शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

आॅगस्ट महिन्यात सिंचन प्रकल्प अर्धेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 9:27 PM

मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : शेतकऱ्यांची भिस्त, पाणी टंचाईवर मात करण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर शेतकऱ्यांचे बरेच गणित अवलंबून असते. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथील तलावात केवळ ३.१३ टक्के, कोसबी बकी येथे ३.०४ टक्के पाणीसाठा आहे. स्थानीक स्तरच्या तलावांमध्ये सालेगाव ६.०३ टक्के व चारभाटा ६.४८ टक्के पाणीसाठा आहे. गिरोला तलावात १५.९२, चिरचाडी १३.५९, कोसमतोंडी १६.५०, खाडीपार १०.०६, मध्यम प्रकल्पांतर्गत चोरखमारा जलाशयात १८.३०, लघू प्रकल्पातील भदभद्या तलावात ३२.४६, रिसाला १०.२३, सालेगाव २१.८६, शेरेपार तलावात २९.७२, नवेगावबांध ३६.६७, तर ओवारा तलावात २५.९९ टक्के पाणीसाठा आहे. बोदलकसा जलाशयात ७७.३२, चुलबंद ५१.२७, खैरबंदा ५७.०९, मानागड ७७.८३, रेंगेपार ५४.५३, संग्रामपूर ९०.५३, कलपाथरी ५७.९५, आक्टीटोला ६८.१३, गुमडोह ६८.६७,कालीमाटी ६८.३०, मोगर्रा ६०.३२, पिपरीया ५७.९०, पांगडी ५६.२१, बडेगाव ८१.६६, जुनेवानी ६२.४४, बेवारटोला ८७.२०, भिवखिडकी ७५.१५, चान्ना-बाक्टी ८०.१५, धाबेटेकडी ६५.६५, गोठणगाव ५३.४४, कवठा ७०.४५, खैरी ८५.१६, खमारी ७९.३०, पळसगाव ५६.२२, पालडोंगरी ८१.६९, पळसगाव (डव्वा) ५९.९१, पुतळी ९८.५९, सौंदड ७५.११, तेढा ६९.११, ताडगाव ५६.५८ व छत्तरटोला तलावात ९३.२९ टक्के पाणीसाठा आहे. या तलावात सध्या तरी समाधानकारक पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, ज्या तलावांत पाणीसाठा कमी आहे ते तलाव सिंचनासाठी महत्वपूर्ण आहेत. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होते.मागील वर्षीच्या तुलनेत समाधानकारक स्थितीमध्यम, लघू व जुन्या मालगुजारी तलावांची जिल्ह्यातील संख्या ६९ आहे. यात एकूण ५३.३१ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा त्यांची स्थिती उत्तम आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत या तलावांत फक्त १७.७५ टक्के पाणीसाठा होता. मध्यम प्रकल्पांच्या नऊ जलाशयांत ५८.३१ टक्के पाणी असून मागील वर्षी फक्त १६.५७ टक्के पाणीसाठा होता. लघू प्रकल्पातील २० तलावांत ४४.७४ टक्के पाणीसाठा असून मागील वर्षी २१.२८ टक्के पाणीसाठा होता. तर जुन्या मालगुजारी ३८ तलवांत यंदा ५६.५९ पाणीसाठा आहे तर मागील वर्षी फक्त २२.१५ टक्के पाणीसाठा होता.१० तलावात शंभर टक्केजिल्ह्यातील काही तलाव व जलाशय अद्याप तहानलेले असतानाच काही तलाव शंभर टक्के भरले आहेत.यात कटंगी, राजोली, सोनेगाव, उमरझरी, भानपूर, फुलचूर, गंगाझरी, मेंढा, मोरगाव व माहुरकुडा या तलावांचा समावेश आहे.

टॅग्स :Rainपाऊस