शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

जीवनात यश प्राप्तीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पुढे बोलताना, आमदार चंद्रिकापुरे यांनी, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील नाते त्रिसुत्रीय आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे व पालकांचे परीक्षण करणे गरजेचे आहे. पाल्यांना संवेदनशिलतेने बोलते करा. त्यांच्या समस्या जाणून घ्या.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : आश्रमशाळेत विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : आजच्या विज्ञान युगात शिक्षण अतिमहत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेबांचे नाव शिक्षणामुळेच जगभरात नावारुपास आले. शिक्षणातूनच वृत्तपत्र विकणाऱ्या डॉ. अब्दुल कलाम यांना शास्त्रज्ञापासून राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारता आली. शिक्षणाशिवाय आपण काहीच करु शकत नाही. जीवनात यश प्राप्तीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.शासकीय आश्रमशाळेत आयोजित विद्यार्थी, शिक्षक व पालक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सरीता कापगते होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सडक-अर्जुनीचे नगराध्यक्ष देवचंद तरोणे, पं.स.सदस्य गीता टेंभरे, प्राचार्य प्रकाश धोटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष छत्रपाल परतेकी, उपाध्यक्ष मालता उईके, पोलीस पाटील रविता उईके, सरपंच मोहनलाल बोरकर, आनंद इळपाते, पवन टेकाम, कृपासागर जनबंधू, रजनी दशरिया, चंद्रमुनी बंसोड, मुख्याध्यापक एच.के.किरणापुरे, मंगल वैद्य, यशवंत सलामे, भोंगाडे, अनिल पंधरे, राष्ट्रवादी विद्यार्थी परिषद अध्यक्ष आशिष येरणे उपस्थित होते.सर्वप्रथम विद्येची देवता माता सरस्वती व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रांचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. पुढे बोलताना, आमदार चंद्रिकापुरे यांनी, विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील नाते त्रिसुत्रीय आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचे व पालकांचे परीक्षण करणे गरजेचे आहे. पाल्यांना संवेदनशिलतेने बोलते करा. त्यांच्या समस्या जाणून घ्या. त्यांच्याकडून केवळ परीक्षेतील गुणांची अपेक्षा न करता त्यांच्या आवडीनिवडीच्या क्षेत्राला प्राधान्य द्या. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा भविष्याचा विचार करुन शिक्षणालाच प्रथम प्राधान्य देणे काळाची गरज आहे असा मोलाचा सल्लाही दिला.याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक विंचूरकर यांनी, कुष्ठरोग व क्षयरोगावर विस्तृृत माहिती दिली. डॉ. प्रकाश धोटे यांनी, अंधश्रद्धा निर्मूलनावर भाष्य करुन प्रात्यक्षिक करुन दाखविले. जि.प.सदस्य सरीता कापगते यांनी, आदिवासी समाजाचा विकास घडवून आणायचा असेल तर शिक्षणाला प्राधान्य द्या. शिक्षण म्हणजे कधीही न संपणारी शिदोरी आहे. आदिवासींच्या सर्वागिण विकासाकरीता शासनाकडून सर्वतोपरी उपाय केले जात असल्याचे सांगीतले. सामाजिक कार्यकर्ता पवन टेकाम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी क्रिडा शिक्षक के.बी.चव्हाण यांनी विद्यार्थ्याकरवी अप्रिय लेझीम सादर केली. प्रास्ताविक मुख्याध्यापक एच.के.किरणापुरे यांनी मांडले. संचालन शिक्षिका आर.व्ही.ब्राम्हणकर यांनी केले. आभार प्रा.के.के.पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Educationशिक्षण