इलेक्ट्रॉनिक वजनाने ग्राहकांची लूट
By Admin | Updated: January 3, 2015 23:06 IST2015-01-03T23:06:03+5:302015-01-03T23:06:03+5:30
जनतेला सेवा सुविधा हक्क मिळण्याकरिता प्रशासनात अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. लूट न होता न्यायिक पध्दतीने व्यवहार होणे अत्यावश्यक आहे. मात्र हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या काळात

इलेक्ट्रॉनिक वजनाने ग्राहकांची लूट
गोंदिया : जनतेला सेवा सुविधा हक्क मिळण्याकरिता प्रशासनात अनेक अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. लूट न होता न्यायिक पध्दतीने व्यवहार होणे अत्यावश्यक आहे. मात्र हल्लीच्या तंत्रज्ञानाच्या काळात इलेक्ट्रॉनिक वजनात बराच घोळ पहायला मिळत आहे.
वजन माप निरीक्षक प्रत्यक्ष भेटीत केवळ नूतनीकरणाची पावती बघून मोकळे होतात. इलेक्ट्रॉनिक काट्यात लहानापासून तर मोठ्यापर्यंत बऱ्याच दुकानात सेटिंग असल्याचे समजते. पाच किलो क्षमतेच्या काट्यात ५० ग्रॅम वजनाची सेटिंग तर १०, २०, ३०, ५०, १००, ५०० किलो वजनाच्या काट्यात दुकानदाराच्या इच्छेने सेटिंग केली जाते.
इलेक्ट्रॉनिक काटे विक्रीकरिता घरपोच सेवा असल्याने सेटिंग करण्याला अडचण येत नाही. दुकानदाराच्या समोरच ही व्यवस्था केली जाते. त्यामुळे वर्तमानात ९० टक्के दुकानात इलेक्ट्रॉनिक काट्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्राहकांची पडद्याआडून लूट केली जात आहे. वजन माप निरीक्षकांनी जर हे काटे तपासून सहानिशा केली तर हा प्रकार बंद झाला असता. पण, असे होतांना दिसत नाही.
पाकीटबंद वस्तू विक्रीला असताना त्यावर उत्पादक किंमत, वजन, उत्पादन दिनांक योग्यतेची तिथी नोंद असते. उत्पादन स्थानावरु न ही वस्तू हजारो किमीचा प्रवास करीत व्यवहारात हजर होते. यामुळे त्या पाकीटवर उत्पादकांनी लिहिलेले कमी-जास्त प्रमाणात खोडतोड होते.
व्यापारीही खरेदी बिल तपासून विक्र ी किंमत ठरवते. मात्र अशावेळी वजनमाप निरीक्षक नेमकी हीच अडचण समोर करुन व्यापाऱ्याला कायद्याच्या कचाट्यात पकडून कार्यवाही कंपनीवर करून दुकानदाराकडून चिरीमिरी मागितली जाते. हा प्रकार दोन वर्षापासून सगळीकडेच जोमात सुरु झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य दिशेने तपास करु न सामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)