शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उत्पादनात होणार ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:37 IST

जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : जिल्ह्यात ४८ हजार हेक्टर नापेर क्षेत्र

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. त्यामुळे यावर्षी धान उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी शासनाने पाठविलेल्या अहवालानुसार, हलक्या भातपिकांच्या कापणीला सध्या सुरूवात झाली आहे. यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक नसल्यामुळे उत्पादनात जवळपास ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांची शेती निसर्गावर अवलंबून आहे व थोड्याफार क्षेत्रामध्ये लागवड केली होती, त्या शेतकºयांच्या भातपिकांची वाढ खुंटली आहे. लोंबीमध्ये दाणे पूर्णपणे भरले नाहीत.सद्यस्थितीत मध्यम व भारी धानपिकांच्या लोंबी बाहेर पडणे व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. कोरडवाहू भातपिकांच्या लोंबातील दाणे पावसाअभावी केवळ ३५ ते ४० टक्के भरलेले आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांचे पीक समाधानकारक आहे. सध्याची पीक परिस्थिती बघून भातपिकाची सरासरी उत्पादकता जवळपास एक हजार ते एक हजार १०० किलोग्रॅम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मध्यम व भारी भातपिकांवर खोडकिडीचा १ टक्के व करपा रोगाचा १ ते २ टक्के प्रादुर्भाव दिसून आलेला आल्याचे कृषी विभागाने अहवालात नमूद केले आहे.जिल्ह्यात एकूण एक लाख ९१ हजार ०३१ हेक्टर धानपीक उत्पादनाचा क्षेत्र आहे. यापैकी एक लाख ४३ हजार १०२ हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक लावण्यात आले आहे. तर ४७ हजार ९२९ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. सद्यस्थितीत हलके धानपीक कापणीला शेतकºयांनी सुरूवात केली आहे. मध्यम व भारी धानापिकावर खोडकिडा व करपा रोगाचा काही प्रमाणात प्रभाव दिसत आहे.९ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्याजिल्ह्यात एकूण एक लाख ३४ हजार ०४५.२० हेक्टर क्षेत्रात धानपीक लावण्यात आले आहे. तर नऊ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. गोंदिया तालुक्यात एक हजार ३५४ हेक्टर, गोरेगावात ५०४, तिरोडा येथे ११६, सडक अर्जुनी ३३६, अर्जुनी मोरगाव ५१५, आमगाव १६८, सालेकसा ९७२, देवरी पाच हजार ०९२ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. एकूण नऊ हजार ०५७ हेक्टरमधील आवत्या मिळून जिल्ह्यात एक लाख ४३ हजार १०२.२० हेक्टरमध्ये धानपीक लावण्यात आले आहे.तीळ व तुरीच्या पिकांची स्थितीकृषी विभागाच्या माहितीनुसार तीळ पिकाचे बोंडे पक्वहोण्याच्या अवस्थेत असून येत्या पंधरवाड्यात काढणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यात तुर पिकाची लागवड बांधावर केली जात असून तुर पीक वाढीच्या अवस्थेत आहे.तालुकानिहाय भातपिकाचे नापेर क्षेत्रकाही दिवसांपासून अधूनमधून पाऊस येत आहे. काही शेतकºयांनी हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली आहे. काही ठिकाणी धान कापून बांधात ठेवण्यातही आले आहे. मात्र परतीच्या पावसाने कापलेले धानपीक ओले होवून अंकुरितही झाले आहे. बांधात पाणी साचल्यामुळे धान खराब झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शासन-प्रशासनाने सर्व्हेक्षण करून शेतकºयांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे.