अनावश्यक संदेशांमुळे मोबाईल ग्राहक त्रासले
By Admin | Updated: November 2, 2016 00:30 IST2016-11-02T00:30:55+5:302016-11-02T00:30:55+5:30
सध्याच्या काळात संपूर्ण नागरिकांसाठी मोबाईल हा अविभाज्य अंग झाला आहे. याच संधीचा फायदा घेत भ्रमणध्वनी सिमकार्ड कंपन्या ग्राहकांवर

अनावश्यक संदेशांमुळे मोबाईल ग्राहक त्रासले
रावणवाडी : सध्याच्या काळात संपूर्ण नागरिकांसाठी मोबाईल हा अविभाज्य अंग झाला आहे. याच संधीचा फायदा घेत भ्रमणध्वनी सिमकार्ड कंपन्या ग्राहकांवर अतिरिक्त सेवांचा भार लादत आहेत. त्यामुळे ग्राहकांचे खिसे दिवसाढवळ्या कपून ग्राहकांना झळ पोहोचत आहे.
भ्रमणध्वनीचा शोध लागल्यापासून त्याचा जितका योग्य वापर होत आहे, तितकाच गैरवापरही होत आहे. यासोबतच विविध अनावश्यक मॅसेजनेही ग्राहक त्रस्त झाले आहेत. या त्रासापासून ग्राहकांना मुक्तता मिळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशनुसार ‘डू नॉट डिस्टर्ब’ ही सेवा सुरुवात करण्यात आली. परंतु त्याचा काही उपयोग होत नसून विविध कंपन्याचे मॅसेज येणे अहोरात्र सूरुच असल्याचे दिसत आहे. या गैरप्रकारात फक्त भ्रमणध्वनी कंपन्याच अग्रेसर आहेत असे नाही, यात सिमकार्ड कंपन्याही विविध प्रकाराच्या योजना मॅसेजद्वारे मोठ्या प्रमाणात पाठवित आहेत. या संदेशांना ग्राहक वैतागले आहेत.
ग्राहक आता जागरुक होत आहेत. तर काही ठिकाणी अशा कंपन्यावर दंडही आकारला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप देण्याऱ्या कंपन्यांवर काही प्रमाणात जरब बसेल, असे भ्रमणध्वनीधारकांना वाटत आहे.
अनावश्यक कोणतीही सेवा सूरु करणे, ग्राहकांचे बॅलेंस कट करणे या परस्पर उद्योगातून भ्रमणध्वनी कंपन्या कोट्यवधी रुपयांचा महसूल अतिरिक्त गोळा करण्याचा बेतात आहेत. या कंपन्या आपल्या कंपनीचा नफा वाढवून ग्राहकांना बळीचा बकरा बनवित आहेत. चाळीस-पन्नास रुपयांच्या नुकसानासाठी कोणताही ग्राहक न्यायालयात जात नाही. म्हणून भ्रमणध्वनीवर प्रत्येक वेळी शेकडो अनावश्यक मॅसेज येत असतात.
या मॅसेजमुळे रात्री त्रास होतो. तर ग्राहक संबंधित प्रकरणाची तक्रार जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या ग्राहक न्यायालयात ठराविक नियम अटींची पूर्तता करुन वाद दाखल करु शकतो. त्या संबंधी ग्राहक न्यायालय तक्रारीची दखल तडकाफडकी होत त्याचा निपटारा करण्यात येते.(वार्ताहर)