शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या निधीला घेऊन वाढतोय सरपंचाचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने गावपातळीवर स्थलांतरित मजुरांसाठी व बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण केंद्र गावातच सुरू करण्यात आले.त्या क्वारंटाईन लोकांच्या सोयी सुविधासाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी एकही पैसे आले नाही. ग्रामपंचायतमध्ये असलेल्या १४ वित्त आयोगाच्या एका हेड मधील २५ टक्के रक्कम खर्च करू शकता अशा सूचना मिळाल्याने ग्रामपंचायतने आपापल्या गावातील लोकांना साबण वाटल्या, फवारणी केली. अन्नधान्याचे सुध्दा वाटप केले.

ठळक मुद्देगावात होताहेत भांडणे : शासनाने निधी दिला नसताना पसरविली जात आहे अफवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : स्थलांतरीत मजुरांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांच्या जेवणाची सोय त्याच्या घरच्यांनी किंवा लोकसहभागातून करावी. त्यांच्या सोयी सुविधावर खर्च करण्यासाठी शासनाने कवडीचाही निधी दिलेला नाही. परंतु प्रत्येक ग्रामपंचायतीला कोविडसाठी ३ लाख रूपयांचा निधी मिळाल्याची अफवा आता ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे.या अफवेपोटी ग्रामीण भागातील पुढाऱ्यांचा आता त्रास वाढत आहे. ऐवढेच नव्हे तर या निधीला घेऊन गावागावातील वातावरण तापत आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने गावपातळीवर स्थलांतरित मजुरांसाठी व बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी विलगीकरण केंद्र गावातच सुरू करण्यात आले.त्या क्वारंटाईन लोकांच्या सोयी सुविधासाठी किंवा दैनंदिन खर्चासाठी एकही पैसे आले नाही. ग्रामपंचायतमध्ये असलेल्या १४ वित्त आयोगाच्या एका हेड मधील २५ टक्के रक्कम खर्च करू शकता अशा सूचना मिळाल्याने ग्रामपंचायतने आपापल्या गावातील लोकांना साबण वाटल्या, फवारणी केली. अन्नधान्याचे सुध्दा वाटप केले. ज्यांना-ज्यांना ज्या सोयी करायचे समजले त्यांनी त्या-त्या उपाय योजना केल्या. परंतु कोविड-१९ करीता शासनाने कसलेही पैसे दिले नसताना आमगाव तालुक्याच्या कट्टीपार येथे २० मे रोजी झालेल्या ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.ग्रामपंचायतला आलेला पैसा हडपल्याचा आरोप ग्रामपंचायत प्रशासनावर करण्यात आला.परंतु यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे एकही पैसे आले नाही असे सांगितले. कोविड-१९ च्या नावावर एकही पैसा आला नसताना शासनाकडून पैसे आल्याचा कांगावा गावकऱ्यांकडून होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासंदर्भात स्वत: जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना पत्र काढून जनतेत होणारा संभ्रम दूर करण्याची पाळी आली आहे. कोरोनाच्या लढाईत काम करणाºया सरपंचांचा ताप विनाकारण निधीला घेऊन वाढला आहे.कोरोनाच्या काळात ग्रामपंचायतची कर वसूली थांबलीकोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने ग्रामपंचायतकडून करण्यात येणारी विविध प्रकारची कर वसुली बंद आहे. लॉकडाऊनमुळे लोकांकडे पैसे नाहीत हे गृहीत धरून ग्रामपंचायतींनी कर वसुली सुरू केली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतवर असलेला गावाच्या विकासाचा भार जड होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsarpanchसरपंच