शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनात होणार ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:37 IST

जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : जिल्ह्यात ४८ हजार हेक्टर नापेर क्षेत्र

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. त्यामुळे यावर्षी धान उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी शासनाने पाठविलेल्या अहवालानुसार, हलक्या भातपिकांच्या कापणीला सध्या सुरूवात झाली आहे. यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक नसल्यामुळे उत्पादनात जवळपास ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांची शेती निसर्गावर अवलंबून आहे व थोड्याफार क्षेत्रामध्ये लागवड केली होती, त्या शेतकºयांच्या भातपिकांची वाढ खुंटली आहे. लोंबीमध्ये दाणे पूर्णपणे भरले नाहीत.सद्यस्थितीत मध्यम व भारी धानपिकांच्या लोंबी बाहेर पडणे व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. कोरडवाहू भातपिकांच्या लोंबातील दाणे पावसाअभावी केवळ ३५ ते ४० टक्के भरलेले आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांचे पीक समाधानकारक आहे. सध्याची पीक परिस्थिती बघून भातपिकाची सरासरी उत्पादकता जवळपास एक हजार ते एक हजार १०० किलोग्रॅम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मध्यम व भारी भातपिकांवर खोडकिडीचा १ टक्के व करपा रोगाचा १ ते २ टक्के प्रादुर्भाव दिसून आलेला आल्याचे कृषी विभागाने अहवालात नमूद केले आहे.जिल्ह्यात एकूण एक लाख ९१ हजार ०३१ हेक्टर धानपीक उत्पादनाचा क्षेत्र आहे. यापैकी एक लाख ४३ हजार १०२ हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक लावण्यात आले आहे. तर ४७ हजार ९२९ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. सद्यस्थितीत हलके धानपीक कापणीला शेतकºयांनी सुरूवात केली आहे. मध्यम व भारी धानापिकावर खोडकिडा व करपा रोगाचा काही प्रमाणात प्रभाव दिसत आहे.९ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्याजिल्ह्यात एकूण एक लाख ३४ हजार ०४५.२० हेक्टर क्षेत्रात धानपीक लावण्यात आले आहे. तर नऊ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. गोंदिया तालुक्यात एक हजार ३५४ हेक्टर, गोरेगावात ५०४, तिरोडा येथे ११६, सडक अर्जुनी ३३६, अर्जुनी मोरगाव ५१५, आमगाव १६८, सालेकसा ९७२, देवरी पाच हजार ०९२ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. एकूण नऊ हजार ०५७ हेक्टरमधील आवत्या मिळून जिल्ह्यात एक लाख ४३ हजार १०२.२० हेक्टरमध्ये धानपीक लावण्यात आले आहे.तीळ व तुरीच्या पिकांची स्थितीकृषी विभागाच्या माहितीनुसार तीळ पिकाचे बोंडे पक्वहोण्याच्या अवस्थेत असून येत्या पंधरवाड्यात काढणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यात तुर पिकाची लागवड बांधावर केली जात असून तुर पीक वाढीच्या अवस्थेत आहे.तालुकानिहाय भातपिकाचे नापेर क्षेत्रकाही दिवसांपासून अधूनमधून पाऊस येत आहे. काही शेतकºयांनी हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली आहे. काही ठिकाणी धान कापून बांधात ठेवण्यातही आले आहे. मात्र परतीच्या पावसाने कापलेले धानपीक ओले होवून अंकुरितही झाले आहे. बांधात पाणी साचल्यामुळे धान खराब झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शासन-प्रशासनाने सर्व्हेक्षण करून शेतकºयांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे.