अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: June 6, 2014 00:05 IST2014-06-06T00:05:07+5:302014-06-06T00:05:07+5:30
उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न

अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात
गोंदिया : उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचा थेट परिणाम शेतकर्यांवर होणार असल्याने शेतकरी व पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
निसर्गाचा समतोल पशूपक्षी, प्राणी, हवा पर्यावरण या प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. मात्र माणूस नावाच्या प्राण्याने आपल्या फायद्यासाठी या प्रमुख घटकांवरच आघात करणे सुरु केले आहे.
जंगल साफ केले जात असतानाच प्राणी व पक्ष्यांचीही शिकार केली जात आहे. याला प्रदुषणाची जोड लाभल्याने अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे घटक आता नामशेष होत आहे. त्यामुळेच पावसाळ्यात शेतात दृष्टीस पडाणारा शेकर्यांचा मित्र गांडुळ दुर्मिळ होत आहे. जमिनीची नैसर्गिक मशागत करणार्या गांडुळामुळे पाण्याचा निचरा व्हायचा. थोडाफार पाऊस झाला तरी पाणी जमिनीत शोषल्या जात आहे. पण आज पाण्याचे जमिनीत शोषण न होता बरेच पाणी वाहून जात आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबत असून जमिनीतील उष्णतेचे प्रमाण कायम राहत आहे.
गांडुळासारखे असंख्य सूक्ष्मजीव सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने दूष्परिणामाच्या गंभीरतेचा फटका शेतकर्यांना बसत आहे. किडीवर नियंत्रण ठेवणारे बेडूक व अन्नसाखळीतील महत्वाचा घटक साप यांचे अस्तित्व या मानवी कुरापतीमुळे धोक्यात आल्याने पिकांचा नाश करणारे उंदिर, घुसांचे प्रमाण सध्या शेतात वाढले आहेत. उंदराला मारण्याकरिता किटकनाशकांचा वापर केल्याने अन्य मदत करणारे जीव यांचे भक्ष्यस्थानी पडत आहे. नैसर्गिक अन्नसाखळीचे विस्कळीत झाल्याने अशा समस्यांशी शेतकर्यांना सामना करावा लागतो.
यावर माणसाने आता गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. असे न झाल्यास अन्न साखळीतील सजीव पूर्णपणे लोप पावतील व त्याचे दुष्परिणाम मानवजातीलाच भोगावे लागतील यात शंका नाही. याकरिता मानवाला अन्न साखळीतील या सजीवांच्या रक्षणासाठी धडपड करण्याची गरज निर्माण झाली आहे.