शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकर शेतीत घेतले चार लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

वाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेले नवेगाव हे गाव चवदार वांगी व इतर भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निम्मे लोक नदी लगत जमिनीवर भाजीपाला उत्पादन घेवून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु नोहरलाल दमाहे नदीच्या किनाऱ्यावर भाजीपाला पिकाची लागवड करण्याऐवजी धानपिक घेण्याच्या शेतीत वांगी उत्पादन घेवून सर्वांना आश्चर्य चकीत केलेले आहे.

ठळक मुद्देयशस्वी प्रयोग : कोरोना काळात दिला अनेकांना रोजगार, शेतकऱ्यांसमोर आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : काही करण्याची जिद्द व चिकाटी असेल तर वयाची किंवा परिस्थिती बाधा आडवी येत नाही. हे सिद्ध करुन दाखविले आहे नवेगाव येथील ७० वर्षीय शेतकरी नोहरलाल पंचम दमाहे यांनी. त्यांनी दीड एकर शेतीत चार लाख रुपयांचे वांगी पिकाचे उत्पादन घेतले आहे.वाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेले नवेगाव हे गाव चवदार वांगी व इतर भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निम्मे लोक नदी लगत जमिनीवर भाजीपाला उत्पादन घेवून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु नोहरलाल दमाहे नदीच्या किनाऱ्यावर भाजीपाला पिकाची लागवड करण्याऐवजी धानपिक घेण्याच्या शेतीत वांगी उत्पादन घेवून सर्वांना आश्चर्य चकीत केलेले आहे. धानपिक घेण्यासंबंधी गुणाकार भागाकार केला तर दीड एकर शेतीत धान उत्पादनातून जेमतेम ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्यातच ३० हजार रुपायपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त लागवड खर्च येतो. त्यावर शेतकरी कुटुंबाने केलेल्या मेहनतीचा विचार केला तर हातात काहीच उरत नाही.या दृष्ट चक्रातून बाहेर निघण्याचा विचार करुन नोहरलाल दमाहे यांनी दीड एकर जमिनीत वांगी उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिकुल वातावरण बघता अनेक वेळा असे वाटायचे की वांगी उत्पादनासाठी केलेली पैशाची गुंतवणूक जोखीमेची तर ठरणार नाही. परंतु दमाहे परिवाराची जीवापाड मेहनत वांगण्याच्या प्रत्येक झाडाची निगा राखणे, वेळेवर पाणी देणे, खत देणे, किटकनाशकाचा वापर करणे, यात कुठेही कमी पडू न देण्याचा निर्धार यामुळे प्रतिकुल वातावरणात सुद्धा वांगी उत्पादन वाढविले. ढगाळ वातावरणाचा फटका बसत मोठ्या प्रमाणावर वांग्यांना किडीचा प्रादुर्भाव सुद्धा झाला. परंतु यामुळे दमाहे कुटुंबीय क्वचित ही खचले नाही. आपल्या कुटुंबातील चार पाच लोक व इतर चार पाच लोक मिळून जवळपास दहा लोक सतत परिश्रम घेत असतात. यात काही झाडांची निगा करण्यात काही लोक वांगी तोडण्यात तर काही लोक विक्री करण्यात व्यस्त असतात.लॉकडाऊनचा फटकाकोरोनामुळे आठवडी बाजार बंद पडले आहेत. त्यामुळे वांग्याची मागणी मोठ्या प्रमाणात नाही. लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाले असल्याने फार मोठ्या प्रमाणात वांग्यांची मागणी नाही. कोरोना काळात गावा-गावात फेरीवाले भाजीपाला विक्री करीत आहे. असे फेरीवाले आपल्या क्षमतेनुसार वाडीवर येवून वांगी खरेदी करतात. तरी सुद्धा वांगी उत्पादन करणे, धानाच्या उत्पादनापेक्षा जास्त फायदेशीर आहे. हे दमाहे परिवाराने सिद्ध करुन दाखविले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती