शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

फक्त कुत्राच नव्हे अन्य प्राणी चावल्यानेही होतो रेबीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:51 IST

नितीन वानखेडे : वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि लोकांना या प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जगभरात रेबीज दिन साजरा केला जातो. हा दिवस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी १८८५ मध्ये रेबीजची पहिली लस विकसित केली. आज ही लस प्राणी आणि मानव यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर मानवांमध्ये रेबीजचा धोका कमी करू शकतो. यावर्षी १८ वा जागतिक रेबीज दिन साजरा केला जात आहे. रेबीज दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम 'ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज' म्हणजेच 'रेबीज सीमा तोडणे' असे आहे. रेबीज फक्त कुत्रा चावल्यानेच नव्हे, तर अन्य प्राणी चावल्यानेही होतो. यामुळे वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगीतले. 

रेबीजचा प्रसार प्रामुख्याने कुत्रा चावल्याने होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, रेबीज लाईसा विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या चाव्याद्वारे रेबीजचा संसर्ग मानवांमध्ये होतो. हा एक झुनोटिक रोग आहे जो संक्रमित मांजरी, कुत्रे, माकड आणि वटवाघूळ यांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. यामुळे मेंदूला सूजदेखील येऊ शकते. असे मानले जाते की, ९९ टक्के प्रकरणांमध्ये रेबीजचा संसर्ग कुत्र्यांमुळे मानवांमध्ये होतो.

हे करावे कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यामुळे झालेली जखम साबण आणि नळाच्या वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवा. जखमेला निर्जंतुक मलम लावा. ताबडतोब शासकीय दवाखान्यात जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज- विरोधी लस घ्या. लसीच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करा. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी रेबीजविरोधी लसीकरण करा.

हे करू नयेजखमेला मिरची, तेल, चुना असे कोणतेही घातक पदार्थ लावू नयेत.

रेबीज म्हणजे काय आणि त्याचे कारण काय? रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे जो रँबडोव्हायरस कुटुंबातील आरएबीव्ही विषाणूमुळे होतो. रेबीजचा संसर्ग एखाद्या संक्रमित प्राण्याच्या लाळेतून होतो जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्राण्याला चावतो किंवा ओरखडतो. कारण हा रोग संक्रमित व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो, तो त्वरित रोखणे आवश्यक आहे.

रेबीजचे उपचार कोण आणि केव्हा करावे ?रेबीजची लस मारलेल्या रेबीज विषा- णूपासून विकसित केली जाते, ज्यामुळे रोग होऊ शकत नाही. मानवांना रेबीजची लस दोन प्रकारे मिळते. पहिली म्हणजे प्रतिबंधात्मक लस (संसर्ग नसलेली) आणि दुसरी उपचारात्मक रेबीज लसीकरण. 

"मांजर, माकडे, वटवाघूळ अशा सर्वच प्राण्यांपासून रेबीजचा धोका असतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. अन्यथा तुमच्या टॉमी किंवा मांजराने चावा घेतल्यावरही होण्याची शक्यता आहे." - डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया