शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध पर्यटनस्थळाला गतवैभव प्राप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:15 IST

नवेगावबांध पर्यटन स्थळ सन १९८० ते ९५ च्या मध्यकाळात सर्वदूर परिचित होते. मात्र या पर्यटन स्थळाचे गतवैभव टिकविता आले नाही. नवेगावबांध पर्यटनस्थळ चार विभागात विभागले असल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र या स्थळाच्या विकास कामाच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने या स्थळाचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. येथील विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : हिलटॉप गार्डन बांधकामाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : नवेगावबांध पर्यटन स्थळ सन १९८० ते ९५ च्या मध्यकाळात सर्वदूर परिचित होते. मात्र या पर्यटन स्थळाचे गतवैभव टिकविता आले नाही. नवेगावबांध पर्यटनस्थळ चार विभागात विभागले असल्याने विकास कामे करण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र या स्थळाच्या विकास कामाच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने या स्थळाचे गतवैभव प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. येथील विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.येथील पर्यटन संकुल परिसरातील हिलटाप गार्डनच्या नवीन बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे होत्या. या वेळी प्रामुख्याने पं.स.सदस्य होमराज पातोडे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, माजी जि.प.सदस्य विजया कापगते, कृउबास संचालक केवळराम पुस्तोडे, चामेश्वर गहाणे, वन व्यवस्थापन समितीचे रामदास बोरकर, खंडविकास अधिकारी आबीलकर, वन्यजीव उपविभागीय अधिकारी पाटील, स्वागत अधिकारी अवधान, नवेगावबांध वनपरिक्षेत्राधिकारी दोनाडे उपस्थित होते.बडोले म्हणाले, मागील ९ ते १० वर्षापासून या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत असताना नवेगावबांध पर्यटन संकूल परिसराला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत या क्षेत्रात बरीच विकास कामे झाली आहेत. १३ कोटी रुपयांच्या निधीतून महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने विश्रामगृह बांधकाम करण्यात येत आहे. नौका विहार, बालोद्यान, साहसी खेळ,जलाशय काठावरील बीच, नवेगावबांध ते संकुल परिसर मुख्य मार्गाला रस्ता बांधकाम पूर्ण झालेले आहे. तर काही कामे प्रगती पथावर आहेत.नवेगावबांध पर्यटन संकुलाकरिता ५५ लाख रुपयांच्या निधीतून प्रवेशध्दार, ३.५० कोटीचे मिनी ट्रेन, १ कोटीचे इंटरप्रिटेशन हॉल, १५ कोटीचे वाटरपार्क व अन्य विविध कामे प्रस्तावित आहेत. लवकरच या कामांना सुध्दा मंजुरी मिळेल. जोपर्यंत या पर्यटन स्थळाचा विकास होणार नाही तोपर्यंत पर्यटक येणार नाही. पर्यटक येईल तेव्हाच रोजगार उपलब्ध होतील. तेव्हाच या परिसराचा खºया अर्थाने विकास होईल असे बडोले म्हणाले. नवेगाव पर्यटन स्थळाच्या चार विभागाला एकत्रित आणून विकास करण्यात यावा. या संदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेवून त्यावर अंतीम निर्णय घेण्यात येईल.संपूर्ण पर्यटन संकुल परिसर विकासासाठी एकाच विभागाकडे हस्तांतर करुन स्थानिक वन व्यवस्थापन समितीला देण्याचा आमचा मानस असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प. बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी ताकसांडे यांनी केले तर संचालन व आभार परशुरामकर यांनी मानले.