महसूल विभागाच्यावतीने १ नोव्हेंबर २०१७ मध्ये भरनोली तलाठी कार्यालयाचे विभाजन करुन राजोली येथे नवीन तलाठी कार्यालय सुरू केले. तहसीलदारांमार्फत १५ डिसेंबर २०१७ या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. ...
तेंदुपत्ता व्यवसायाला मागील वर्षी आलेली अवकळा यंदाही असणार असे चित्र दिसून येत आहे. तेंदुपत्ता व्यवसायावर मंदीमुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असतानाच मजुरांनाही त्याची झळ सहन करावी लागली होती. ...
जवळील ठाणेगाव येथील अरुण पवनकर यांच्या घराला आग लागल्याने त्यांचे घर जळून खास झाले. बुधवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात पवनकर कुटुंबीयांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले. ...
धान पिकाला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाकडून महिनाभरापासून पाणी सोडले जात आहे. मात्र कालवा फुटल्यामुळे सालेकसा तालुक्यातील तीन गावांतील ६०० शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. परिणामी तीन गावातील या शेतकऱ्यांचे धान पीक संकटात आले आहे. ...
मागील वर्षी सुध्दा मार्च महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. तर यंदा आॅक्टोबर महिन्यात डांर्गोली येथील पाण्याच्या पातळीत घट झाल्याने शहरवासीयांना आठ दिवस अनियमित पाणी पुरवठा करण्यात आला होता. ...
आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. ...
उच्च न्यायालयाने गोवारी हे आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र शासन न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून गोवारी समाजाला न्याय द्यावा. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मुलमंत्र देवून संपूर्ण देशात स्वच्छता मोहिम राबविली. परंतू स्वच्छता करणारा सफाई कर्मचारी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे. ...