुले-मुलीसुद्धा यंदा आंबे नसल्याने दिसून येत नाही. अन्यथा सुट्टीमध्ये मामाच्या गावाला येणारी मुले ही अमराईतच खेळायची, आंबे खायची. तो काळ, ते दिवस यंदा गहाळ झाले आहेत. काळ जसजसा आधुनिक होत आहे तसतसा अमराईतील खेळही हद्दपार होत आहे.ग्रामीण भागात भर उन्हाचे चटके सहन करीत अमराईमध्ये फेरफटका मारत असताना असे चित्र यंदा साक्षात दिसून येत आहे. (वार्ताहर)