शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

रब्बीसाठी पाणी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:35 IST

यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे.

ठळक मुद्देपाण्याचे पिण्यासाठी आरक्षण : पाण्याअभावी यंदा रब्बीचा हंगाम धोक्यात

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे. यामुळेच प्रकल्पांतील पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण करण्यात आले असून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही. यावरून जिल्ह्यात रब्बीचा हंगाम धोक्यात दिसत आहे.जिल्ह्याला धानाचे कोठार अशी साजूक उपमा देण्यात आली आहे. वास्तविक प्रमुख पीकही धानच आहे. मात्र बदलत्या काळानुरूप निसर्गाचा लहरीपणा वाढला असून धानाच्या या कोठारात आता धानालाच ग्रहण लागू लागले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत चालले असून शेतीला फटका बसतच चालला आहे. परिणामी शेतकरी दारिद्रयात झोकला जात असतानाच धानाचे उत्पादनही घटत चालले आहे. यात धानच काय सर्वच शेती नेस्तनाबूत होऊ लागल्याचे भकास वास्तव आज जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती करीत आहेत. मात्र पाऊस आपला रंग दाखवून त्यांचे जीवन बेरंग करीत आहे.परिणामी शेती महागडी होऊ लागली असून शेतकºयांचा निसर्गावरील भरवसा उठू लागला आहे. खरिपातही पावसाने आपला रंग दाखविला. त्यात पाटबंधारे विभागाने सिंचनाची सोय करून दिल्याने कितीतरी शेतकºयांचे पीक बचावले. पाटबंधारे विभागच देव बनून शेतकºयांसाठी धावून आल्याचे दिसून आले व नेहमी विभागाकडून सिंचनाची सोय केली जाते. याचेच फलीत आहे की, जिल्ह्यातील शेतकरी आजही पावसाच्या लहरीपणावर नव्हे तर पाटबंधारे विभागाच्या भरवशावर आपली शेती करीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.यात रब्बीचा हंगाम तर पूर्णपणे पाटंबधारे विभागावरच अवलंबून असतो असे म्हणता येईल. यंदा मात्र पावसाने दगा दिल्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठी बघून पाटबंधारे विभाग शेतीला पाणी देण्यातबाबत हतबल दिसून येत आहे.प्रकल्पांतील पाणीसाठा बघता भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हाधिकाºयांनी पाणी पिण्यासाठी आरक्षीत करून सिंचनासाठी देण्यास मनाई केल्याचे आदेश काढले आहेत. यामुळे मात्र जिल्ह्यातील रब्बीचा हंगाम यंदा धोक्यातच दिसून येत आहे.बाघ प्रकल्पातून मदत नाहीबाघ प्रकल्पांतर्गत सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड प्रकल्प येतात. यातील सिरपूर व कालीसराड प्रकल्पांतील पाणी पुजारीटोला प्रकल्पाला दिले जाते. त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पाच्या कालव्यांतून पाणी सोडले जाते. यात जिल्ह्यासह मध्यप्रदेश राज्यातही सिंचनाची सोय केली जाते. दरवर्षी १ जुलै ते ३१ आॅक्टोबर हा खरिपाचा हंगाम समजला जात असून ३१ आॅक्टोबर रोजी प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा बघून पुढचे नियोजन केले जाते. सध्या मात्र पुजारीटोला प्रकल्पात फक्त २५ टक्के पाणीसाठा आहे. पाणी कमी प्रमाणात असल्याने त्यातही रब्बीसाठी पाणी दिल्यास भविष्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार. हे लक्षात घेत जिल्हाधिकाºयांनी पाणीसाठा येत्या ३० जून २०१८ पर्यंत पिण्यासाठी आरक्षित केला असल्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुजारीटोला प्रकल्पातून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही.इटियाडोहचा विषय पाणी वापर संस्थांकडेसन २००५ च्या कायद्यानुसार प्रकल्पांतील पाण्याचा वापर कसा करावा यासाठी पाणी वापर संस्थांचे गठन करायचे आहे. त्यानुसार, इटियाडोह प्रकल्पासाठी ५५ पाणी वापर संस्था आहेत. इटियाडोह प्रकल्पातून खरिपात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या दोन तालुक्यांना, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याला तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सिंचन केले जाते. सध्या प्रकल्पात १०८.९८ दलघमी (३४ टक्के) पाणीसाठा आहे. यातील ४ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षीत असल्याने उर्वरीत १०४ दलघमी पाणी रब्बीसाठी घ्यायचे की नाही हा निर्णय पाणी वापर समितीचे अध्यक्ष ठरवणार आहेत. अद्याप त्यांची बैठक झालेली नसल्याने इटियाडोह प्रकल्पाची स्थिती स्पष्ट झालेली नाही.