शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेत वाढ करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:29 AM

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ग्रामीण भागात रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी कोविड केअर सेंटर तसेच आरोग्य विषयक सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याची मागणी माजी आ. राजेंद्र जैन यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात दररोज ६०० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. परिणामी शासकीय आणि खासगी रुग्णालयातसुध्दा जागा अपुरी पडत आहे. खाटा कमी पडत असल्याने रुग्ण उपचारासाठी वेटिंगवर असल्याचे चित्र बिकट आहे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ एकच आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा असल्याने या प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे रुग्णांना अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन आरटीपीसीआर मशीन त्वरित खरेदी करण्यात यावी. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३ हजार लिटर क्षमतेचे ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे तो लवकर सुरु झाल्यास जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या निर्माण होणार नाही. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा त्वरित पुरवठा करण्यात यावा. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यासाठी ऑक्सिजनची खरेदी करण्यात यावी. गोंदिया येथे एकमेव शासकीय रक्तपेढी असून त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून आवश्यक सोयी सुविधासुध्दा नाहीत. त्यामुळे नेहमीच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. त्यामुळे या पीढीचे आधुनिकीकरण करण्यात यावे. अदानी वीज प्रकल्पाच्या सीएसआर निधीतून ऑक्सिजन टँक उभारण्याचे काम सुरु असून ते युध्द पातळीवर पूर्ण करण्यात यावे. केटीएस रुग्णालयातील डॉक्टरांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच ऑक्सिजनची समस्य दूर करण्यासाठी भिलाई येथून लिंक करण्यात यावे. आदी मागण्याबाबत खा. प्रफुल्ल पटेल आणि माजी आ. राजेंद्र जैन, मनोहर चंद्रिकापुरे यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांचे लक्ष वेधले. यावेळी गंगाधर परशुरामकर, रमेश ताराम, विनीत सहारे व पक्ष के पदाधिकारी उपस्थित होते.

.......

प्रफुल्ल पटेल यांची पालकमंत्र्याशी चर्चा

पालकमंत्री नवाब मलिक हे शुक्रवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान खा. प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्याशी मोबाईलवरुन तब्बल २० मिनिटे चर्चा करुन जिल्ह्यात आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास सांगितले. ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

....

लसींचा पुरेसा पुरवठा करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्याला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सव्वा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मात्र लसींचा पुरवठा होत नसल्याने वांरवार लसीकरण मोहिमेला ब्रेक लागत आहे. लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा करण्यात यावा.

.....