शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

त्या १२ मोटारसायकल कुणाच्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:40 IST

गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. परंतु पोलिसांनी जप्त केलेल्या २० पैकी ८ मोटारसायकलचे मालक पोलिसांना माहिती झाले.

ठळक मुद्दे८ मोटारसायकलचे मालक मिळाले : पाच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या आठ सदस्यांकडून चोरीच्या २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. परंतु पोलिसांनी जप्त केलेल्या २० पैकी ८ मोटारसायकलचे मालक पोलिसांना माहिती झाले. परंतु १२ मोटारसायकलचे मालक कोण हा प्रश्न पोलिसांसमोर आहे.स्थानिक गुन्हे शाखेने १० मार्च रोजी गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम मजीतपूर परिसरात ८ जणांना पकडले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ २० मोटारसायकल आढळल्या. जप्त केलेल्या २० मोटारसायकल पैकी ८ मोटारसायकलचे गुन्हे तिरोडा, गोंदिया शहर, रावणवाडी, गोंदिया ग्रामीण व रामनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. परंतु जप्त करण्यात आलेल्या त्या १२ मोटारसायकल कुणाच्या आहेत याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. ज्या लोकांचे वाहन चोरीला गेले त्यांनी पोलिसात तक्रारच दिली नाही. त्यामुळे मिळालेली वाहने कुणाची याची माहिती पोलिसांनाही मिळू शकली नाही.जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलची किंमत ९ लाख ६५ हजार रूपये आहे.मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. वर्ष दीड वर्षात शेकडो मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. परंतु यासंदर्भात कमी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपी ६ दिवसांपासून पीसीआरमध्ये१० मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. आरोपी शिवम संतोष खरोले (१९), शुभम रमेश पटले (२०), जितेंद्र सेवकराम साकोरे (२२रा. मजीतपूर), सलाम रफीक शेख (२०), राहूल रविंद्र मस्करे (२०),राकेश रामदास मडावी (२७), प्रवीण उर्फ छोटू गणेश बिसेन (२५) व गणेश प्रल्हाद मेश्राम (२०,रा. गंगाझरी) यांना न्यायालयाने सुरूवातीला १३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर १६ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. शनिवारी सायंकाळी त्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पोलिसांच्या भीतीपोटी तक्रार देत नाहीतज्यांचे वाहन चोरीला गेले ते लोक तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांच्याशी डायरी अमलदाराची असलेली वागणूक हिन दर्जाची राहात असल्यामुळे अनेक लोक पोलीसांकडे तक्रार करीत नाही. वाहन चोरीला गेल्यावर तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचलेल्या वाहन मालकाला एक ना अनेक प्रश्न करीत जणू त्यानेच अपराध केला असे वर्तन पोलिसांकडून होत असल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे अनेक लोक मोटारसायकल चोरी झाल्याचे नुकसान सहन करतात परंतु तक्रार देत नाही. आपल्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची वाढ दिसू नये यासाठी पोलीसही गुन्हे दाखल करून घेत नाही. याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस