शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरीविरुद्ध शक्तीप्रदर्शन

By admin | Updated: May 8, 2016 01:32 IST

गोंदिया शहरातील वाढत्या गुंडगिरीला लोक किती कंटाळले आहेत आणि त्याबाबत त्यांच्या भावना काय आहेत याचा प्रत्यय शनिवारी शहरात निघालेल्या भव्य मोर्चातून आला.

नाऱ्यांनी दणाणले गोंदिया : ये कैसी सरकार है, अपराधो की बहार है...गोंदिया : गोंदिया शहरातील वाढत्या गुंडगिरीला लोक किती कंटाळले आहेत आणि त्याबाबत त्यांच्या भावना काय आहेत याचा प्रत्यय शनिवारी शहरात निघालेल्या भव्य मोर्चातून आला. तब्बल १० हजारावर नागरिकांनी भर उन्हात मोर्चात सहभागी होऊन आपल्या मनातील चिड व्यक्त केली. यावेळी पोलिसांसोबत सरकारबद्दलही रोष व्यक्त करण्यात आला.सर्कस मैदानावरून दुपारी २ वाजता हा मोर्चा निघणार होता. त्यामुळे १ वाजतापासून नागरिकांची गर्दी जमत होती. गोंदिया तालुक्याच्या ग्रामीण भागासह जिल्हाभरातील अनेक ठिकाणावरून काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पिरिपाचे जोगेंद्र कवाडे हेसुद्धा मोर्चात अग्रभागी होते. भर दुपारच्या कडक उन्हात विनातक्रार मोर्चेकरी महिला-पुरूष विविध फलक हाती घेऊन नारेबाजी करीत पुढे पुढे सरकत होते. हाताला, डोक्याला काळ्या फिती लावून मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले नागरिक गोंदियावासियांसाठी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय होता. वाटेत पडणाऱ्या महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करीत आणि हारार्पण करीत हा मोर्चा मुख्य मार्गाने फिरून दुपारी ४ वाजता स्टेडियम समोरील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.‘ये कैसी सरकार है, अपराधो की बहार है, गुंडागर्दी नही चलेगी नही चलेगी, आरोपी को अरेस्ट करो, अरेस्ट करो, बढती गुंदागर्दी के खिलाफ, हम है विधायकजी के साथ’ अशा विविध घोषणांनी परिसर दणाणू गेला होता.मोर्चा सभास्थळी पोहोचल्यानंतर सुरूवातीला माजी आ.दिलीप बन्सोड यांना भाषणासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात सध्या राज्यात लोकप्रतिनिधीच सुरक्षित नाहीत तर सामान्य जनतेचे काय हाल असणार, असा प्रश्न करून सरकारला धारेवर धरले. बंडूभाऊ सावरबांधे यांनी हे मुक्या-बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे सरकार असल्याची टीका केली. आ.राजेंद्र जैन यांनी इतक्या दिवसात आरोपींना पकडू न शकणारे सरकार किती दुर्बल आहे याचा प्रत्यय येत असल्याचे सांगितले. आ.अग्रवाल यांनी आपल्या ४० वर्षाच्या सार्वजनिक जीवनात आणि ५ वेळा आमदार म्हणून राहिलो असताना अशा पद्धतीचे वातावरण कधी पाहिले नसल्याचे ते म्हणाले. हे बिहार-उत्तरप्रदेश नाही, भाजप सरकारने तसे वातावरण इथे करून ठेवले आहे. न.प.मधील भ्रष्टाचाराचे आपण कधीही समर्थन करणार नसल्याचे ठणकावून सांगितले. सभेनंतर उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांना निवेदन दिले. (जिल्हा प्रतिनिधी)जिल्हा परिषदेतील युती झाला चर्चेचा विषय- हा मोर्चा सर्कस मैदानातून निघाल्यानंतर जयस्तंभ चौक, गांधी पुतळा चौक, चांदनी चौक, गोरेलाल चौक, नेहरू चौक मार्गाने एसडिओ कार्यालयासमोर पोहोचला.- गांधी पुतळा चौकात महात्मा गांधी, नेहरू पुतळा चौकात पंडित नेहरूंच्या पुतळ्यांना हारार्पण करण्यात आले.- या सर्वपक्षिय मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात जिल्हा परिषदेतील भाजप-काँग्रेस युतीवर काढलेला चिमटा सभेनंतर चर्चेचा विषय होता. जिल्हा परिषदेत ही युती राहणार की तुटणार यावर चर्चा रंगत होती.- या मोर्चाची पार्श्वभूमी पाहता मोर्चादरम्यान कोणतीही गडबड होऊ नये म्हणून अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त लावला होता.