जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार अजूनही उघडयावरच
By Admin | Updated: July 10, 2014 23:39 IST2014-07-10T23:39:57+5:302014-07-10T23:39:57+5:30
जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळून सुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या कोपऱ्यात उघड्यावर आपले ठाण मांडून बसत आहेत.

जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार अजूनही उघडयावरच
गोंदिया : जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळून सुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या कोपऱ्यात उघड्यावर आपले ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे त्यांना वर्षभर उन-पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे.
त्यांना मिळालेले लोखंडी स्टॉल कचऱ्यात धूळखात पडलेले आहेत. त्यांना जंग लागल्यामुळे निकामी व नष्ठ होण्याच्या मार्गावर आहेत. ही परिस्थिती पाहून असे वाटते की गटई कामगारांना शासनाकडून मिळणारी मदत वाया जात असते. तर चर्मकारांची आर्थिक परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे.
गटई कामगार उघड्यावर बसून जोडे-चपला दुरूस्ती किंवा विक्री करीत असल्याचे मुख्य कारण असे की ज्या लोकांच्या घरासमोर किंवा जागे समोर ते आपले लोखंडी स्टॉल मांडू इच्छितात ते लोक त्या ठिकाणी जागा देत नाही. त्यांना असे वाटते की एक वेळा लोखंडी स्टॉल ठेवायला जागा दिली तर त्यावर ते कायमचा आपला हक्कम जमावतील व भविष्यात त्यांना हटविता येवू शकणार नाही. काही जागा मालक तर असे आहेत की, आपल्या जागेसमोर त्यांना उघड्यावर सुध्दा दुकान मांडू देत नाही. एवढेच नाहीतर आपल्या घरासमोर असलेल्या शासकीय जागेवर सुध्दा बसू देत नाही. त्यामुळे अनेकांना सोयीस्कर ठिकाणी दुकान मांडण्यासाठी मोठी पंचाईत होत असते.
चपला-जोडे विकण्याचा व तयार करण्याचा व्यवसाय हा आता एका जणापुरता मर्यादीत राहीला नसून कोणीही या व्यवसायात विनियोग करून अर्थार्जन करू शकतो. त्याचप्रमाणे चर्मकार लोक चर्मकाम करण्याच्या पूर्ती स्वत:ला अकडवून न ठेवता वाटेल तो व्यवसाय करून आपली आर्थिक परिस्थती भक्कम करू लागले आहेत. पिढ्यांपिढ्यापासून अनेक कुटुंब हाच व्यवसाय करीत असल्याचे दिसते. शासन त्यांच्या उत्थानासाठी प्रयत्न करीत आहे.
समाज ग्रामीण भागात सामाजीक प्रवाहापासून वेगळाच राहतो. इतर समाजीत लोक त्यांना आपल्या कोणत्याही काम काजात सम्मिलीत करीत नाही किंवा त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाही. त्यामुळे गावातील सामाजीक ऐक्य निर्माण होण्यास अडचण निर्माण होत असते.
चर्मकामगारांचा अनुसूचीत जातीमध्ये समावेश असून त्यांच्यावर जातीय अत्याचार झाल्यास अॅट्रासिटी कायद्याअंतर्गत आपले संरक्षण करून ते सन्मानाने जगू शकतात. परंतू या समाजाचे लोक मृदू स्वाभावाचे व समाजातील इतर लोकांशी नमते घेवून जीवन यापन करीत असल्याने त्यांना कोणी दुकान लावायला जागा देत नाही. (तालुका प्रतिनिधी)