शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

पथदिव्यांचे बिल भरण्यात राज्य शासनाने मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:18 IST

गोंदिया : जिल्हा परिषद व शासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामपंचायतींचे पथदिव्यांचे बिल थकले असून, यामुळे कित्येक ग्रामपंचायतींची जोडणी महावितरणने कापली आहे. ...

गोंदिया : जिल्हा परिषद व शासनाच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामपंचायतींचे पथदिव्यांचे बिल थकले असून, यामुळे कित्येक ग्रामपंचायतींची जोडणी महावितरणने कापली आहे. या ग्रामपंचायतींना १५ व्या आयोगातून एवढा निधी भरणे शक्य नसल्याने राज्य शासनाने ग्रामपंचायतींना पथदिव्यांचे बिल भरण्यास मदत करावी, अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे पत्रव्यवहारातून केली असल्याचे आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

लगतच्या ग्राम नागरा-चांदनीटोला येथे रस्ता लोकार्पण कार्यक्रमात नागरिकांना माहिती देताना ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी, जिल्हा परिषद व शासनाच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, आता पावसाळ्यात कित्येक गावे अंधारात आहेत. अशात सरपटणाऱ्या विषारी कीटक व प्राण्यांपासून गावकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ग्रामविकास विभागाने यावर ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयोगातून बिल भरण्यास मंजुरी दिली आहे. मात्र ग्रामपंचायतींना एवढे बिल भरणे शक्य नाही. करिता राज्य शासनाने मदत करावी याबाबत पत्र व्यवहार केला आहे. तसेच मंत्रालय याबाबत बोलणी करून हा विषय मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले.