शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थ्यांची वाहतूक पुन्हा झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 11:00 PM

शहरातील विवेक मंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन नवीन बायपास रोडवर रस्त्याच्या खाली उतरून डबक्यात उलटली होती. सुदैवाने या अपघातात काही अप्रिय घडले नाही व सर्व विद्यार्थी सुखरूप होते. मात्र, या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाला धसका बसला होता. तर पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन चिंतीत झाले होते.

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन रस्त्याशेजारी डबक्यात उलटल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेनंतर वाहतूक नियंत्रण शाखेने त्या मार्गावर बंदोबस्त लावून पाचपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत हा क्रम चालला. मात्र, मागील काही दिवसांपासून परत विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक सुरू झाल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई फक्त ‘चार दिन की चांदनी’च ठरल्याचे बोलले जात आहे. शहरातील विवेक मंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन नवीन बायपास रोडवर रस्त्याच्या खाली उतरून डबक्यात उलटली होती. सुदैवाने या अपघातात काही अप्रिय घडले नाही व सर्व विद्यार्थी सुखरूप होते. मात्र, या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाला धसका बसला होता. तर पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन चिंतीत झाले होते. यावर पोलिस विभागाने लगेच कडक पाऊल उचलले व वाहतूक नियंत्रण शाखेकडून बायपास रोडवरील राजा भोज चौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. हे पोलिस पाचपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. परिणामी विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक बंद होती. मात्र, दोन-अडीच महिन्यांतच परिस्थिती जैसे थे झाली आहे. कारण ­दिवाळीनंतर आता शाळा सुरू झाल्या असून, वाहनांत विद्यार्थी परत एकदा कोंबून नेले जात असल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेला २० ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेचा विसर पडला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांनी परत एकदा आपली मनमर्जी सुरू केल्याची दिसते. यात मात्र विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. 

कित्येकदा घडले असले अपघात - २० ऑगस्ट रोजी स्कूल व्हॅनचा घडलेला अपघात हा काही पहिलाच अपघात नव्हता. यापूर्वी आणखीही अपघात घडले आहेत. अशात एकतर वाहनचालकांनी खबरदारीने वाहन चालविणे गरजेचे आहे. शिवाय, त्यांच्याकडून नियम मोडला जात असल्यास पोलिस विभागाने नजर ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने अपघात घडत आहेत.

थोड्या अंतरावर उतरविले जात होते विद्यार्थ्यांना राजा भोज चौकात पोलिसांचा बंदोबस्त असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन चालक त्यांना चौकापासून थोड्या अंतरावर गाडीतून उतरवित होते. त्यानंतर त्यातील ५-५ विद्यार्थ्यांना बसवून शाळेत सोडत होते. तर काही विद्यार्थी पायी-पायीच शाळेत जात असल्याचेही दिसत होते. आतापर्यंत हाच प्रकार सुरू होता. मात्र, दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या असून, आता पाचपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून त्यांची ने-आण सुरू आहे. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण