शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra Election 2019 ; सर्वच उमेदवारांचे मतदारसंघात शक्तिप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 6:00 AM

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोंदिया,अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहे.९ आॅक्टोबरपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली.त्यामुळे मागील १०-१२ दिवस मतदारसंघात प्रचारसभा,पदयात्रा आणि रॅलीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

ठळक मुद्देजाहीर प्रचार बंद। आता मतदारांच्या थेट भेटीवर लक्ष : उमेदवारांसाठी रविवारचा दिवस महत्त्वपूर्ण, निवडणूक यंत्रणा सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या दहा बारा दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात मतदारांनो लक्ष असू द्या सह ऐका हो ऐकाचा आवाज घुमत होता. शनिवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजतानंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नसल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी आपआपल्या मतदारसंघात रॅली,पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन केले. आपल्या मागे मतदारसंघातील किती कार्यकर्ते आणि जनता आपल्या पाठीशी हे दाखविण्यासाठी ढोलताशांच्या गजरात रॅली आणि पदयात्रा काढून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, गोंदिया,अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या चारही मतदारसंघातून एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहे.९ ऑक्टोबरपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली.त्यामुळे मागील १०-१२ दिवस मतदारसंघात प्रचारसभा,पदयात्रा आणि रॅलीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील उमेदवार आणि पक्षाचे कार्यकर्ते भाऊ लक्ष असू द्या असे सांगत फिरत असल्याचे चित्र होते.त्यामुळे काही गावात तर दिवाळीपूर्वीच दिवाळीचे चित्र होते. निवडणुकीमुळे हॉटेल, चहा टपऱ्या आणि ढाब्यांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. २१ ऑक्टोबरला मतदान होणार असल्याने आपले कार्यकर्ते दुखावू नये, मतदारसंघात आपली तयार झालेली हवा कायम राहावी याची सर्वच पक्षाचे उमेदवार काळजी घेत होते. त्यातच आता मतदानासाठी केवळ एक दिवस शिल्लक असल्याने आतापर्यंत केलेली मेहनत वाया जाऊ नये याची सुध्दा उमेदवार आणि त्यांच्या पक्षाकडून काळजी घेतली जात होती. मात्र मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागतो.त्यामुळे शनिवारी सांयकाळी ६ वाजेच्या आत सर्वच उमेदवारांनी सभा,पदयात्रा आणि रॅली घेण्याचे नियोजन केले होते. ढोल ताशांच्या गजरात मतदारसंघात रॅली काढून मतदानापूर्वी वातावरण निर्मिती केली. आता जाहीर प्रचार बंद झाला असल्याने उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गृहभेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे.काही अपवाद वगळता मोठ्या नेत्यांच्या सभा नाहीगोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.प्रफुल्ल पटेल, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या नेत्यांच्या सभा वगळता इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांची सभा झाली नाही.त्यातही नितीन गकडरी यांची शुक्रवारी गोंदिया येथे आयोजित सभा रद्द झाली. तर प्रफुल्ल पटेल यांनी सात आठ सभा घेतल्या. तर जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी गोंदिया विधानसभा क्षेत्रातील रावणवाडी येथे सभा घेतली. या व्यतिरीक्त एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. विशेष म्हणजे लगतच्या भंडारा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा झाल्या.दोन मतदारसंघात तीन तासपूर्वीच प्रचार बंदजिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि आमगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्याने या मतदारसंघात मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी दुपारी ३ वाजताच जाहीर प्रचार बंद करण्यात आला होता. या वेळेपूर्वी रॅली, पदयात्रा काढण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केला.हवा कुणाची कळणार गुरूवारीविधानसभा निवडणुकीला घेऊन मागील दहा बारा दिवस सर्वच पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून मतदारसंघात आपली हवा असल्याचे दावे केले जात होते. मात्र मतदारसंघात कुणाची हवा कितीही असली तरी मतदारांच्या मनात नेमके काय दडले आहे. हे गुरूवारी मतमोजणीनंतर कळणार आहे.निवडणूक विभागाची चाचपणीविधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२८२ मतदान केंद्रावरुन १० लाख ९८ हजार ४७६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यासाठी ईव्हीएम, व्हीव्हीटी पॅट आणि मतदान केंद्रावर ऐनवेळी कुठल्या साहित्याची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने शनिवारीच या सर्व गोष्टींची चाचपणी करुन घेतली.मतदानाचा टक्का वाढविण्यावर भरनिवडणूक विभागाने यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि गावांमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबविले. २९ कि.मी.ची मानवी साखळी तयार करुन गोंदिया येथे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.एकंदरीत या सर्व उपक्रमाचा उद्देश हा केवळ मतदानाचा टक्का वाढविणे हाच होता.रविवारची रात्र वैºयाची आहेविधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून मेहनत घेतली. २१ आॅक्टोबर सोमवारी मतदान होणार असल्याने त्यापूर्वी म्हणजे रविवारची रात्र सर्वच ४७ उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या रात्रभरात निवडणुकीची बरीच समीकरणे सुध्दा बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे केलेली मेहनत वाया जाऊ नये,यासाठी रविवारच्या सर्व घडामोडींवर उमेदवारांना लक्ष ठेवावे लागणार असल्याने त्यांच्यासाठी ही रात्र वैऱ्याची आहे.भर पावसातही उमेदवारांचे शक्ती प्रदर्शनविधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता.त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली होती.मात्र दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोढ झाला होता.मात्र काही उमेदवारांनी भर पावसातही शक्ती प्रदर्शन करुन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

टॅग्स :gondiya-acगोंदिया