जिल्ह्यात नऊ टक्के रोवण्या-आवत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:03 IST2019-07-26T00:03:10+5:302019-07-26T00:03:58+5:30
वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या.

जिल्ह्यात नऊ टक्के रोवण्या-आवत्या
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या. परंतु बळीराजावर आता निसर्गही कोपल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती दिसून येत आहे.
गोंदिया जिल्ह्यात खरीप पिकासाठी दोन लाख पाच हजार ८६९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी भात पिकासाठी एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी सहा हजार ५९१.४० हेक्टर क्षेत्रात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली. तर १७ हजार ६३४.४० हेक्टर जमिनीत धानाची नर्सरी लावण्यात आली. यापैकी १० हजार ४१७.९७ हेक्टर रोवणीचे काम झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहता आवत्या व रोवणी पकडल्यास फक्त नऊ टक्के काम झाले आहे. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या आटोपायला पाहिजे होत्या. परंतु तसे काही झाले नाही.
९ जुलै पासून पावसाने सतत दडी मारल्यामुळे शेतात टाकण्यात आलेले पºहे कोमेजले आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. यासाठी इतर उपाय योजना करणे गरजेचे आहे. दरवर्षीच्या तुलनेत २४ जुलै पर्यंत सरासरी ५६७.१२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. परंतु आतापर्यंत फक्त २५४.६९ मिमी म्हणजेच ४५ टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे स्पष्ट चिन्ह आहेत. शासनाने गोंदिया जिल्हा शंभरटक्के दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
जिल्ह्यात उशीरा पाऊस पडला आणि पहिल्या पावसानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेले पºहे करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात १३ हजार ८२५ क्विंटल कमी कालावधीचे भात बियाणे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे आले होते. त्यापैकी नऊ हजार ८०० क्विंटल बियाणे आजही कृषी केंद्र चालकांकडे आहेत. ते बियाणे परत कंपन्यांना पाठवू नये. कारण गोंदिया जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता असल्याचे स्वत: कृषी विभागाने मान्य केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांना पत्र पाठविले आहे.
जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव पारित
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात शंभरटक्के दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा एकमुखी ठराव बुधवारी (दि.२४) घेण्यात आला. तो ठराव शासनाला पाठविण्यात आला आहे.
८०४६ मेट्रिक टन युरिया उपलब्ध
यंदा पाऊसच न झाल्यामुळे जिल्ह्यात आठ हजार ४६.८६ मेट्रिक टन युरिया जिल्ह्यात उपलब्ध आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना यावेळी कमी पडणारा युरिया यावर्षी कुणी मागतच नाही. पावसाने दडी मारून शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले आहे.