शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

‘ग्रामगीते’तच जीवन जगण्याचे सामर्थ्य

By admin | Updated: January 22, 2017 01:00 IST

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अगदी साध्या व सोप्या भाषेत सर्वसामान्य बहुजन समाजाला समजावून दिले आहे.

हभप प्रशांत ठाकरे महाराज : बोंडगावदेवी येथे ग्रामगीता संगीतमय प्रवचन बोंडगावदेवी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अगदी साध्या व सोप्या भाषेत सर्वसामान्य बहुजन समाजाला समजावून दिले आहे. अशी पवित्र ग्रामगीता लिहून ठेवली. तुकडोजीच्या ग्रामगीतामध्ये अखिल मानवजातीचे कल्याण दडले आहे. जगात अनेक धार्मिक पोथ्या, पारायण, ग्रंथ लिहिल्या गेली. परंतु ग्रामगीता एक पवित्र गं्रंथ आहे. पारायण करण्यासाठी ग्रामगीता नसून आचरण करण्यासाठी आहे. समाजातील युवकांनो जागे व्हा. राष्ट्र जागवा हाताला हात धरुन पूजा होत नाही. गावात वावरणारे सामान्य जनता देव आहे, असे ग्रामगीता सांगते. वंदनीय तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता मध्येच खरा जीवन जगण्याचे सामर्थ्य दडलेले असल्याचे उदगार गुरुकुंझ मोझरी आश्रमाचे हभप युवा प्रवचनकार प्रशांत ठाकरे यांनी केले. बोंडगावदेवीच्या बाजार चौकात सार्वजनिक समाज मंदिरात आयोजित ७ दिवसीय ग्रामगीता संगीतमय कथा प्रवचनात ग्रामस्थांना प्रबोधन करतांना ते बोलत होते. सर्वप्रथम त्यांनी मानवी जिवनात प्रार्थनेलाा महत्व कसे आहे याबद्दल सविस्तर विवेचन केले. प्रार्थनामुळे बालवयातील मुलांना लहानपणाला सुशोभित करणारे संस्कार, युवकांना त्यागाची, म्हातारपणात नामस्मरणाची संधी प्राप्त होते. मानवी मन विचलित न होता प्रार्थना एकाग्रता शिकविते. मानव जातीच्या कल्याणासाठी तुकडोजी महाराजांनी प्रार्थना सांगितलेली असल्याचे म्हटले. सामान्य माणसाला जीवन जगण्याचे सामर्थ्य देऊन लोक कल्याणार्थ संदेश देण्याचे काम ग्रामगीता करीत आहे. अमूल्य असा ठेवीचा ग्रंथ आहे. देशाला ग्रामगीतेची गरज आहे. तुकडोजी महाराज पंढरपूरला बसून विश्वाची चिंता करीत होते. ४ हजार ६६७ ओव्यांचा अंतर्भाव असलेला पवित्र अशी ग्रामगीता लिहून त्यांनी बहूजन समाजावर अनंत उपकार केलेले आहेत. कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचे विचार समाजाला तारणारे आहेत. मानवाच्या जगण्याचे सारे सार ग्रामगीतामध्ये आहे. माझं गाव मंदिर आहे. कोणत्या मंदिरात जाण्याची गरज नाही. ‘रिकामा कशाला फिरत, तुझ गावच नाही का? तिर्थ’ अशी राष्ट्रसंताची शिकवणूक असल्याचे त्यांनी प्रवचनात सांगितले. काल्पनीक कल्पना करुन देशात अनेक ग्रंथाचे लिखाण करण्यात आले आहे. परंतु तुकडोजी महाराजांची ग्रामगीता नाविण्यपूर्ण आहे. समस्त साधू-संताचे लोकांना उपयोगी पडणारे विचार अत्यंत साध्या भाषेतून तुकडोजींनी ग्रामगीतेमधून सांगितले आहे. बदलत्या काळाची सूत्र ओळखून गीतेमध्ये सार आहे. कोणाच्या अंगात, मंदिरात देव बसला नसून खरा देव आपल्या अर्तमनात आहे अशी ग्रामगीता शिकविते. जो माणूस कष्ट करुन इतरांना जगवितो तोच खरा देव आहे. देवाच्या नावावर दर्शन दाखविण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्यांची संख्या समाजात कमी नाही असे त्यांनी प्रवचनातून सांगितले. नैवद्य, नारळ अर्पण केल्याने देव पावत नाही. देव फक्त भावाचा-प्रेमाचा भुकेला आहे. वंदनीय तुकडोजी महाराजांनी कधीही यज्ञ केला नाही. समाजातील सर्व साधूसंताचे विचार अत्यंत साध्या सरळ भाषेतून तुकडोजी महाराजांनी ‘ग्रामगीता’ मधून मांडले आहे. ते विचार आत्मसात करा. बदलत्या काळाची परिस्थिती ओळखूनच ग्रामगीताचा सार आहे. जो आपल्या कामाशी प्रामाणिक, नितिमत्तेनी वाचतो तोच खरा मानव आहे. घरामध्ये होम-यज्ञ करणाऱ्याचे कित्येक पिढ्या बर्बाद झाल्या. इंद्रियावर ताबा मिळविण्याचे मर्म गाडगेबाबांनी सांगितले. समस्य बहुजन समाजाला मुक्तीचा, जगण्याचा मार्ग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अप्रतिम अशा ग्रामगीतामधून विषद केला आहे. घरोघरी ग्रामगीताचे वाचन आवश्यक असल्याचे हभप प्रशांत ठाकरे यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.(वार्ताहर)