शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

टार्गेट २७० कोटीचे वाटप ८३ कोटीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी १० कोटी ५७ लाख अशा एकूण ८२ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासर्व बँकांनी आतापर्यंत ३०.७१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक आघाडीवर : राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ काहीच दिवस शिल्लक असताना अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकरीपीक कर्ज मिळण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. शासनाने जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना खरीप हंगामात २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र आत्तापर्यंत केवळ ८३ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारीवर नजर टाकल्यास केवळ ३०.७१ टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा तरी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही याबाबत शंका आहे.शेतकरी खरीप हंगामात आर्थिक चणचण भासू नये, त्यांच्यावर सावकार किंवा व्यापाऱ्यांच्या दारात जावून व्याजाने पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पीक कर्जाचे वाटप केले जाते. नाबार्ड आणि शासनाकडून दरवर्षी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते.यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी १० कोटी ५७ लाख अशा एकूण ८२ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासर्व बँकांनी आतापर्यंत ३०.७१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.खरीप हंगाम अगदी तोंडावर असताना बँकांकडून केवळ ३० टक्के पीक कर्ज वाटप झाले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी अजूनही पीक कर्ज मिळण्यापासून वंचित आहे. जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत बँकांना अद्यापही शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यात यश आलेले नाही. राष्ट्रीयकृत बँकातून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे.वांरवार चकरा मारुन सुध्दा पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी या बँकामध्ये जाणे टाळतात. तर जिल्हा बँकेची प्रक्रिया त्या तुलनेत बरीच सुलभ आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ही बँक आपली वाटत असल्याने शेतकरी सुध्दा याच बँकेतून अधिक पीक कर्जाची सर्वाधिक उचल करतात. त्यामुळेच आतापर्यंत जिल्हा बँकेने सर्वाधिक ६६ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे.कोरोनामुळे पीक कर्ज मेळाव्यांवर संकटमागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी तालुका स्तरावर कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन केले जात होते. मात्र यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करणे कठीण आहे.अशा स्थितीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी