शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

प्लास्टिक विरोधात जनजागृतीसाठी युवकाचे देशभर पायी भ्रमण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 1:20 PM

प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय.

ठळक मुद्देआतापर्यंत १६ राज्यांचा प्रवास पूर्णपर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

राजकुमार भगत

गोंदिया : कामठीचा १९ वर्षाचा तरुण मागील वर्षापासून देशभ्रमणाला निघाला आणि ते सुद्धा पायी. ऐकून विश्वास बसणार नाही. मात्र, या तरुणाने आतापर्यंत १६ राज्यांचा प्रवाससुद्धा पूर्ण केला आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक आहे. त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय. सोमवारी तो गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे पोहोचला. यावेळी त्याच्याशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधून त्याचा प्रवास उलगडला.

रोहन रमेश अग्रवाल हा कामठीचा राहणारा. वडील व्यावसायिक तर आई गृहिणी व त्याला एक लहान बहीण आहे. २५ ऑगस्ट २०२० रोजी तो बारावसी येथून गंगास्नान करून देशभ्रमण करण्यासाठी निघाला. १६ राज्यांचे भ्रमण करून तो सोमवारी सडक-अर्जुनी येथे आला असता सडक-अर्जुनी येथील महाराष्ट्र पत्रकार संघाचे त्यांचे स्वागत केले. रोहन अग्रवाल यांनी लोकमत प्रतिनिधीला माहिती दिली. त्यांच्या भ्रमणाला ४८० दिवस पूर्ण झाले आहे.

राेहनने आतापर्यंत उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिलनाडू, पाॅंडेचेरी, केरळ, कर्नाटक, गोवा आणि नागपूरवरून सडक-अर्जुनी असा २ हजार किलोमीटरचा प्रवास पायी तर २० हजार किलोमीटर कोणी लिप्ट देऊन वाहनातून प्रवास केला. बी.काॅम. द्वितीय वर्षाला शिकत असताना त्यांनी आपल्या देशभ्रमणाची बाब आई-वडिलांना सांगीतली. तेव्हा त्यांनी त्याला वेड्यात काढले. पण रोहनने आपल्या मनात खूणगाठ बांधली व घरून अडीच हजार रुपये घेऊन देशभ्रमण करण्यासाठी निघाला.

रोहन सांगतो, देशात अजूनही खूप माणुसकी शिल्लक आहे. अन्यथा माझे भ्रमण थांबले असते, अनेक लोक भेटतात. कोणी लिफ्ट देतो, कोणी सहकार्य करतो अन्यथा माझ्याजवळ काही नाही. त्यांनी आपला आजचा मुक्काम सुधीर अग्रवाल यांच्याकडे केला. अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. तसेच येथून आता रशियामधील सायबेरिया येथे जाण्याचा मानस त्याने व्यक्त केला.

माणुसकीचा धर्म निर्माण व्हावा

विशेषत: प्लास्टिक विरोधात व प्रदूषणाबाबत जनजागृती करायची हे ठरविले असल्याने त्यांनी प्लास्टिक प्रदूषणाबाबत बरीच माहिती सांगितली. तो अनेक ठिकाणी प्लास्टिक विरोधात मार्गदर्शन ही करतो. समाजात माणुसकीचा धर्म निर्माण व्हावा व सुख, समृद्धी व शांतता नांदावी असे त्यांना वाटते.

भारत देशात विविध धर्म, अनेक जाती, अनेक प्रथा, परंपरा, संस्कृती, भाषा भौगोलिक ठिकाणेे तसेच वेशभूषा, विचार आहेत. भ्रमण केल्याने या सर्वांचे ज्ञान प्राप्त होते. प्रवासाने प्रत्यक्षवादी जीवनाचा अनुभव येतो व नवीन प्रकारचे शिक्षणही मिळते.

- रोहन अग्रवाल

टॅग्स :Socialसामाजिकenvironmentपर्यावरणPlastic banप्लॅस्टिक बंदीpollutionप्रदूषण