शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

गटार बुजविल्याने सांडपाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

अर्जुनी मोरगाव : स्थानिक मीरानगरीत घराचे बांधकाम करीत असताना प्रवेशद्वाराजवळ मुरुमाचा उंचवटा तयार केल्याने गटार बुजले. यामुळे घराघरातील पाणी ...

अर्जुनी मोरगाव : स्थानिक मीरानगरीत घराचे बांधकाम करीत असताना प्रवेशद्वाराजवळ मुरुमाचा उंचवटा तयार केल्याने गटार बुजले. यामुळे घराघरातील पाणी रस्त्यावर तुंबत आहे. नगरपंचायतीकडे तक्रार करूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मीरानगरी ही भरगच्च वस्ती आहे. नगरपंचायतीने गटारे तयार केलीत. मात्र, घराचे बांधकाम करताना काही लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर मुरुमाचा उंचवटा तयार करतात. यामुळेच नाली बुजते. जिथे नाली बुजली तिथे घराघरातील सांडपाणी तुंबते. एवढेच नव्हे तर गटारात अधिक पाणी गोळा झाल्याने त्याला वाहून जाण्यासाठी मार्ग सापडत नाही व ते रस्त्यावर साचून असते. पावसाळ्यात पावसाच्या पाण्याची यात भर पडते. पाणी अधिक झाल्याने रस्त्याने ये-जा करताना त्रास होतो. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. सांडपाणी आरोग्याला हानिकारक असल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती निर्माण होते. यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुजलेले गटार तातडीने दुरुस्त करण्याची मागणी मीरानगरवासीयांनी केली आहे.