शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहराची लाईफलाईन असलेल्या मानागड तलावात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

मानागड जलाशयातून कालव्याद्वारे एकूण १३३५ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. या जलाशयाची एकूण साठवण क्षमता ६.०५ दश लक्ष घनमीटर असून आता पावसाळा परतीच्या वाटेवर येत असतानासुद्धा जलाशयात आतापर्यंत १.३५ दशलक्ष घनमीटर पाणी संग्रहित झाले आहे. पाण्याचे एकूण साठवण क्षमता १९ टक्के असून त्यापैकी १७ टक्के साठा राखीव जलसाठा आहे. केवळ दोन टक्के पाणीच सोडण्यासाठी उपलब्ध आहे.

विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : संपूर्ण सालेकसा शहराची ऐन गरजेच्यावेळी तहान भागविणारा व विविध उपयोगासाठी पाण्याचा पुरवठा करून देणारा मानागड मध्यम प्रकल्पात अजूनपर्यंत ठणठणाट असल्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सालेकसा शहराला भीषण पाणी टंचाईला द्यावे लागण्याची शक्यता आहे. जलाशय अंतर्गत ओलिताखाली येणाऱ्या शेतीला सुध्दा पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सालेकसापासून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या मानागड जलाशयातून एकूण १३ कि.मी. लांबीचा मुख्य कालवा असून मधात सीतेपाला आणि हलबीटोला गावाला स्पर्श करीत पूर्वेकडून सालेकसा (आमगाव खुर्द) शहरात प्रवेश करतो. तालुका मुख्यालयातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसराजवळून मुख्य कालवा वाहत असताना संपूर्ण शहराच्या अगदी मधोमध वाहत जाताना एकूण १३ कि.मी.चा प्रवास करत असतो. या मुख्य कालव्यातून एकूण २५ उपकालवे असून या उपकालव्याच्या माध्यमातूनसुद्धा शहराच्या प्रत्येक भागात विविध उपयोगी कामासाठी पाण्याची सोय उपलब्ध होत असते. पुढे शहराबाहेर परिसरातील धान पिकांना सिंचनासाठी हे सर्व कालवे जीवनदायिनी म्हणून काम करतात. मानागड जलाशयातून कालव्याद्वारे एकूण १३३५ हेक्टर शेतीला सिंचनाची सोय केली जाते. या जलाशयाची एकूण साठवण क्षमता ६.०५ दश लक्ष घनमीटर असून आता पावसाळा परतीच्या वाटेवर येत असतानासुद्धा जलाशयात आतापर्यंत १.३५ दशलक्ष घनमीटर पाणी संग्रहित झाले आहे. पाण्याचे एकूण साठवण क्षमता १९ टक्के असून त्यापैकी १७ टक्के साठा राखीव जलसाठा आहे. केवळ दोन टक्के पाणीच सोडण्यासाठी उपलब्ध आहे. १३३५ हेक्टर पैकी  किमान ९०० हेक्टर क्षेत्रातील शेतीला पाणी देणे बंधनकारक असते. पुढे पाऊस असाच राहिला तर एका पाण्यासाठी संकटात सापडलेल्या पिकांना सुद्धा पुरेशा पाणी देता येणार नाही. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरातून गेलेल्या कालव्यात जेव्हा पाणी वाहत असते त्यावेळी लोकांची समस्या दूर तर होतेच सोबतच शहरातील विहीर बोअरवेलचीसुद्धा पाण्याची पातळी वाढत असते. त्यामुळे पाण्याची टंचाई आपोआप कमी होण्याला मदत  मिळत असते.

मुसळधार पावसाची प्रतीक्षापावसाचे तीन महिने सरले, तरी यंदा पाऊस सरासरी निम्म्याहून खालीच आहे. मागील तीन महिन्यात या तालुक्यात एकदाही मुसळधार पाऊस आला नाही. त्यामुळे कुठेही पाणीसाठा झालेला नाही. जेव्हा केव्हा पाऊस पडला फक्त रिपरिप किंवा सरवा स्वरूपाचा आला. यंदा एकदाही नदीनाले भरून वाहले नाही. अशात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरण