शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

उत्पादनात होणार ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:37 IST

जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : जिल्ह्यात ४८ हजार हेक्टर नापेर क्षेत्र

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. त्यामुळे यावर्षी धान उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी शासनाने पाठविलेल्या अहवालानुसार, हलक्या भातपिकांच्या कापणीला सध्या सुरूवात झाली आहे. यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक नसल्यामुळे उत्पादनात जवळपास ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांची शेती निसर्गावर अवलंबून आहे व थोड्याफार क्षेत्रामध्ये लागवड केली होती, त्या शेतकºयांच्या भातपिकांची वाढ खुंटली आहे. लोंबीमध्ये दाणे पूर्णपणे भरले नाहीत.सद्यस्थितीत मध्यम व भारी धानपिकांच्या लोंबी बाहेर पडणे व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. कोरडवाहू भातपिकांच्या लोंबातील दाणे पावसाअभावी केवळ ३५ ते ४० टक्के भरलेले आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांचे पीक समाधानकारक आहे. सध्याची पीक परिस्थिती बघून भातपिकाची सरासरी उत्पादकता जवळपास एक हजार ते एक हजार १०० किलोग्रॅम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मध्यम व भारी भातपिकांवर खोडकिडीचा १ टक्के व करपा रोगाचा १ ते २ टक्के प्रादुर्भाव दिसून आलेला आल्याचे कृषी विभागाने अहवालात नमूद केले आहे.जिल्ह्यात एकूण एक लाख ९१ हजार ०३१ हेक्टर धानपीक उत्पादनाचा क्षेत्र आहे. यापैकी एक लाख ४३ हजार १०२ हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक लावण्यात आले आहे. तर ४७ हजार ९२९ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. सद्यस्थितीत हलके धानपीक कापणीला शेतकºयांनी सुरूवात केली आहे. मध्यम व भारी धानापिकावर खोडकिडा व करपा रोगाचा काही प्रमाणात प्रभाव दिसत आहे.९ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्याजिल्ह्यात एकूण एक लाख ३४ हजार ०४५.२० हेक्टर क्षेत्रात धानपीक लावण्यात आले आहे. तर नऊ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. गोंदिया तालुक्यात एक हजार ३५४ हेक्टर, गोरेगावात ५०४, तिरोडा येथे ११६, सडक अर्जुनी ३३६, अर्जुनी मोरगाव ५१५, आमगाव १६८, सालेकसा ९७२, देवरी पाच हजार ०९२ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. एकूण नऊ हजार ०५७ हेक्टरमधील आवत्या मिळून जिल्ह्यात एक लाख ४३ हजार १०२.२० हेक्टरमध्ये धानपीक लावण्यात आले आहे.तीळ व तुरीच्या पिकांची स्थितीकृषी विभागाच्या माहितीनुसार तीळ पिकाचे बोंडे पक्वहोण्याच्या अवस्थेत असून येत्या पंधरवाड्यात काढणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यात तुर पिकाची लागवड बांधावर केली जात असून तुर पीक वाढीच्या अवस्थेत आहे.तालुकानिहाय भातपिकाचे नापेर क्षेत्रकाही दिवसांपासून अधूनमधून पाऊस येत आहे. काही शेतकºयांनी हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली आहे. काही ठिकाणी धान कापून बांधात ठेवण्यातही आले आहे. मात्र परतीच्या पावसाने कापलेले धानपीक ओले होवून अंकुरितही झाले आहे. बांधात पाणी साचल्यामुळे धान खराब झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शासन-प्रशासनाने सर्व्हेक्षण करून शेतकºयांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे.