शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

२६ पैकी केवळ १० कर्मचारी कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:08 PM

येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची शासकीय मान्यता मिळाली आहे. या रुग्णालयात वर्ग एक ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह २६ पदे मंजूर आहेत.मात्र यापैकी १६ पदे भरण्यात आली असली तरी प्रत्यक्षात १० अधिकारी कर्मचारी सध्या स्थितीत कार्यरत आहे.

ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय : रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची शासकीय मान्यता मिळाली आहे. या रुग्णालयात वर्ग एक ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह २६ पदे मंजूर आहेत.मात्र यापैकी १६ पदे भरण्यात आली असली तरी प्रत्यक्षात १० अधिकारी कर्मचारी सध्या स्थितीत कार्यरत आहे. परिणामी उपचारासाठी येणाºया रुग्णांचे हाल होत आहे.नवेगावबांध ग्रामीण रुग्णालय आदिवासी नक्षलग्रस्त, दुर्गम भागात असल्याने या क्षेत्रातील आदिवासी, गरीब जनतेची आरोग्य सेवा याच ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे. एक वैद्यकीय अधिकारी आणि एक अधिपरिचारिका यांच्या भरोश्यावर रुग्णालयाचा कारभार सुरू आहे.रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात यावी अन्यथा या विरोधात आंदोलन व कुलूप ठोकण्याचा इशारा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतिश कोसरकर यांनी दिला आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रूग्णांची कशी गैरसोय होत आहे. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या लक्षात अनेकदा आणून दिली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ८ जुलैला बदली झालेल्या डॉ. संदीप खुपसे यांना रात्रीला तात्काळ कार्यमुक्त केले. देवरीच्या डॉ. गुल्हाने यांना या रुग्णालयाचा कार्यभार स्वत: उपस्थित राहून रात्रीच सोपविला. त्यांचा रुग्णालयाला कसलाही लाभ झाला नाही. हीच तत्परता प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हिंमतराव मेश्राम यांनी डॉ. खुपसे यांना कार्यमुक्त दाखविले. तेवढीच तत्परता या रुग्णालयाला आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, औषधी निर्माता व इतर पदांची रिक्तपदे भरण्यात आली असती तर रुग्णालयाची आरोग्यसेवा सुरळीत झाली असती, असेही कोसरकर यांनी निवेदनातून म्हटले आहे. नवेगावबांध परिसरातील गरीब आदिवासी रुग्णांसह शासनमान्य पाच आदिवासी आश्रमशाळा तीन वसतीगृहे, केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य सेवा सुध्दा याच रुग्णालयावर अवलंबून आहे. बाह्यरुग्ण तपासणी विभागात दररोज ३०० ते ४०० रुग्ण तपासणी व उपचारासाठी या रुग्णालयात येतात.वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पदभार द्यायेथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी. डॉ.गुल्हाने यांच्याऐवजी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देऊन येथील आरोग्य सेवा सुरळीत करावी अशी मागणी सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी पालकमंत्री परिणय फुके यांच्याकडे लेखी निवेदनातून केली.जिल्हा शल्यचिकित्सकांचे आश्वासन हवेत९ जुलैला जिल्हा शल्यचिकित्सकांनी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे त्वरीत भरण्याचे आश्वासन सरपंच अनिरुध्द मेश्राम यांना दिले होते. मात्र दोन दिवस लोटूनही या आश्वासनाची पुर्तता केली नाही. वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका प्रतिनियुक्तीवर किंवा नियुक्तीवर अद्यापही रुजू झाले नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आश्वासन हवेत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल