शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागात अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. पशुसंवर्धन विभागात १५७ मंजूर पदांपैकी ९७ पदे रिक्त आहेत. वर्ग १ चे जिल्हा पशुधन उपायुक्त १ पद, सहायक आयुक्त पशुसंवर्धन १ पद, पशुधन विकास अधिकारी (राज्यस्तरीय) ४ पदे, पशुधन विकास अधिकारी (स्थानिकस्तर) ३२ पदे रिक्त आहेत. तर एकूण मंजूर पदे ७२ आहेत.

ठळक मुद्देभरतीचा मुहूर्त सापडेना : २०१९ मध्ये निघाली होती भरतीची जाहिरात, पशुपालकांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : गोंदिया जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली असून रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागात अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.पशुसंवर्धन विभागात १५७ मंजूर पदांपैकी ९७ पदे रिक्त आहेत. वर्ग १ चे जिल्हा पशुधन उपायुक्त १ पद, सहायक आयुक्त पशुसंवर्धन १ पद, पशुधन विकास अधिकारी (राज्यस्तरीय) ४ पदे, पशुधन विकास अधिकारी (स्थानिकस्तर) ३२ पदे रिक्त आहेत. तर एकूण मंजूर पदे ७२ आहेत.वर्ग ३ ची मंजूर पदे ३७ असून त्यापैकी ११ पदे भरली आहेत. तरीही सहायक पशुधन विकास अधिकाºयांचे १८ पदे रिक्त आहेत. वरिष्ठ सहायकाचे १ पद, वरिष्ठ लिपीक ३ पदे, कनिष्ठ लिपीक २, वाहनचालक २ अशी २३ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची मंजूर पदे ४८ असून भरलेली पदे १५ आहेत. रिक्त पदांत २५ परिचर, व्रनोचारक ६ पदे, रात्र पहारेकरी १, स्वच्छक १ अशी एकूण ३३ पदे रिक्त आहेत.या रिक्त पदांमुळे पशुसंवर्धन विभाग कार्यालयांतील कर्मचाºयांना कामाचा अधिक ताण पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांना आल्यापावलीच परतावे लागत आहे. जनावरांची उत्कृष्ट पैदास व्हावी म्हणून कृत्रीम रेतनासाठी शेतकरी बांधवांना दुभत्या जनावरांची सेवाशुश्रृषा करण्यासाठी खाजगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पशुधन कार्यालयाची प्रशस्त इमारत शोभेची वास्तू ठरली आहे.लेखी परीक्षा घेतलीच नाहीविशेष म्हणजे, पशुसंवर्धन विभागात रिक्त पदांच्या भरतीसाठी सन २०१९ मध्ये जाहिरातीच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार बेरोजगार युवकांनी लाखोंच्या संख्येत अर्ज केले होते. मात्र एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली नाही. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.