शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

व्यावसायिक बदलानुसार विद्यार्थ्यांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:24 IST

अभियांत्रिकीसह इतर पदव्या असूनही अनेक युवकांना बेरोजगार राहावे लागत आहे.आयटी क्षेत्रात सुध्दा दिवसेंदिवस अनिश्चिततेच वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे४९३ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड : जिल्ह्यातील विविध उद्योगात संधी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अभियांत्रिकीसह इतर पदव्या असूनही अनेक युवकांना बेरोजगार राहावे लागत आहे.आयटी क्षेत्रात सुध्दा दिवसेंदिवस अनिश्चिततेच वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडे संभ्रमाचे वातावरण आहे.विद्यार्थ्यांचा हा भ्रम दूर करुन त्यांना व्यावसायीक क्षेत्रातील नवीन बदलाचे धडे व प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेता यावा, यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाने पुढाकार घेतला आहे.यासाठी जिल्ह्यातील उद्योजक आणि शासकीय विभागांची मदत घेतली जात आहे.अभियांत्रिकी,स्थापत्य तसेच तंत्रनिकेतन विद्यालयाचा डिप्लोमा असून देखील या विद्यार्थ्यांवर बेरोजगार राहण्याची अथवा पाच ते दहा हजार रुपयांच्या वेतनावर काम करावे लागते. तर आयटी क्षेत्रात दररोज नवे बदल आणि संशोधन केले जात आहे. या नवीन बदलांना जे आत्मसात करीत आहेत त्यांचा जॉब सुरक्षीत आहे. मात्र जे आत्मसात करु शकले नाही त्यांना नौकरी गमवावी लागत आहे. हीच बाब हेरून महाराष्टÑ राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळाने तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार स्थानिक उद्योगांमध्ये व्यावसायीक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मंडळाच्या सूचनेनुसार हब अ‍ॅन्ड स्पोकच्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यात याची सुरुवात करण्यात आली आहे.जिल्ह्यातील चार शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील विविध उद्योग आणि शासकीय विभागात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यातंर्गत शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे प्राचार्य सी.डी.गोडघाटे यांनी ४९३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या विद्यार्थ्यांना विविध उद्योगाच्या ठिकाणी सहा आठवड्याचे व्यावसायीक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.१४ विभागांची समन्वय समितीजिल्ह्यात अदानी विद्युत प्रकल्पासह येथील एमआयडीसीमध्ये विविध उद्योग आहे. या उद्योगांमध्ये तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना ६ आठवड्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सिंचन, बांधकाम व इतर विभागांची सुध्दा यासाठी मदत घेतली जात आहे.प्राचार्य सी.डी.गोडघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ विभागाच्या सदस्यांची समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.अदानीचे स्टेशन हेड सी.पी.साहू हे या समितीचे सदस्य सचिव आहे.तंत्रनिकेनत विद्यालयातून विद्यार्थी डिप्लोमा घेवून बाहेर पडल्यानंतर त्यांना रोजगार मिळण्याची व अनुभवाची कमरता जाणवू नये तसेच व्यावसायीक क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांची माहिती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांना सहा आठवड्याचे व्यावसायीक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.- सी.डी.गोडघाटेप्राचार्य तंत्रनिकेतन विद्यालय गोंदिया.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण