शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

रब्बीसाठी पाणी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:35 IST

यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे.

ठळक मुद्देपाण्याचे पिण्यासाठी आरक्षण : पाण्याअभावी यंदा रब्बीचा हंगाम धोक्यात

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा पावसाने दिलेल्या दग्यामुळे जिल्ह्याचे संपूर्ण नियोजनच फिस्टकले आहे. कमी पावसामुळे प्रकल्पांत मोजकाच पाणीसाठा उपलब्ध असून अशात रब्बीसाठी पाणी दिल्यास येणारा काळ कठीण जाणार आहे. यामुळेच प्रकल्पांतील पाण्याचे पिण्यासाठी आरक्षण करण्यात आले असून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही. यावरून जिल्ह्यात रब्बीचा हंगाम धोक्यात दिसत आहे.जिल्ह्याला धानाचे कोठार अशी साजूक उपमा देण्यात आली आहे. वास्तविक प्रमुख पीकही धानच आहे. मात्र बदलत्या काळानुरूप निसर्गाचा लहरीपणा वाढला असून धानाच्या या कोठारात आता धानालाच ग्रहण लागू लागले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत चालले असून शेतीला फटका बसतच चालला आहे. परिणामी शेतकरी दारिद्रयात झोकला जात असतानाच धानाचे उत्पादनही घटत चालले आहे. यात धानच काय सर्वच शेती नेस्तनाबूत होऊ लागल्याचे भकास वास्तव आज जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती करीत आहेत. मात्र पाऊस आपला रंग दाखवून त्यांचे जीवन बेरंग करीत आहे.परिणामी शेती महागडी होऊ लागली असून शेतकºयांचा निसर्गावरील भरवसा उठू लागला आहे. खरिपातही पावसाने आपला रंग दाखविला. त्यात पाटबंधारे विभागाने सिंचनाची सोय करून दिल्याने कितीतरी शेतकºयांचे पीक बचावले. पाटबंधारे विभागच देव बनून शेतकºयांसाठी धावून आल्याचे दिसून आले व नेहमी विभागाकडून सिंचनाची सोय केली जाते. याचेच फलीत आहे की, जिल्ह्यातील शेतकरी आजही पावसाच्या लहरीपणावर नव्हे तर पाटबंधारे विभागाच्या भरवशावर आपली शेती करीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.यात रब्बीचा हंगाम तर पूर्णपणे पाटंबधारे विभागावरच अवलंबून असतो असे म्हणता येईल. यंदा मात्र पावसाने दगा दिल्यामुळे प्रकल्पांतील पाणीसाठी बघून पाटबंधारे विभाग शेतीला पाणी देण्यातबाबत हतबल दिसून येत आहे.प्रकल्पांतील पाणीसाठा बघता भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेत जिल्हाधिकाºयांनी पाणी पिण्यासाठी आरक्षीत करून सिंचनासाठी देण्यास मनाई केल्याचे आदेश काढले आहेत. यामुळे मात्र जिल्ह्यातील रब्बीचा हंगाम यंदा धोक्यातच दिसून येत आहे.बाघ प्रकल्पातून मदत नाहीबाघ प्रकल्पांतर्गत सिरपूर, पुजारीटोला व कालीसराड प्रकल्प येतात. यातील सिरपूर व कालीसराड प्रकल्पांतील पाणी पुजारीटोला प्रकल्पाला दिले जाते. त्यानंतर पुजारीटोला प्रकल्पाच्या कालव्यांतून पाणी सोडले जाते. यात जिल्ह्यासह मध्यप्रदेश राज्यातही सिंचनाची सोय केली जाते. दरवर्षी १ जुलै ते ३१ आॅक्टोबर हा खरिपाचा हंगाम समजला जात असून ३१ आॅक्टोबर रोजी प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा बघून पुढचे नियोजन केले जाते. सध्या मात्र पुजारीटोला प्रकल्पात फक्त २५ टक्के पाणीसाठा आहे. पाणी कमी प्रमाणात असल्याने त्यातही रब्बीसाठी पाणी दिल्यास भविष्यात पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार. हे लक्षात घेत जिल्हाधिकाºयांनी पाणीसाठा येत्या ३० जून २०१८ पर्यंत पिण्यासाठी आरक्षित केला असल्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पुजारीटोला प्रकल्पातून यंदा रब्बीसाठी पाणी दिले जाणार नाही.इटियाडोहचा विषय पाणी वापर संस्थांकडेसन २००५ च्या कायद्यानुसार प्रकल्पांतील पाण्याचा वापर कसा करावा यासाठी पाणी वापर संस्थांचे गठन करायचे आहे. त्यानुसार, इटियाडोह प्रकल्पासाठी ५५ पाणी वापर संस्था आहेत. इटियाडोह प्रकल्पातून खरिपात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या दोन तालुक्यांना, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याला तर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्याला सिंचन केले जाते. सध्या प्रकल्पात १०८.९८ दलघमी (३४ टक्के) पाणीसाठा आहे. यातील ४ दलघमी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षीत असल्याने उर्वरीत १०४ दलघमी पाणी रब्बीसाठी घ्यायचे की नाही हा निर्णय पाणी वापर समितीचे अध्यक्ष ठरवणार आहेत. अद्याप त्यांची बैठक झालेली नसल्याने इटियाडोह प्रकल्पाची स्थिती स्पष्ट झालेली नाही.