शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

शिक्षकांसाठी चिमुकल्यांची शासनाकडे आर्त हाक, ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 1:51 PM

जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथील एक ते आठचे चिमुकले 186 विद्यार्थी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीवर आज(२२) धडकले.

अर्जुनी मोरगाव-  "शिक्षण आमचा अधिकार आहे , आम्हाला शिक्षक द्या, आम्हाला शिक्षक मिळालंच पाहिजे," ही आर्त हाक देत जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथील एक ते आठचे चिमुकले 186 विद्यार्थी अर्जुनी मोरगाव पंचायत समितीवर आज(२२) धडकले. विद्यार्थ्यांनी जवळपास तीन किलोमीटरचे अंतर पायदळ पार करीत भर उन्हात निषेध मोर्चा काढला. मोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तीन वर्षांपासून वर्गखोली व शिक्षकांची मागणी प्रलंबित आहे. शिक्षणाच्या कायद्याच्या अंतर्गत प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळाला. उत्तम विद्यार्थी घडविण्यासाठी मूलभूत सुविधा आवश्यक असतात. यात पूर्ण वेळ शिक्षक व सुंदर वर्गखोली, स्वच्छ परिसर यांचा समावेश होतो. पण शिक्षक व वर्गखोलीच नसणार तर विद्यार्थी विद्यार्जन कसे करायचं? हा गंभीर  विषय घेऊन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरगाव येथील विद्यार्थ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून 2 शिक्षक व 2 वर्गखोलीच्या  प्रलंबित मागणीसाठी मोर्चा काढला, वारंवार पाठपुरावा करून ही लोकप्रतिनिधी व शासन दुर्लक्ष करीत असल्याने गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती ने आज(22 ) शाळेला कुलुप ठोकून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.एक ते आठ वर्ग व 186 विद्यार्थी संख्या असणारी ही तालुक्यातील मोठी शाळा आहे. येथील जुन्या वर्गखोली पाडून 5 नवीन खोल्यांचे बांधकाम झाले. मात्र पुन्हा 2 खोल्याची गरज आहे, एक 1956 मधील जुनी इमारत आहे ती पडक्या अवस्थेत आहे. तिथे विद्यादानाचे काम शक्य नाही कारण कधीही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. वर्गखोलीच्या कमतरतेमुळे एकाच वर्गात दोन तुकड्या बसवाव्या लागतात किंवा व्हरांड्यात वर्ग भरविले जाते. त्यामुळे गोंधळ होतो. आठ वर्गांसाठी  मुख्याध्यापकासह सहा शिक्षक असल्याने नेहमी तीन वर्ग वाऱ्यावर असतात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.यामध्ये एका खोलीत वर्ग 2 व3 , 5 व 7 आणि कार्यालयात 4था वर्ग बसविला जातो आणि दोन शिक्षकांची कमतरता असल्याने शिक्षकांची होणारी तारांबळ लक्षात येते. 186 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेला अल्प क्रीडांगणआहे, जे मिळाले आहे तिथे अतिक्रमण झाले असून ते शाळेपासून तीन किमी अंतरावर आहे. बाजूला पडके समाज मंदिर आहे, तिथे विद्यार्थ्यांसोबत दुर्घटना होऊ शकते. त्यालाही काटेरी कुंपण आहे ते पाडण्याची गरज आहे. या दुर्दैवी अवस्थेत ही जिल्हा परिषद शाळा आहे.  एकीकडे खासगी शाळांना पूर्णवेळ शिक्षक मजबूत इमारती दिल्या जातात, मात्र जिथे गरिबांची मुले शिक्षण घेतात त्या शाळेत साधे चपराशी पद रिक्त असतो, अशी केविलवानी स्थिती सरकारी शाळांची आहे. आठ दिवसाआधी या मागण्यांचे निवेदन दिले होते, मात्र शासनाने काहीच कारवाई केली नाही. शेवटी आज शाळा व्यवस्थापन समितीने आक्रमक पवित्रा घेतला व शाळेला कुलूप ठोकले, पंचायत समिती समोर ठिय्या मांडला.