शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:45 IST

मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

ठळक मुद्देसरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद : शहरातील अनेक वस्त्यांमध्ये साचले पाणी, बळीराजा सुखावला, तलाव बोड्यांमध्ये पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सलग बुधवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे पाच तालुक्यातील १४ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरी ६२.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून जिल्ह्यात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तर पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेने शहरातील नाल्यांची सफाई न केल्याने बुधवारी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते.त्यामुळे याचा शहरातील नागरिकांना फटका बसला. मात्र पावसामुळे कुठलीही जीवीत हानी झाली नाही.मंगळवारी रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून बुधवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तिरोडा तालुक्यातील सरांडी गावाजवळ निर्माणाधीन पुलाशेजारील चुकीने तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता व दुभाजकामुळे ट्रक पलटल्याने तिरोडा-तुमसर मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.गोंदिया शहरातील गणेशनगर भागात एक घर कोसळले मात्र कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुंभारेनगरातील पंचशील झेंडा चौक परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे.विशेष म्हणजे दरवर्षीच या भागात ही समस्या निर्माण होते. नगर परिषदेने अद्यापही यावर उपाय योजना केली नाही. या भागातील नाल्या तुंबल्याने या भागातील रस्ते सुध्दा जलमय झाल्याचे चित्र होते. तर काही नागरिकांच्या घरात सुध्दा रस्त्यावरील पाणी साचले होते.जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पाऊस झाला नव्हता परिणामी पेरणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती.त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सर्वांना दिलास दिला आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत होते. तर शेतांमध्ये पाणी साचले होते.नगर परिषदेची पोलखोलमंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी दुपारपर्यंत कायम होता. त्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. तर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई न केल्याने नाल्या चोख होवून नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यांवरुन वाहत होते. नागरिकांनी अनेकदा याबाबत स्थानिक नगरसेवकाकडे तक्र ारी केल्या त्यानंतर त्यांनी पाहणी केली. मात्र कुठल्याच उपाय योजना केली नाही. परिणामी वॉर्डातील भय्यालाल वासनिक,अजगर अली, मुन्ना डोहरे, सुनील चव्हाण यांच्या घरासमोरील असलेल्या रस्त्यांवरून पाणी तुडूंब भरून वाहत असल्यामुळे त्यांना घराबाहेर जाणे कठिण होते. ऐवढेच नव्हे तर, त्यांच्या घरात पाणी शिरत असल्यामुळे त्यांना रात्रभर जागून काढावी लागली. त्यामुळे नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली.अतिक्रमणामुळे पाणी रस्त्यावरकुंभारेनगरातील नाल्यांवर नागरिकांनी मोठ्या काही प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नगर परिषदेला साफसफाई करण्यासाठी त्रास होतो. नाल्यांमध्ये कचरा साचून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी रस्त्यांवर साचून राहते. परिणामी वार्डातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. काही ठिकाणी तर चक्क गल्ल्यांवरही नागरिकांनी अतिक्र मण केल्याने गल्ल्या लहान होऊन पाणी बाहेर जात नाही. त्यामुळे दरवर्षीच कुंभारेनगर रस्त्यांवर पाणी साचते.त्यासोबतच येथील नाल्या अरूंद असल्यामुळे पाणी सरळ वाहून जाण्यास अडचण होते.अंडरग्राऊंड पूल पाण्याखालीशहरातील रेलटोली परिसरातील अंडरग्राऊंड पुलाखालून जवळपास गुडघाभर पाणी वाहात होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बुधवारी सायंकाळपर्यंत ठप्प झाली होती. अंडरग्राऊंड परिसरातून एक नाला वाहत असून या नाल्याची सफाई न केल्याने यातील पाणी या परिसरातून वाहत होते त्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे बोलल्या जाते.मैदानाला आले तलावाचे स्वरूपकुंभारेनगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिसरात असलेल्या मैदानात लहान मुलांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य लावण्यात आले आहेत. ते साहित्य मजबूत स्थितीत बसविण्यात न आल्यामुळे अनेक साहित्य जमिनीतून उखळून पडले आहेत. त्या ठिकाणी पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त होते.वृक्षलागवडीचे खड्डे गेले पाण्यातशहरात नगर परिषदेच्यावतीने वृक्षलागवड मोहिमेतंर्गत वृक्षलागवड करण्यासाठी कुंभारेनगरातील मैदान परिसरात खड्डे खोदून ठेवले. मात्र, मैदानात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.मेडिकल व बीजीडब्ल्यूला पाण्याचा वेढामंगळवारी रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(मेडिकल)आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला (बीजीडब्ल्यू) रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांना पाण्याने वेढा घातल्याचे चित्र होते.सुदैवाने याचा रुग्णांना फटका बसला नाही. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वॉर्डात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.या महसूल मंडळात अतिवृष्टीमंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २२ पैकी १४ महसूल मंडळात पावसाची अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात दासगाव, खमारी, कामठा, नवेगावबांध, बोंडगाव, अर्जुनी मोरगाव, महागाव,केशोरी,वडेगाव, कट्टीपार, आमगाव, ठाणा, सौंदड, सडक अर्जुनी महसूल मंडळाचा समावेश आहे. तर गोंदिया ६२ मि.मी., मुंडीपार ६० मि.मी, ठाणेगाव ६३ मि.मी, तिगाव ६१.६० मि.मी., या महसूल मंडळात ६० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.तलावाला पडल्या भेगातालुक्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे कृषी विभागाच्या भोंगळ कारभाराची सुध्दा पोलखोल झाली. पहिल्याच पावसाने शेततळे फुटल्याने या बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.