शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
3
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
4
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
5
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
6
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
7
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
8
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
9
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
10
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
11
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
12
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
13
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
14
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
15
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
16
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
18
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
19
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची धांदल

By admin | Updated: November 29, 2014 01:37 IST

उच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. त्यामुळे बारावीत असलेल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी ....

गोंदिया : उच्च शिक्षणासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. त्यामुळे बारावीत असलेल्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज मागविले जातात. मात्र यावर्षी हे अर्ज सरळ नागपूरच्या विशेष समाजकल्याण कार्यालयातील जात पडताळणी प्रमाणपत्र विभागाकडे विद्यार्थ्यांनी सादर करावे, असे आदेश देण्यात आल्यामुळे हजारो विद्यार्थी अडचणीत आले आहे. ऐन परीक्षांच्या तोंडावर अभ्यास करायचा की जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी नागपूरच्या चकरा करायच्या, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.
उच्च शिक्षणासाठी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात जात पडताळणी प्रमाणपत्र मागविले जाते. या पडताळणी प्रमाणपत्रासाठी बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करावे लागता. मागच्यावर्षीपर्यंत विशेष समाजकल्याण कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर अर्ज मागवून शिबिरे घेतली जात होती. त्या शिबिरात जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जात होते.
यावर्षी ६ आॅगस्ट व ११ आॅगस्ट या दोन तारखा निघून गेल्या, मात्र या तारखांना विद्यार्थ्यांकडून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्जच मागविण्यात आले नाही. वेळ गेल्यानंतर आता शिबिरे कशी घ्यायची म्हणून विशेष समाजकल्याण विभाग नागपूरने एक शक्कल लढविली व ज्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचे आहे त्यांनी सरळ कार्यालय गाठून स्वत: अर्ज करावे असे आवाहन केले. त्यामुळे आदिवासी व नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली.
गोंदिया जिल्ह्यात विज्ञान शाखेत बारावी करणारे यावर्षी ७८५१ विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज भासणार आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांना वेळ नाही, कुणाकडे पैसा नाही तर अनेक विद्यार्थ्यांनी नागपूरच पाहिले नाही अशी परिस्थिती असताना परीक्षेच्या तोंडावर विशेष समाजकल्याण विभाग त्यांचा छळ करीत आहे. नागपूरला येण्याजाण्यासाठी पैशाचा अपव्यय व वेळ वाया जाईल त्यामुळे जिल्हा स्तरावर सोय करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)