शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जेवल्यानंतर लगेच धावत असाल किंवा जड व्यायाम करत असाल तर आजच करा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 16:50 IST

आहारासोबत व्यायाम महत्त्वाचा : जेवणानंतर लगेच चालल्यास गॅस, अपचन यासारख्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बदलत्या वातावरणात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण निरोगी आहारासोबतच व्यायामदेखील करत असतो. अशातच धावणे हा निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी एक उत्तम व्यायाम आहे. आपल्यापैकी अनेकजण रोज सकाळी लवकर उठून रनिंग करायला जातात. पण, जर ते चुकीच्या वेळी केले गेले, विशेषतः जेवल्यानंतर लगेच तर त्याचे दुष्परिणामदेखील होऊ शकतात. जेवल्यानंतर किती वेळानंतर धावणे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असू शकते हे अनेकांना जाणून घ्यायचे असते. अशातच तुम्ही जेवल्यानंतर लगेच धावण्यासाठी जात असाल तर त्याने तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकते.

रात्रीच्या जेवणानंतर चालावे, याने जेवण चांगले पचते असे आपल्याकडे म्हटले जाते. ज्याला आपण शतपावली असे म्हणतो. रात्री केलेल्या जेवणानंतर आपली हालचाल होत नाही. त्यामुळे बाहेर जाऊन फेरफटका मारण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, जेवणानंतर चालल्याने खरंच शरीरावर फरक पडतो का? याचा परिणाम वजनावर होतो का? शतपावलीचा आरोग्याला कितपत फायदा होतो? यासह चालावे तर किती चालावे? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला असेल. शास्त्रज्ञांनी जेवणानंतर १५ मिनिटे चालणे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. परंतु, जेवणानंतर लगेच चालणे शरीरासाठी कधी कधी फायदेशीर ठरत नाही.

जेवणानंतर तासभराने चालावेजेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नये. जेवल्यानंतर लगेच धावल्याने पोटाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला वेदना होऊ शकतात. जेवल्यानंतर किमान १ ते २ तासांचे अंतर राखले पाहिजे. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपली पचनसंस्था सक्रिय होते आणि शरीरातील बहुतेक रक्तप्रवाह पोटाकडे केंद्रित होतो. 

चालण्याचा व्यायाम उत्तमसर्व प्रकारच्या व्यायामात कोणालाही सहज करता येणारा हा व्यायाम पायातल्या शूजव्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनाची या व्यायामाला आवश्यकता नसते. चालण्याचा व्यायाम कधी करता, किती वेळ करता, कसा करता यावर त्याचे शरीरावर होणारे परिणाम अवलंबून असतात.

रात्री जेवल्यानंतर चालावेचालण्याच्या व्यायामाबद्दल नुकताच झालेला एक अभ्यास सांगतो की जर वजन कमी करायचं असेल तर रात्री जेवणानंतर अवश्य चालावं. यामुळे केवळ वजनच कमी होतं असं नाही तर आरोग्यास इतरही प्रकारे त्याचा फायदा होतो. रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे आपल्या शरीरातला प्रत्येक भाग आणि स्नायू व्यवस्थित काम करतात. रोज रात्री जेवल्यानंतर किमान १५-२० मिनिटं चाललं तरी स्थूल होण्याचा धोका टळतो. 

जेवल्यानंतर लगेच धावल्याने नुकसान

  • पचनाच्या समस्या : धावण्यामुळे पचनसंस्थेतील रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • पेटके आणि पोटदुखीः जेवणानंतर लगेच धावण्यामुळे पोटात पेटके येऊ शकतात, ज्यामुळे धावताना अस्वस्थता निर्माण होते.
  • उलट्या किंवा मळमळः विशेषतः जर तुम्ही हेल्दी किंवा प्रथिनेयुक्त जेवण सेवन केले असेल तर लगेच धावल्याने उलट्या किंवा मळमळ सारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • थकवा आणि चक्कर येणेः जेवल्यानंतर, शरीर पचनासाठी ऊर्जा वापरते. जर तुम्ही यावेळी धावलात तर तुम्हाला लवकर थकवा जाणवेल आणि चक्करही येऊ शकते.
  • परफॉर्मसवर परिणामः जर तुम्ही फिटनेस किंवा प्रशिक्षणासाठी धावत असाल तर जेवल्यानंतर लगेच धावल्याने तुमचा परफॉर्मस कमी होऊ शकते.
टॅग्स :Healthआरोग्यgondiya-acगोंदिया