शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

‘ग्रामगीते’तच जीवन जगण्याचे सामर्थ्य

By admin | Updated: January 22, 2017 01:00 IST

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अगदी साध्या व सोप्या भाषेत सर्वसामान्य बहुजन समाजाला समजावून दिले आहे.

हभप प्रशांत ठाकरे महाराज : बोंडगावदेवी येथे ग्रामगीता संगीतमय प्रवचन बोंडगावदेवी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अगदी साध्या व सोप्या भाषेत सर्वसामान्य बहुजन समाजाला समजावून दिले आहे. अशी पवित्र ग्रामगीता लिहून ठेवली. तुकडोजीच्या ग्रामगीतामध्ये अखिल मानवजातीचे कल्याण दडले आहे. जगात अनेक धार्मिक पोथ्या, पारायण, ग्रंथ लिहिल्या गेली. परंतु ग्रामगीता एक पवित्र गं्रंथ आहे. पारायण करण्यासाठी ग्रामगीता नसून आचरण करण्यासाठी आहे. समाजातील युवकांनो जागे व्हा. राष्ट्र जागवा हाताला हात धरुन पूजा होत नाही. गावात वावरणारे सामान्य जनता देव आहे, असे ग्रामगीता सांगते. वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मध्येच खरा जीवन जगण्याचे सामर्थ्य दडलेले असल्याचे उदगार गुरुकुंझ मोझरी आश्रमाचे हभप युवा प्रवचनकार प्रशांत ठाकरे यांनी केले. बोंडगावदेवीच्या बाजार चौकात सार्वजनिक समाज मंदिरात आयोजित ७ दिवसीय ग्रामगीता संगीतमय कथा प्रवचनात ग्रामस्थांना प्रबोधन करतांना ते बोलत होते. सर्वप्रथम त्यांनी मानवी जिवनात प्रार्थनेलाा महत्व कसे आहे याबद्दल सविस्तर विवेचन केले. प्रार्थनामुळे बालवयातील मुलांना लहानपणाला सुशोभित करणारे संस्कार, युवकांना त्यागाची, म्हातारपणात नामस्मरणाची संधी प्राप्त होते. मानवी मन विचलित न होता प्रार्थना एकाग्रता शिकविते. मानव जातीच्या कल्याणासाठी तुकडोजी महाराजांनी प्रार्थना सांगितलेली असल्याचे म्हटले. सामान्य माणसाला जीवन जगण्याचे सामर्थ्य देऊन लोक कल्याणार्थ संदेश देण्याचे काम ग्रामगीता करीत आहे. अमूल्य असा ठेवीचा ग्रंथ आहे. देशाला ग्रामगीतेची गरज आहे. तुकडोजी महाराज पंढरपूरला बसून विश्वाची चिंता करीत होते. ४ हजार ६६७ ओव्यांचा अंतर्भाव असलेला पवित्र अशी ग्रामगीता लिहून त्यांनी बहूजन समाजावर अनंत उपकार केलेले आहेत. कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे विचार समाजाला तारणारे आहेत. मानवाच्या जगण्याचे सारे सार ग्रामगीतामध्ये आहे. माझं गाव मंदिर आहे. कोणत्या मंदिरात जाण्याची गरज नाही. ‘रिकामा कशाला फिरत, तुझ गावच नाही का? तिर्थ’ अशी राष्ट्रसंताची शिकवणूक असल्याचे त्यांनी प्रवचनात सांगितले. काल्पनीक कल्पना करुन देशात अनेक ग्रंथाचे लिखाण करण्यात आले आहे. परंतु तुकडोजी महाराजांची ग्रामगीता नाविण्यपूर्ण आहे. समस्त साधू-संताचे लोकांना उपयोगी पडणारे विचार अत्यंत साध्या भाषेतून तुकडोजींनी ग्रामगीतेमधून सांगितले आहे. बदलत्या काळाची सूत्र ओळखून गीतेमध्ये सार आहे. कोणाच्या अंगात, मंदिरात देव बसला नसून खरा देव आपल्या अर्तमनात आहे अशी ग्रामगीता शिकविते. जो माणूस कष्ट करुन इतरांना जगवितो तोच खरा देव आहे. देवाच्या नावावर दर्शन दाखविण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्यांची संख्या समाजात कमी नाही असे त्यांनी प्रवचनातून सांगितले. नैवद्य, नारळ अर्पण केल्याने देव पावत नाही. देव फक्त भावाचा-प्रेमाचा भुकेला आहे. वंदनीय तुकडोजी महाराजांनी कधीही यज्ञ केला नाही. समाजातील सर्व साधूसंताचे विचार अत्यंत साध्या सरळ भाषेतून तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ मधून मांडले आहे. ते विचार आत्मसात करा. बदलत्या काळाची परिस्थिती ओळखूनच ग्रामगीताचा सार आहे. जो आपल्या कामाशी प्रामाणिक, नितिमत्तेनी वाचतो तोच खरा मानव आहे. घरामध्ये होम-यज्ञ करणाऱ्याचे कित्येक पिढ्या बर्बाद झाल्या. इंद्रियावर ताबा मिळविण्याचे मर्म गाडगेबाबांनी सांगितले. समस्य बहुजन समाजाला मुक्तीचा, जगण्याचा मार्ग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अप्रतिम अशा ग्रामगीतामधून विषद केला आहे. घरोघरी ग्रामगीताचे वाचन आवश्यक असल्याचे हभप प्रशांत ठाकरे यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.(वार्ताहर)