शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याची जाण असायला हवी

By admin | Updated: November 10, 2014 22:46 IST

भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले

गोंदिया : भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले तर त्या व्यक्तीवर अन्याय होतो. हा अन्याय होऊ नये, आपले अधिकार ठिकवून ठेवण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला कायद्याची जाण असायला हवी. ज्यामुळे अन्याय होत असेल तर न्यायालयात दाद मागता येते व न्याय मिळतो, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग. गिरटकर यांनी व्यक्त केले. रविवारी राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त डोंगरगाव येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रापंचायत डोंगरगाव येथे ग्राम विधी व दक्षता केंद्राच्या उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्या. गिरटकर होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया, ग्रामपंचायत डोंगरगाव, म.गां. तंमुस डोंगरगाव, जिल्हा वकील संघ गोंदिया व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती कार्यक्रम, पंचायत समिती, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ९ नोव्हेंबर रोजी महिलांकरिता व गावातील इतर नागरिकांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन तसेच ग्रामपंचायत कार्यालय, डोंगरगाव येथे ग्राम विधी दक्षता व सहायता केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची औपचारिक सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. प्रास्ताविकपर मार्गदर्शन तसेच विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनतेसाठी योजनांबद्दलची माहिती निखिल मेहता, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे व वरिष्ठ न्यायाधीश यांनी दिली. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, गरीब व गरजू पात्र व्यक्तींना मोफत वकील पुरविणे, लोक अदालतीचे आयोजन करणे, मध्यस्थी योजना राबविणे व वरिष्ठांकडून वेळोवेळी निर्देश प्राप्त झाल्याप्रमाणे योजना राबविणे इत्यादी कार्य करण्यात येतात.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतच्या ठिकाणी ग्राम विधी दक्षता व सहाय केंंद्र, पॅरा लिगल व्हालंटीयर्स योजना बचपन बचाव आंदोलनासंदर्भात १८ वर्षाखालील हरविलेले बालक व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याकरिता व त्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्याकरिता, अत्याचार पीडित व्यक्तीस कलम ३५७ ए नुसार नुकसानभरपाई मिळवून देणे इत्यादी योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकारणांमार्फत राबविल्या जातात अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही व्यक्तिला कायदेविषयक अडचणी येत असतील तर त्यांनी नि:संकोचपणे जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी पोलीस नागरिक समन्वय पोलीस मित्र योजना याबाबत उपस्थित महिला व नागरिकांना माहिती दिली. महिलांचे संरक्षणविषयक कायदे याबाबतची माहिती न्यायाधिश एस.पी. सदाफळे यांनी दिली. कार्यक्रमात सरपंच नरेंद्र टेंभरे, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भेदीराम डोंगरे, पुरणसिंह चौधरी, अ‍ॅड.बी.जी लिल्हारे, अ‍ॅड.एच.गौतम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान पंचायत समिती, गोेंदियाचे तालुका समन्वयक पी.टी. बिसेन, प्रशिक्षक मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते. संयोजक रामकिशोर नागवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक बी.टी. वैद्य, महेंद्र पटेले, शिवदास थोरात, आर्यचंद्र गणविर, गुरुदयाल जैतवार, अशोक लिल्हारे, हेमराज पटले, तसेच ग्रामपंचायतचे व तंटामुक्त गाव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)