शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

भजेपारच्या शेतकरी पुत्रांची भरारी, देश सेवेसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

सालेकसा तालुक्याची लाईफ ठरणारी वाघनदी व त्या नदीच्या दोन्ही काठावरील छोटी छोटी गावे आहे. या गावाची सुपीक जमीन तेथील लोकांच्या जीवनाचा आधार आहे. यातील एक गाव म्हणजे भजेपार. या गावात जेमतेम तीन हजार लोक वास्तव्यात असून संपूर्ण गावाचा एकच व्यवसाय अन् तो म्हणजे शेती. एक एकर, दोन एकर जमिनीचे मालक असलेले शेतकरी तर काही फक्त त्यांच्याकडे काम करणारे शेतमजूर सुद्धा या गावात राहतात.

ठळक मुद्देएकाचवेळी सात युवकांची सैन्यदलात निवड : कठोर परिश्रमाचे फळ

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या भजेपार नावाच्या छोट्याशा गावातून एकाच वेळी सात युवकांची भारतीय सैन्यदलात निवड झाली आहे. गरीब शेतकऱ्यांच्या मुलाने घेतलेल्या या भरारीमुळे गावातील प्रत्येक महिला पुरुषांना अभिमान वाटत आहे. इतर गावातील युवकांसाठी प्रेरणादायी बाब ठरत आहे. त्यामुळे आदर्श ग्राम भजेपारच्या शिरपेचात मानाचा तुरा लागलेला आहे.सालेकसा तालुक्याची लाईफ ठरणारी वाघनदी व त्या नदीच्या दोन्ही काठावरील छोटी छोटी गावे आहे. या गावाची सुपीक जमीन तेथील लोकांच्या जीवनाचा आधार आहे. यातील एक गाव म्हणजे भजेपार. या गावात जेमतेम तीन हजार लोक वास्तव्यात असून संपूर्ण गावाचा एकच व्यवसाय अन् तो म्हणजे शेती. एक एकर, दोन एकर जमिनीचे मालक असलेले शेतकरी तर काही फक्त त्यांच्याकडे काम करणारे शेतमजूर सुद्धा या गावात राहतात. दिवसभर शेतीची कामे परिश्रमाने करुन जिवन जगत आहे. असे असताना गावात मात्र सलोख्याचे वातावरण निर्माण ठेवीत सदैव एकमेकांना सहकार्य करीत असतात. या सहकार्याच्या भावनेतूनच गावातील लोकांनी स्वत:चा निधी उभारुन गावातील मुला-मुलींसाठी अध्ययन कक्ष स्थापन केले. या अध्ययन कक्षामध्ये अभ्यास करुन युवक-युवती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत असतात. मागील दहा वर्षात आतापर्यंत जवळ जवळ २० युवक-युवतींची विविध शासकीय विभागात निवड झाली. ते तरुण गावातील इतर मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.वेळोवेळी होतकरु मुला-मुलींना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत सुद्धा करतात. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्य दलाची भर्ती निघाली. त्या भर्तीसाठी दाखल झाले. या सातही युवकांची सैन्य दलात एकाचवेळी निवड झाली. सतत अध्ययन कक्षात लेखी परीक्षेसाठी अभ्यासही केला.यामुळेच एकाच वेळी भजेपारच्या अध्ययन कक्षातून अभ्यास करुन गेलेले सात युवक सैन्य दलात भर्तीसाठी पात्र होऊन त्याची निवड झाली. ही समस्त गावकरी आणि सालेकसा तालुकावासीयांसाठी सुध्दा गौरवाची बाब ठरली.या युवकांचा समावेशज्या युवकांची सैन्य दलात निवड झाली आहे त्यामध्ये आशीष राजाराम चुटे, डिलेश महादेव शेंडे, गुलशन राजाराम पाथोडे, राहुल भास्कर बहेकार, सुभाष धनराज रहिले, हेमंत राधेशाम शेंडे आणि दुर्गेश किशोर फुंडे यांचा समावेश आहे.किसान आणि जवान या दोन घटकावरच आपला देश सुरक्षित आणि अबाधित असून भजेपार गावाने किसान आणि जवान दोन्ही प्रकारे देशसेवेत स्वत:ला समर्पित केले म्हटल्यास वावगे ठरणार नाही.अध्ययन कक्षातून घडत आहेत विद्यार्थीभजेपार येथे श्रमदानातून साकारलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन कक्षात अभ्यास करणाऱ्या सात युवकांनी एकाच भरती प्रक्रियेत भारतीय सैनिक दलात भरती होण्याचा नाव विक्रम केला. छोट्याशा शेती प्रधान गावाने एकाच वेळी भारत मातेच्या सेवेसाठी सात जवान देणे ही अभिमानास्पद ऐतिहासिक व तेवढीच गौरवास्पद बाब आहे. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला नारा ‘जय जवान जय किसान’ या नाऱ्याला भजेपारवासीयांनी खऱ्या अर्थाने सिद्ध करुन दाखविले आहे.

टॅग्स :SoldierसैनिकFarmerशेतकरी