शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

परीक्षा सुरू असताना अनेक शाळांचा वीज पुरवठा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:58 IST

उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय : संबंधित विभागाचे दुर्लक्ष

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू असताना विद्युत विभागाने थकीत वीज बिलामुळे शाळांचावीज पुरवठा खंडित करण्याच्या सपाटा लावला आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी विद्यार्थ्यांचे हाल बेहाल होत आहेत. विजेअभावी शाळेतील अनेक उपकरणे बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

सालेकसा तालुक्यात जवळपास दीडशे शाळा असून त्यापैकी ११२ पेक्षा जास्त जिल्हा परिषदेच्या शाळा आहे. आतापर्यंत निम्म्या शाळांचा वीज पुरवठा महावितरणे खंडित केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असताना व दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. अशात वीज पुरवठा खंडित झाल्याने शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघात होण्याची शक्यता बळावली आहे. विद्याथ्र्याचे हाल बेहाल होताना पाहून शाळेच्या शिक्षकांनी विद्युत विभागाला विनंती केली की किमान परीक्षा संपेपर्यंत तरी विद्युत पुरवठा खंडित करू नये. परंतु महावितरणने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. वीज बिल भरा तरच विद्युत पुरवठा नियमित केला जाईल असे सांगत आहेत. अनेक शाळांमध्ये वीज नसल्याने शाळेतील पाण्याचे पंप सुद्धा बंद पडले आहेत. शाळेत पिण्याचे पाणी, संगणक, प्रोजेक्टर, लाईट, पंखे आदी विजेवर चालणारे उपकरण बंद पडले आहे. विशेष म्हणजे पंखे बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून परीक्षा द्यावी लागत आहे. तालुक्यातील खोलगड, कुणबीटोला, साखरीटोला, रामाटोला, चिचटोलासह जवळपास ५० शाळांमधील वीज पुरवठा खंडित आला आहे.

सीईओच्या आदेशाला ग्रा.पं.ची केराची टोपलीप्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या महसुलापैकी वीस टक्के रक्कम गावातील शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करायची असते. त्याअंतर्गत प्राथमिक शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतने निधीची तरतूद करणे आवश्यक असते. परंतु बन्ऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायती याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पुढे आले.ही बाब लक्षात घेता जून २०२४ मध्ये जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी आदेश काढला आणि गटविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामपंचायतींना सांगितले की पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी. त्यात वीज बिल भरणे, जिथे विद्युत कनेक्शन नाही तिथे कनेक्शन देणे, या बाबींच्या समावेश होता. परंतु याकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष झाले आहे.

"वीज पुरवठा खंडित केल्याने शाळेतील सर्व विजेची उपकरण बंद पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थी निवांत परीक्षा देऊ शकत नाही. विद्युत अभियंता यांना किमान पंधरा दिवस वीज जोडणी करण्यासाठी विनंती केली. परंतु त्यांनी थकीत बिल भरा असे सांगत याकडे दुर्लक्ष केले."- बी.जी. बुलाखे, मुख्याध्यापक, खोलगड

टॅग्स :gondiya-acगोंदियाelectricityवीजSchoolशाळा