सामान्य व्यवहारावर परिणाम
By Admin | Updated: November 12, 2016 00:57 IST2016-11-12T00:57:51+5:302016-11-12T00:57:51+5:30
सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. एकाएकी झालेल्या निर्णयामुळे तालुक्यातील उद्योगपती,

सामान्य व्यवहारावर परिणाम
नोटांच्या बंदीचा फटका : बॅँका व एटीएममध्ये उसळली गर्दी
बोंडगावदेवी : सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. एकाएकी झालेल्या निर्णयामुळे तालुक्यातील उद्योगपती, व्यावसायीकांसह सर्व सामान्य जनतेची तारांबळ उडाली. दैनंदिन व्यवहारातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्याने ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या व्यवहारावर सुद्धा विपरित परिणाम झाल्याचे गुरूवारी (दि.१०) दिसून येत होते.
नोटा बाद झाल्याचे घोषित होताच १०० व ५० रुपयांचा तुटवडा सुद्धा जाणवू लागला आहे. अति आवश्यक ठिकाणी ५०० व १००० रुपयाच्या नोटा घ्या असे आदेश असले तरी तालुक्याच्या व गावात संबंधितांकडून व्यवहार करायला नकार मिळत असल्याने सामान्य जनता मात्र कमालीची हतबल झालेली आज दिसली. दैनंदिन व्यवहारातून ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा बाद होताच तालुक्याच्या व्यापार नगरीवर मंदिचे सावट झाल्याचे चित्र दिसत होते. गौरव हॉटेलचे मालक अशोक भाग्यवंत यांनी सांगितले की नोटा बाद झाल्याने हॉटेलमध्ये येणाऱ्यांची संख्या मात्र रोडावली. अडचणीतील ग्राहकांना ५०० नोट घेवून त्यांची गरज भागविल्याचे सांगितले. काऊंटर कमी भासला. पतंजली आरोग्य केंद्रात आज नेहमीपेक्षा म्हणजे २५ टक्के आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगिले. लोहा, सिमेंट विक्रेत्यांनी ५०० व १००० रुपये बाद झाल्याने मालाच्या विक्रीवर आळा बसल्याचे जाणवले असे सांगितले. शहरातील पेट्रोल पंप चालकांनी ५०० रुपयांचे पेट्रोल घेतल्यावरच ५०० ची नोट घेतली जाईल असा फतवाच काढला. एकंदरित सामान्य व्यवहार सुद्धा कोलमडल्यासारखे आजचे चित्र दिसले. (वार्ताहर)