शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गुंडगिरीविरुद्ध शक्तीप्रदर्शन

By admin | Updated: May 8, 2016 01:32 IST

गोंदिया शहरातील वाढत्या गुंडगिरीला लोक किती कंटाळले आहेत आणि त्याबाबत त्यांच्या भावना काय आहेत याचा प्रत्यय शनिवारी शहरात निघालेल्या भव्य मोर्चातून आला.

नाऱ्यांनी दणाणले गोंदिया : ये कैसी सरकार है, अपराधो की बहार है...गोंदिया : गोंदिया शहरातील वाढत्या गुंडगिरीला लोक किती कंटाळले आहेत आणि त्याबाबत त्यांच्या भावना काय आहेत याचा प्रत्यय शनिवारी शहरात निघालेल्या भव्य मोर्चातून आला. तब्बल १० हजारावर नागरिकांनी भर उन्हात मोर्चात सहभागी होऊन आपल्या मनातील चिड व्यक्त केली. यावेळी पोलिसांसोबत सरकारबद्दलही रोष व्यक्त करण्यात आला.सर्कस मैदानावरून दुपारी २ वाजता हा मोर्चा निघणार होता. त्यामुळे १ वाजतापासून नागरिकांची गर्दी जमत होती. गोंदिया तालुक्याच्या ग्रामीण भागासह जिल्हाभरातील अनेक ठिकाणावरून काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पिरिपाचे जोगेंद्र कवाडे हेसुद्धा मोर्चात अग्रभागी होते. भर दुपारच्या कडक उन्हात विनातक्रार मोर्चेकरी महिला-पुरूष विविध फलक हाती घेऊन नारेबाजी करीत पुढे पुढे सरकत होते. हाताला, डोक्याला काळ्या फिती लावून मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले नागरिक गोंदियावासियांसाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय होता. वाटेत पडणाऱ्या महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करीत आणि हारार्पण करीत हा मोर्चा मुख्य मार्गाने फिरून दुपारी ४ वाजता स्टेडियम समोरील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.‘ये कैसी सरकार है, अपराधो की बहार है, गुंडागर्दी नही चलेगी नही चलेगी, आरोपी को अरेस्ट करो, अरेस्ट करो, बढती गुंदागर्दी के खिलाफ, हम है विधायकजी के साथ’ अशा विविध घोषणांनी परिसर दणाणू गेला होता.मोर्चा सभास्थळी पोहोचल्यानंतर सुरूवातीला माजी आ.दिलीप बन्सोड यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात सध्या राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नाहीत तर सामान्य जनतेचे काय हाल असणार, असा प्रश्न करून सरकारला धारेवर धरले. बंडूभाऊ सावरबांधे यांनी हे मुक्या-बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे सरकार असल्याची टीका केली. आ.राजेंद्र जैन यांनी इतक्या दिवसात आरोपींना पकडू न शकणारे सरकार किती दुर्बल आहे याचा प्रत्यय येत असल्याचे सांगितले. आ.अग्रवाल यांनी आपल्या ४० वर्षाच्या सार्वजनिक जीवनात आणि ५ वेळा आमदार म्हणून राहिलो असताना अशा पद्धतीचे वातावरण कधी पाहिले नसल्याचे ते म्हणाले. हे बिहार-उत्तरप्रदेश नाही, भाजप सरकारने तसे वातावरण इथे करून ठेवले आहे. न.प.मधील भ्रष्टाचाराचे आपण कधीही समर्थन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले. सभेनंतर उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांना निवेदन दिले. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हा परिषदेतील युती झाला चर्चेचा विषय- हा मोर्चा सर्कस मैदानातून निघाल्यानंतर जयस्तंभ चौक, गांधी पुतळा चौक, चांदनी चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक मार्गाने एसडिओ कार्यालयासमोर पोहोचला.- गांधी पुतळा चौकात महात्मा गांधी, नेहरू पुतळा चौकात पंडित नेहरूंच्या पुतळ्यांना हारार्पण करण्यात आले.- या सर्वपक्षिय मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेतील भाजप-काँग्रेस युतीवर काढलेला चिमटा सभेनंतर चर्चेचा विषय होता. जिल्हा परिषदेत ही युती राहणार की तुटणार यावर चर्चा रंगत होती.- या मोर्चाची पार्श्वभूमी पाहता मोर्चादरम्यान कोणतीही गडबड होऊ नये म्हणून अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त लावला होता.