शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

वगळलेल्या अभ्यासक्रमातून बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न; बारावी अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 10:58 IST

शनिवारी घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये एकूण पेपरपैकी २५ टक्के प्रश्न न शिकवलेल्या अभ्यासक्रमातून आल्यामुळे विद्यार्थ्यांना ते प्रश्न सहजरीत्या सोडवता आले नाही.

ठळक मुद्दे५० टक्के प्रश्न समजलेच नाही

सालेकसा (गोंदिया) : शनिवारी (दि.१९) बारावी बोर्डाच्या परीक्षा अंतर्गत घेण्यात आलेल्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये वगळलेल्या अभ्यासक्रमातून प्रश्न दिल्यामुळे आणि त्याचा अभ्यास न केल्यामुळे परीक्षेत बसलेले विद्यार्थी कमालीचे गोंधळले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ५० टक्के प्रश्न अतिशय कठीण गेले असल्याचे परीक्षार्थ्यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

कोरोनाकाळात शाळा-महाविद्यालय वेळेवर सुरू झाले नाही. त्यामुळे अभ्यासक्रमातील बराचसा भाग शिकवता येणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेता शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम वगळून त्याशिवाय उरलेल्या अभ्यासक्रमातूनच बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातील, असा निर्णय घेतला होता. परंतु शनिवारी (दि.१९) घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये एकूण पेपर पैकी २५ टक्के प्रश्न न शिकवलेल्या अभ्यासक्रमातून आल्यामुळे विद्यार्थ्यांना ते प्रश्न सहजरीत्या सोडवता आले नाही.

जेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या विषय शिक्षकांशी याबद्दल विचारणा केली असता ही बाब त्यांच्याही लक्षात आली आणि अभ्यासक्रमातून वगळलेल्या भागातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत समावेश केल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी कमालीचे असंतुष्ट आहेत. ही बाब बोर्डाच्या लक्षात येताच पुढे कोणते पाऊल उचलणार याची प्रतीक्षा करावी लागेल.

पूर्ण गुणदान करावे

परीक्षेदरम्यान जवळपास ५० टक्के प्रश्न विद्यार्थ्यांना कळलेच नाही. त्यामुळे अर्थशास्त्राच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षेनुरूप गुण मिळणार नाही अशी खात्री वाटत आहे. अशात निकालाची टक्केवारी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा संपल्यावर जेव्हा संबंधित विषय शिक्षकांनी प्रश्नपत्रिका पहिली तेव्हा त्यांनाही ५० टक्के प्रश्न फारच कठीण स्वरूपाचे दिसून आले. बोर्डाने वगळलेल्या अभ्यासक्रमातून प्रश्न का विचारले हा प्रश्न प्राध्यापकांसमोर सुद्धा उपस्थित झाला असून, बोर्डाने या बाबीचा विचार करून त्या प्रश्नांवर विद्यार्थ्यांना पूर्ण गुणदान देण्याची मागणी विद्यार्थी, पालक व कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने केली आहे.

अर्थशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये संविधान तक्त्याचे पालन केले नाही तसेच कोरोना काळात अध्यापन बरोबर झाले नसता काठीण्य पातळी जास्त होती.

- प्रा. डाॅ. नोहर लिल्हारे, न. प. कनिष्ठ महाविद्यालय, गोंदिया

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीHSC / 12th Exam12वी परीक्षाEducationशिक्षण