शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानेच उद्धव ठाकरेंची ही दशा; चंद्रशेखर बावनकुळेंची खरमरीत टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2022 17:55 IST

आगामी सर्व निवडणुका शिंदे गटासह एकत्रित लढविणार - चंद्रशेखर बावनकुळे

गोंदिया : समविचारी पक्षांना डावलून आणि हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी केली. तेव्हापासून त्यांच्या पक्षाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून न घेता केवळ एककल्ली विचार केला. त्यामुळे त्यांची आज ही दशा झाली आहे. यापुढे त्यांचा पक्ष केवळ हम दो आणि हमारे दो पर्यंतच मर्यादित दिसेल अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

प्रदेशाध्यक्षपदाची सत्रे हाती घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पहिल्यांदाच बुधवारी (दि.१२) गोंदिया येथे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आतापर्यंत आपण १९ जिल्ह्यांचा दौरा केला असून हा २० वा जिल्हा असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट अशी युती करून यापुढे सर्व निवडणुका लढण्याची आम्ही तयारी केली आहे. ४५ लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा जिकंण्याचा संकल्प आम्ही केला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संघटन बांधणी आणि पक्षाच्या विस्तार करण्यासाठी जिल्हानिहाय दौरे सुरू असल्याचे बावनकुळे म्हणाले.

भारताला शक्तिशाली करण्यासाठी युवा वॉरियर्स भाजपसोबत जोडत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला, अशा लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी अभियान राबविले जाणार आहे. २०२४ पर्यंत दोन कोटी लाभार्थी या अभियानात सहभागी होतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी पत्रकार परिषदेला खा. सुनील मेंढे, अशोक नेते, आ. विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्ष पकंज रहांगडाले, परिणय फुके, माजी आ. गोपालदास अग्रवाल, हेमंत पटले, माजी नगराध्यक्ष वीरेंद्र अंजनकर, रमेश कुथे, अश्विनी जिचकार उपस्थित होते.

शिफारशीवर नव्हे जनमतावर तिकीट

आगामी नगर परिषद, महानगर पालिका व इतर निवडणुकीत उमेदवारी देताना कुणाची शिफारशी ती मिळणार नसून जनमत घेऊनच तिकीट देण्यात येणार आहे. यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा आधार आणि जनतेचा कल कुणाला आहे, त्याच उमेदवाराला तिकीट दिले जाईल असे बावनकुळे यांनी सांगितले.

नाना पटोलेंना गांभीर्याने घेऊन नका

दिवस निघाला की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप टीका करीत असतात. अलीकडे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका असे बावनकुळे यांनी सांगितले.

दहिवले घेणार हातात कमळ

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले यांनी बुधवारी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यांच्यात जवळपास पंधरा मिनिटे बंद चर्चा झाली. दहिवले हे मागील काही दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या दुय्यम वागणुकीने नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने ते लवकरच हातात कमळ घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान या संदर्भात दहिवले यांना विचारले असता ही औपचारिक भेट असल्याचे सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा