शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा गहू,हरभरा,वटाणा, धानासह इतर कडधान्य पिकांची ३५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे नुकसान रब्बी हंगामातून भरुन निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती.

ठळक मुद्देकृषी विभागाचे प्राथमिक सर्वेक्षण : तीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान, मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सोमवारी (दि.२४) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील तीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे. तर सर्वाधिक नुकसान भाजीपाला पिकांचे झाल्याचे कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा गहू,हरभरा,वटाणा, धानासह इतर कडधान्य पिकांची ३५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे हे नुकसान रब्बी हंगामातून भरुन निघेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. सुरूवातीला रब्बी हंगामासाठी अनुकुल वातावरण असल्याने पिकांची चांगली वाढ झाली होती. मात्र सोमवारी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने गारपीटीसह हजेरी लावली.जवळपास अर्धा तास पाऊस आणि पंधरा मिनिटे गारपिट झाल्याने रस्त्यांवर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. गहू, हरभरा, वटाणा ही पिके बहरत असतानाच त्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याने ही पिके पूर्णपणे भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे. मंगळवारी सकाळीच अनेक शेतकºयांनी आपआपल्या शेताकडे धाव घेत पिकांची पाहणी केली. मात्र कालपर्यंत डोलणारे पीक पूर्णपणे भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे भरुन आले. मोठ्या मेहनतीने आणि रक्ताचे पाणी करून शेतकºयांनी रब्बीतील पिकांची लागवड केली होती. मात्र निसर्गाच्या मनात काही वेगळेच असल्याने शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमाविण्याची वेळ आली आहे. गारपिटीचा सर्वाधिक फटका १५०० हेक्टरमधील कोबी,टमाटर, वांगी, बिन्स, वटाणा या भाजीपाला पिकांना बसला.त्यामुळे भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हाधिकाºयांकडे गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. यावर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाच्या यंत्रणेला दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात ३ हजार हेक्टरमधील पिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला असून नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.६० घरांची पडझडसोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील ६० घरांची पडझड झाली असून जवळपास ३ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे.२५९ मि.मी.पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.जवळपास अर्धा ते पाऊनतास पावसाने सर्वत्र हजेरी लावली असून एकूण २५९ मि.मी.पावसाची नोंद जिल्ह्यात झाली.यात गोंदिया १०० मि.मी.,गोरेगाव ६.२० मि.मी., तिरोडा ६.२०,अर्जुनी २ मि.मी.,देवरी ७.४०, आमगाव ७०.५० मि.मी., सालेकसा ५३.०, सडक अर्जुनी २०.६० मि.मी.पावसाची नोंद झाली होती.केंद्रावरील धान भिजलेसोमवारी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या धानाला बसला. मोठ्या प्रमाणात धान भिजल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. मात्र नेमके किती नुकसान झाले हे सांगण्यास या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाळले.

टॅग्स :Rainपाऊस