शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

पहिली ते चौथीतील विद्यार्थी शाळेत जाण्यास उत्सुक; पण पालक म्हणतात तूर्तास नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

अजून काही दिवस वाट पाहू. त्यानंतरच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेऊ. मात्र, तूर्तास तरी यासाठी घाई नको, असा सूर पालकांमध्ये आहे, तर मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने पहिली ते चौथीचे सर्वच विद्यार्थी घरीच आहेर. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी मुले घरी राहून कंटाळली आहेत. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे, तर कधी एकदाची शाळा सुरू होते आणि आपले आई-वडील आपल्याला शाळेत पाठवितात याची उत्सुकता मुलांमध्ये आहे.

ठळक मुद्देऑनलाइन अभ्यासाचा कंटाळा : मुलांमध्ये वाढली चिडचिड, पालकांचे सावध पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले आहेत. १५ जानेवारीपासून महाविद्यालयेसुद्धा सुरू होणार आहेत; पण पहिली ते चौथीसंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनासुद्धा आपण आता शाळेत जावे, असे वाटत असले तरी त्यांच्या पालकांची मात्र अद्यापही यासाठी मानसिकता तयार झालेली नाही. अजून काही दिवस वाट पाहू. त्यानंतरच मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेऊ. मात्र, तूर्तास तरी यासाठी घाई नको, असा सूर पालकांमध्ये आहे, तर मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्याने पहिली ते चौथीचे सर्वच विद्यार्थी घरीच आहेर. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू असला तरी मुले घरी राहून कंटाळली आहेत. त्यांच्यामध्ये चिडचिडपणा वाढत चालला आहे, तर कधी एकदाची शाळा सुरू होते आणि आपले आई-वडील आपल्याला शाळेत पाठवितात याची उत्सुकता मुलांमध्ये आहे. कोरोनाचा संसर्ग जरी पूर्णपणे कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर आली असली, तर पालकांना अजूनही आपल्या पाल्यांची काळजी वाटत असून, शाळांमध्ये पाठविल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेतली जाणार की नाही, अशी चिंतासुद्धा त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते तूर्तास तरी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.  

पालकांची चिंता कायम कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असला तरी पहिली ते चौथीत जाणारी मुले ही लहान असतात. त्यामुळे ती शाळेत गेल्यानंतर स्वत:ची काळजी घेणार की नाही, हे सांगता येत नाही. तूर्तास तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करू नयेत.-श्वेता मस्के, पालकशासन जरी पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा विचार करत असले तरी पालक तयार होणार नाहीत. अजून काही जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तूर्तास तरी मुलांना शाळेत पाठविण्याची घाई करणार नाही. -डॉली काकडे, पालकपहिली ते चौथीत शिकणारी मुले ही फार लहान असतात. त्यामुळे शाळेत गेल्यानंतर स्वत:ची तेवढी काळजी घेऊ शकणार नाहीत, तर पालकांनासुद्धा सतत काळजी लागून राहील. त्यामुळे तूर्तास तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करू नयेत. -प्रशांत मेश्राम, पालकपहिली ते चौथीच्या शाळा सुरू झाल्या तरी मी माझ्या पाल्यांना सध्या तरी शाळेत पाठविणार नाही. अजून काही दिवस वाट पाहणार, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावरच मुलांना शाळेत पाठविणार. शाळेत पाठविण्याची घाई नको.-प्रमोद पारखी, पालक  

मुलांना हवी शाळा; पण पालकांची ना घरी राहून मलासुद्धा आता कंटाळा आला आहे. कधी एकदाची शाळा सुरू होते आणि मी शाळेत जातो याची उत्सुकता लागली आहे; पण माझे ममी-पप्पा काळजीपोटी अजून काही दिवस शाळेत जाऊ नको म्हणतात. -राघिनी शेंडे, इयत्ता पहिली

शाळा बंद असली तरी आमचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे; पण जी मजा शाळेत गेल्यानंतर येते ती मजा या अभ्यासात येत नाही. शाळा सुरू झाली, तर मी नक्कीच शाळेत जाईन. -रोहित हिवारे, इयत्ता दुसरी

माझा मोठा भाऊ पण आता शाळेत जात आहे; पण आमची शाळा अजून सुरू झाली नाही. आमची शाळा सुरू झाल्यावर मीपण नियमित शाळेत जाईन. घरी राहून आता कंटाळाला आला आहे. -प्रत्यूष अग्निहोत्री, इयत्ता तिसरी

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी