शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

उत्पादनात होणार ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:37 IST

जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : जिल्ह्यात ४८ हजार हेक्टर नापेर क्षेत्र

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. त्यामुळे यावर्षी धान उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी शासनाने पाठविलेल्या अहवालानुसार, हलक्या भातपिकांच्या कापणीला सध्या सुरूवात झाली आहे. यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक नसल्यामुळे उत्पादनात जवळपास ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांची शेती निसर्गावर अवलंबून आहे व थोड्याफार क्षेत्रामध्ये लागवड केली होती, त्या शेतकºयांच्या भातपिकांची वाढ खुंटली आहे. लोंबीमध्ये दाणे पूर्णपणे भरले नाहीत.सद्यस्थितीत मध्यम व भारी धानपिकांच्या लोंबी बाहेर पडणे व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. कोरडवाहू भातपिकांच्या लोंबातील दाणे पावसाअभावी केवळ ३५ ते ४० टक्के भरलेले आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांचे पीक समाधानकारक आहे. सध्याची पीक परिस्थिती बघून भातपिकाची सरासरी उत्पादकता जवळपास एक हजार ते एक हजार १०० किलोग्रॅम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मध्यम व भारी भातपिकांवर खोडकिडीचा १ टक्के व करपा रोगाचा १ ते २ टक्के प्रादुर्भाव दिसून आलेला आल्याचे कृषी विभागाने अहवालात नमूद केले आहे.जिल्ह्यात एकूण एक लाख ९१ हजार ०३१ हेक्टर धानपीक उत्पादनाचा क्षेत्र आहे. यापैकी एक लाख ४३ हजार १०२ हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक लावण्यात आले आहे. तर ४७ हजार ९२९ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. सद्यस्थितीत हलके धानपीक कापणीला शेतकºयांनी सुरूवात केली आहे. मध्यम व भारी धानापिकावर खोडकिडा व करपा रोगाचा काही प्रमाणात प्रभाव दिसत आहे.९ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्याजिल्ह्यात एकूण एक लाख ३४ हजार ०४५.२० हेक्टर क्षेत्रात धानपीक लावण्यात आले आहे. तर नऊ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. गोंदिया तालुक्यात एक हजार ३५४ हेक्टर, गोरेगावात ५०४, तिरोडा येथे ११६, सडक अर्जुनी ३३६, अर्जुनी मोरगाव ५१५, आमगाव १६८, सालेकसा ९७२, देवरी पाच हजार ०९२ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. एकूण नऊ हजार ०५७ हेक्टरमधील आवत्या मिळून जिल्ह्यात एक लाख ४३ हजार १०२.२० हेक्टरमध्ये धानपीक लावण्यात आले आहे.तीळ व तुरीच्या पिकांची स्थितीकृषी विभागाच्या माहितीनुसार तीळ पिकाचे बोंडे पक्वहोण्याच्या अवस्थेत असून येत्या पंधरवाड्यात काढणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यात तुर पिकाची लागवड बांधावर केली जात असून तुर पीक वाढीच्या अवस्थेत आहे.तालुकानिहाय भातपिकाचे नापेर क्षेत्रकाही दिवसांपासून अधूनमधून पाऊस येत आहे. काही शेतकºयांनी हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली आहे. काही ठिकाणी धान कापून बांधात ठेवण्यातही आले आहे. मात्र परतीच्या पावसाने कापलेले धानपीक ओले होवून अंकुरितही झाले आहे. बांधात पाणी साचल्यामुळे धान खराब झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शासन-प्रशासनाने सर्व्हेक्षण करून शेतकºयांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे.