सामाजिक सुरक्षेसाठी समता सैनिक दल- दहिवले
By Admin | Updated: June 22, 2014 00:03 IST2014-06-22T00:03:36+5:302014-06-22T00:03:36+5:30
माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली,

सामाजिक सुरक्षेसाठी समता सैनिक दल- दहिवले
नवेगावबांध : माणसा-माणसात समानता प्रस्थापित करण्यासाठी समता सैनिक दलाचे कार्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षा आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षेसाठीच बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली, असे मत रत्नदीप दहिवले यांनी व्यक्त केले. सिरेगावबांध येथे समता सैनिक दलाच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष बोदानंद गुरुजी तर प्रा. गजेंद्र गजभिये, डॉ. अजय अंबादे, दिलावर रामटेके, सुषमा रामटेके, सुरेखा टेंभुर्णे, करिष्मा माणे, धर्मदास सुखदेवे, मिथुन मेश्राम, वासंती सरदार उपस्थित होते.
देशात समाजविद्यातक शक्तींचा उदय झालेला आहे. सामाजिक ऐक्य धोक्यात आले आहे. त्यासाठी सामुहिक प्रयत्नातुन जातीय वादाचे मनसुबे आपल्याला निष्प्रभ करावयाचे आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदानंद गुरुजी यांनी समात सैनिक दल ही बाबासाहेबाची चळवळ असून भारत बौद्धमय करण्याचा सल्ला दहिवले यांनी दिला. गाव तेथे समता सैनिक दल आणि घर तेथे सैनिक निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. वासंती सरदार, प्रा. गजेंद्र गजभिये, दिलावर रामटेके, डॉ. अजय अंबादे यांनी मार्गदर्शन केले. गावातून प्रमुख मार्गाने रॅलीने पथसंचालन करण्यात आले. सर्वांनी मिळून भोजनाचा सामूहिक आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी उपसरपंच धर्मदास सुखदेवे, बौद्ध समाजाचे अध्यक्ष तुळशीदास सुखदेवे, धनलाल मेश्राम, भुवनदास डोंगरवार, लोकपाल गहावे, व धम्मदीप बौद्ध विहाराच्या पुरुष, महिला कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यावेळी गावातील व परिसरातील लोक उपस्थित होते. (वार्ताहर)