शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

कोविडच्या निधीला घेऊन वाढतोय सरपंचाचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने गावपातळीवर स्थलांतरित मजुरांसाठी व बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण केंद्र गावातच सुरू करण्यात आले.त्या क्वारंटाईन लोकांच्या सोयी सुविधासाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी एकही पैसे आले नाही. ग्रामपंचायतमध्ये असलेल्या १४ वित्त आयोगाच्या एका हेड मधील २५ टक्के रक्कम खर्च करू शकता अशा सूचना मिळाल्याने ग्रामपंचायतने आपापल्या गावातील लोकांना साबण वाटल्या, फवारणी केली. अन्नधान्याचे सुध्दा वाटप केले.

ठळक मुद्देगावात होताहेत भांडणे : शासनाने निधी दिला नसताना पसरविली जात आहे अफवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थलांतरीत मजुरांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांच्या जेवणाची सोय त्याच्या घरच्यांनी किंवा लोकसहभागातून करावी. त्यांच्या सोयी सुविधावर खर्च करण्यासाठी शासनाने कवडीचाही निधी दिलेला नाही. परंतु प्रत्येक ग्रामपंचायतीला कोविडसाठी ३ लाख रूपयांचा निधी मिळाल्याची अफवा आता ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.या अफवेपोटी ग्रामीण भागातील पुढाऱ्यांचा आता त्रास वाढत आहे. ऐवढेच नव्हे तर या निधीला घेऊन गावागावातील वातावरण तापत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने गावपातळीवर स्थलांतरित मजुरांसाठी व बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण केंद्र गावातच सुरू करण्यात आले.त्या क्वारंटाईन लोकांच्या सोयी सुविधासाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी एकही पैसे आले नाही. ग्रामपंचायतमध्ये असलेल्या १४ वित्त आयोगाच्या एका हेड मधील २५ टक्के रक्कम खर्च करू शकता अशा सूचना मिळाल्याने ग्रामपंचायतने आपापल्या गावातील लोकांना साबण वाटल्या, फवारणी केली. अन्नधान्याचे सुध्दा वाटप केले. ज्यांना-ज्यांना ज्या सोयी करायचे समजले त्यांनी त्या-त्या उपाय योजना केल्या. परंतु कोविड-१९ करीता शासनाने कसलेही पैसे दिले नसताना आमगाव तालुक्याच्या कट्टीपार येथे २० मे रोजी झालेल्या ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.ग्रामपंचायतला आलेला पैसा हडपल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर करण्यात आला.परंतु यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे एकही पैसे आले नाही असे सांगितले. कोविड-१९ च्या नावावर एकही पैसा आला नसताना शासनाकडून पैसे आल्याचा कांगावा गावकऱ्यांकडून होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात स्वत: जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना पत्र काढून जनतेत होणारा संभ्रम दूर करण्याची पाळी आली आहे. कोरोनाच्या लढाईत काम करणाºया सरपंचांचा ताप विनाकारण निधीला घेऊन वाढला आहे.कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतची कर वसूली थांबलीकोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने ग्रामपंचायतकडून करण्यात येणारी विविध प्रकारची कर वसुली बंद आहे. लॉकडाऊनमुळे लोकांकडे पैसे नाहीत हे गृहीत धरून ग्रामपंचायतींनी कर वसुली सुरू केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतवर असलेला गावाच्या विकासाचा भार जड होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsarpanchसरपंच