शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

फक्त कुत्राच नव्हे अन्य प्राणी चावल्यानेही होतो रेबीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 16:51 IST

नितीन वानखेडे : वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि लोकांना या प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जगभरात रेबीज दिन साजरा केला जातो. हा दिवस फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांची पुण्यतिथी आहे. ज्यांनी १८८५ मध्ये रेबीजची पहिली लस विकसित केली. आज ही लस प्राणी आणि मानव यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर मानवांमध्ये रेबीजचा धोका कमी करू शकतो. यावर्षी १८ वा जागतिक रेबीज दिन साजरा केला जात आहे. रेबीज दिन दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो आणि यावर्षीची थीम 'ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज' म्हणजेच 'रेबीज सीमा तोडणे' असे आहे. रेबीज फक्त कुत्रा चावल्यानेच नव्हे, तर अन्य प्राणी चावल्यानेही होतो. यामुळे वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगीतले. 

रेबीजचा प्रसार प्रामुख्याने कुत्रा चावल्याने होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, रेबीज लाईसा विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या चाव्याद्वारे रेबीजचा संसर्ग मानवांमध्ये होतो. हा एक झुनोटिक रोग आहे जो संक्रमित मांजरी, कुत्रे, माकड आणि वटवाघूळ यांच्या चाव्याद्वारे मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. यामुळे मेंदूला सूजदेखील येऊ शकते. असे मानले जाते की, ९९ टक्के प्रकरणांमध्ये रेबीजचा संसर्ग कुत्र्यांमुळे मानवांमध्ये होतो.

हे करावे कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यामुळे झालेली जखम साबण आणि नळाच्या वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवा. जखमेला निर्जंतुक मलम लावा. ताबडतोब शासकीय दवाखान्यात जा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज- विरोधी लस घ्या. लसीच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करा. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी रेबीजविरोधी लसीकरण करा.

हे करू नयेजखमेला मिरची, तेल, चुना असे कोणतेही घातक पदार्थ लावू नयेत.

रेबीज म्हणजे काय आणि त्याचे कारण काय? रेबीज हा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे जो रँबडोव्हायरस कुटुंबातील आरएबीव्ही विषाणूमुळे होतो. रेबीजचा संसर्ग एखाद्या संक्रमित प्राण्याच्या लाळेतून होतो जेव्हा तो दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्राण्याला चावतो किंवा ओरखडतो. कारण हा रोग संक्रमित व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतो, तो त्वरित रोखणे आवश्यक आहे.

रेबीजचे उपचार कोण आणि केव्हा करावे ?रेबीजची लस मारलेल्या रेबीज विषा- णूपासून विकसित केली जाते, ज्यामुळे रोग होऊ शकत नाही. मानवांना रेबीजची लस दोन प्रकारे मिळते. पहिली म्हणजे प्रतिबंधात्मक लस (संसर्ग नसलेली) आणि दुसरी उपचारात्मक रेबीज लसीकरण. 

"मांजर, माकडे, वटवाघूळ अशा सर्वच प्राण्यांपासून रेबीजचा धोका असतो. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. अन्यथा तुमच्या टॉमी किंवा मांजराने चावा घेतल्यावरही होण्याची शक्यता आहे." - डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया